Thursday, March 31, 2011

मराठी संस्कृती




शेवटी संस्कृती म्हणजे बाजरीची भाकरी...
वांग्याचे भरीत....
गणपती बाप्पा मोरयाची मुक्त आरोळी...
केळीच्या पानातली भातची मूद आणि त्यावरचे वरण..
उघड्या पायांनी तुडविलेला पंचगंगेचा काठ...
मारूतीच्या देवळात एका दमात फोडलेल्या नारळातले उडालेले पाणी...
दुस-याचा पाय चुकून लागल्यावरदेखील अपण प्रथम केलेला नमस्कार..
दिव्या दिव्या दिपत्कार..
आजीने सांगितलेल्या भूताच्या गोष्टी..
मारूतीची न जळणारी आणि वाटेल तेव्हा लहानमोठी होणारी शेपटी..
दस-याला वाटायची आपट्याची पाने..
पंढरपूरचे धूळ आणि अबूर यांच्या समप्रमाणात मिसळून खाल्लेले डाळे आणि साखरफुटाणे...
सिंहगडावर भरून आलेली छाती ...आणि....
दिवंगत आप्तांच्या मूठभर अस्थींचा गंगार्पणाच्या वेळी झालेला स्पर्श...
कुंभाराच्या चाकावर फिरणा-या गोळ्याला त्याचे पाण्याने भिजलेले नाजूक हात लागून घटदार मडके घडावे तसा अदृष्य पण भावनेने भिजलेल्या हातांनी पिंड घडत असतो. कुणाला देशी मडक्याचा आकार येतो. कुणाला विदेशी कपबशीचा.

इति...पु.ल.देशपांडे

Tuesday, March 29, 2011

तीन दशकांची समाधानपूर्ती--झलक..



महाविद्यालयामधून बाहेर पडल्यानंतर स्वतःला अभिव्यक्त करण्याच्या तीव्र उर्मीतून झलक,पुणे या संस्थेची स्थापना झाली..आता त्याला तीन दशके झाली आहेत.
रसिका तुझ्याचसाठी.. गंगाधर महांबरे यांच्या शिर्षक गीताच्या नावाने संस्थेने पहिला कार्यक्रम झाला..आणि झलकची झलक रसिकांच्या टाळीला पसंत पडली. मौखिक परंपरेतील पारंपारिक गीते आणि अघुनिक गीते सादर करणे हा उद्देश..
झलकला आपल्या मातीतला आणि मनातला हा बहुश्रृततेचा धागा. परंपरेतील समृध्द वारसा या कार्यक्रमातून जपणे हे जास्त मोलाचे वाटले. ते त्यांनी तीन दशके सुरू ठेवले.

इलेक्ट्रॉनिक वाद्ये आणि इंटरनेटच्या युगातही प्रेक्षागृहातले रसिक आणि कलाकार एकमेकांसमोर असताना तालवाद्ये जुळविली जातात. सूर-लय-तालाच्या लडी उलगडल्या जातात. आणि बघता बघता त्या सर्वांचे अद्वैत तयार होते. झलक त्या सांगेतिक अनुभूतीचा परिणाम देण्यासाठी आजही सज्ज असते...पुढेही राहणार आहे.
मागच्या तीन दशकांमध्ये अनेक ज्येष्ठ कलाकारांबरोबरच सुधीर फडके, राम कदम, शांताबाई शेळके, प्रभाकर जोग, मंगेश पाडगावकर, सुधीर मोघे, प्रशांत दामले, सुधीर गाडगीळ, आशा भोसले, किशोरी आमोणकर यांनी झलकच्या स्वरमंचावर येवून कलाकारांना प्रोत्साहन दिले आहे.
स्वा. सावरकरांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने त्यांच्या प्रचलित व अप्रचलित गीतांचा सागरा प्राण तळमळला हा कार्यक्रम राष्ट्रभक्तीच्या प्रेरणेतून रंगत गेला. आज झलकचे तोच चंद्रमा, सूर तेची छेडिता, मधुघट, इंद्रधनू, गा मेरे मन, सारखे वेगळे कार्यक्रम रसिकांच्या पसंतीला उतरले आहेत. तर पावसाची गाणी आणि मन उधाण वा-याचे सारखे वेगळे कार्यक्रम आजही स्मरतात. २५०० प्रयोगांची या सा-या प्रयोगांची संख्या होईल.

पुण्यात स्थापन झालेली कलाकारांची ही संस्था गेली तीन दशके एकविचाराने, अभंगपणे आमि आपल्या भूमिकेशी ठाम पाहून आजही काम करत आहे....याचे श्रेय झलक परवारात सामिल झालेल्या विविध कलावंतांना तर जातेच पण त्याही पेक्षा अधिक जाते ते... अविनाश वैजापूरकरांच्या संघटनाकौशल्याकडे. यासा-यांना म्हणजे कलाकार आणि रसिक यांना बांधणारा सेतू निवेदनातून साधला तो उपेंद्र खरे यांनी....
झलकची ही तीन दशकांची तपपूर्ती साजरी झाली तीही आगळ्या पध्दतीने...
आता ज्येष्ठ म्हटले पाहिजे.. ते सुधिर गाडगीळ यांच्या साठीच्या निमित्ताने त्यांना मानपत्र देउन...तर प्रमुख उपस्थितीत विक्रम गोखले झलकच्या कलावंतांना अधिक सुरात गा असा सुरात गा हा सल्ला द्यायला विरसले नाहीत.
तीन दिवसांच्या ह्या सोहळ्याला पुणेकरांची दाद ही उपस्थितीने तर मिळालीच. पण ती गीतांना टाळ्यांनी साद घालून.
कितीही जमाना बदलला तरी त्या दिवसांची आठवण देणारे असे कार्यक्रमच संस्कृती टिकवून ठेवते.. गेलेले दिवस परत स्मरणात रहातात... ते पुढच्या पिढीपर्यंत पोचविते हे निश्चित....

सुभाष इनामदार,पुणे
subhashinamdar@gmail.com
www.subhashinamdar.blogspot.com
www.culturalpune.blogspot.com
Mob- 9552596276


http://www.zalakpune.com/

http://www.metacafe.com/watch/4202757/zalak_promo/

Thursday, March 24, 2011

Saeed Mirza President of FTII

The Government has reconstituted Society of Film and Television
Institute of India (FTII), Pune for a period of three years with
effect from 4th March, 2011 of until further orders whichever is
earlier. According to an order issued by the Ministry of Information &
Broadcasting, Shri Saeed Mirza has been nominated as the President of
the FTII Society and Chairman of its Governing Council.

The Government of India has nominated the following ex-officio members
of the FTII Society. They shall remain members of the Society as long
as they retain the office or status by virtue of which they became
members of the Society:-

(1) Joint Secretary (Films)
Ministry of I&B or his/her
Nominee not below the rank
of Deputy Secretary
(2) Chief Executive Officer,
Prasar Bharati or his/her nominee
Not below the rank of
Deputy Director General
(3) Additional Secretary &
Financial Adviser, Ministry of I&B
or his/her nominee not below the rank
of Deputy Secretary
(4) Chairman, Central Board of Film Certification
(5) Managing Director, National Film Development Corporation
(6) Chief Producer, Films Division, Mumbai
(7) Director, National School of Drama
(8) Director, Indian Institute of Mass Communications
(9) Director, National Film Archive of India (NFAI), Pune
(10) Director, Film & Television Institute of India (FTII), Pune
(11) Director, Satyajit Ray Film & Television Institute (SRFTI), Kolkata

In the category of “experts representing the activities of the Central
Government” following persons have been nominated as Members of the
FTII Society:

(1) Joint Secretary, Ministry of Culture
(2) Chairperson, Sangeet Natak Academy (Mrs. Leela Samson)
(3) Director General, Doordarshan

In the category of “persons of eminence connected with Films and
Television Education, Journalism, Literature, Fine Arts, Dramatics,
Performing Arts, Etc.” the following persons have been nominated as
members of the FTII Society:

(1) Shri Shiv Kumar Sharma
(2) Shri Ratan Thiyyam
(3) Shri Shazi Zaman
(4) Shri Rajiv Mehrotra
(5) Ms. RamaVij
(6) Shri Benoy K. Behl
(7) Dr. Kiran Seth

In the category of “alumni of FTII”, the following persons have been
nominated as members of FTII Society:

(1) Ms. Zareena Wahab
(2) Shri Rajkumar Hirani
(3) Shri Raza Murad
(4) Shri Subhash Chandra Sahoo

Monday, March 7, 2011

कोकणावरचा समग्र संदर्भ ग्रंथ


`कोकण विविध दिशा आणि दर्शन` पुस्तकरूपी

सह्याद्रिच्या तळी शोभते हिरवे तळकोकण
राष्ट्रदेवीचे निसर्ग निर्मित केवळ नंदनवन!
झुळझुळ गाणे,मंजूळवाणे गात वहाती झरे
शिलोच्चयातून झुरूझुरू येथे गंगाजळ पाझरे!


अशा कोकणच्या सौंदर्य प्रदेशावरचे हे काव्य कुणाला मोहित करणार नाही ?
ती `कोकण विविध दिशा आणि दर्शन `या पुस्तकाच्या संपादिका डॉ. लिला दीक्षित यांनी आपल्या भाषणात गेली साडेतीन वर्ष ज्या गंथाचा खटोटोप चालू होता तो वाचकांसमोर सकार होतानाचा आनंद शब्दात असा वर्णन केला.

हा ग्रंथ म्हणजे सामूहिक असा एक अक्षराविष्कार आहे. सर्व अभ्यासकांनी मनापासून सहकार्य केले. भाग्य असे की त्या त्या विषयाला तज्ञ अभ्यासक मिळाले. आणि हे काम उभ राहिले.
चोवीस लेख, दहा परिषीष्ट आणि २४ ग्लॉसी पेपरवर नकाशे, चित्रे, जुन्या नियतकालिकांची मुखपृष्ठे, कोकणच्या विविध नररत्नांचे फोटो. उपलब्ध झोलेली तिकीचे, कोकणाती अप्रतिम मूर्ति वैभव, कोकणचा निसर्ग डोक्यात ठसेल असे नानाविध सुंदर फोटो असा १०८ रेगीत चित्रांचा खजाना यात आहे.
आज माझे मन अत्यंत शांत आणि तृप्त आहे. कोकण माझी मर्मबंधातली ठेव आहे. इथला निसर्ग, पशु पक्षी,झाडे झुडपे, निरव शांतता देणारा समुद्रकिनारा, नारळाच्या विस्तॉत बाला. इथली सुंदर मंदिरे, त्यांचे उत्सव या सा-यांवर माझे नितांत प्रेम आहे.
कोकणचा माणूस अपल्या परंपरेतील संस्कृतीमधील स्वत्व जपणारा आहे. माझे तेच खरे हा अभिनिवेश त्याच्यात असतो. पण याच त्याच्या जिद्दीने कोकणात कर्तृत्ववान पुरूषांची एक रांग उभी आहे. हा ग्रंथ कोकणविषयी गुंफलेला आहे. प्रादेशिक अस्मिता फुलविणारा किंचिंत स्पर्श असेलही. ` तरीही मळ्यास माझ्या कुंपण पडणे अगदी न मला साहे` ही केशवसुतांची मानसिकता इथे आहे. कोकणचा माणूस भारतीय आहे. अणि भारतीयाची अंतिम ओळख ` विश्वमानव` अशीच असावी. ..
असा भावूक श्बदात डॉ, दीक्षित यांनी पुस्तकाचे मर्म थोडक्यात वर्णन केले.


आता कार्यक्रमाकडे वळताना...

किनारपट्टीलगत महामार्गाची गरज

`ठाण्यापासून गोव्यापर्यंत विस्तरलेल्या किनारपट्टीलगत महामार्गाची गरज आहे. तो झाल्याने कोकणाचा आणखी विकास होणार आहे..कोकणाच्या बंदरांचा, जेटींचा विकास झाला पाहिजे. आज कोकण केवळ निसर्गसंपन्न आहे. मात्र राहण्याची चांगली सोय होणे गरजेचे आहे. कोकणाचे समग्र दर्शन घडविण्या-या पुस्तकाची गरज होती. ती `कोकण विविध दिशा आणि दर्शन `या पुस्तकामुळे कांही प्रमाणात पूर्ण झाली आहे. तरीही कोकणाचा खरा विकास ही काळाची गरज आहे. विकासाची गती मिळण्यासाठी आंदोलनाची आज गरज आहे. त्या आंदोलनाचे नेतृत्व करायला आपण तयार असल्याचे माजी केंद्रिय मंत्री मोहन धारिया यांनी पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाच्या अध्यक्षपदावरुन जाहिर केले. आपण स्वतः कोकणात जन्मलो. कोकणाचा सार्थ अभिमान आहे. कोकण कॅलिफोर्नियापेक्षाही सुंदर होउ शकतो पण त्या दृष्टीने विकास होण्याची गरज त्यांनी पुस्तक प्रकाशन समारंभाच्या अध्यक्षपदावरून व्यकत केली.

सोमवरी ७ मार्चला संध्याकाळ कोकणच्या माणसांना सुखावह वाटणारी घटना एस एम जोशी सभागृहात घडत होती. ती म्हणजे कोकणचा समग्र ग्रंथ इथे डॉ. लिला दीक्षित यांच्या संपादकत्वाखालील संदर्भ ग्रंथाचे महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अद्यक्ष आणि कोकण मराठी साहित्य परिषदेचे स्थापनाकार मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते २४ लेखकांनी कोकणच्या विविध बाजूवर लिहिलेल्या आणि प्रतिमा प्रकाशनाने तयार केलेल्या पुस्तकाचे प्रकाशन त्यांच्या हस्ते होत होते.

यानिमित्ताने पुस्तकाविषयी खास पुणेरी परखड मत डॉ. विजय देव यांनी मांडले. असाच पध्दतीवे मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र अशा भागांवरही संदर्भ ग्रंथ लिहिण्याची गरज असल्याचे मत त्यांनी मांडले. हा कार्यक्रम प्रतिमा प्रकाशन आणि कोमसाप या दोन संस्थांच्या वतीने साकार करण्यात आला. हा ग्रंथ प्रकाशित केल्याबद्दल प्रकाशक अरुण पारगावकर यांचे खास अबिनंदन सर्वांनीच कौतूक केले.
या निमित्ताने कोमसापचा परिचय करून देताना या संमेलनाचा अध्यक्ष निवडला जातो..त्यासाठी निवडणूक होत नाही. याचा संदर्भ देउन मोहन धारिया यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीचा प्रचार कोणत्या पध्दतीने होतो आहे..याकडे लक्ष वेधून.. साहित्यिक क्षेत्रात निवडणुकीची प्रथा केवढ्या मोठ्या प्रमाणावर सुरू आहे आणि यात साहित्यिकाला निवडून देण्याची केवढी स्पर्धा चालली आहे याबद्दल खंत व्यक्त केली.
दुसरी खंत मधु मंगेश कर्णिक यांनी व्यक्त केली. वास्तविक असे संदर्भमुल्य असणारे पुस्तक साहित्य संस्कृती मंडळाने काढायला हवे होते..पण ते होऊ शकले नाही...


सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276
www.subhashinamdar.blogspot.com
and
www.culturalpune.blogspot.com