Tuesday, August 15, 2017

राहून गेलेली गोष्ट - फैय्याज

वयाच्या सोळाव्या वषीर् सोलापूर सोडून मुंबईत आले. सुमती धनवटेलिखित आणि पुरुषोत्तम दारव्हेकर दिग्दशिर्त 'गीत गायिले आसवांनी' हे माझं पहिलं नाटक. त्यातली माझी मंझरची भूमिका नावाजली गेली. माझ्या गाण्याने रसिक भारावले. नाट्य-समीक्षकांनीही गहिरा स्वरविलास, भरदार आवाज अशा उपाध्या माझ्या आवाजाला दिल्या आणि पहिल्याच नाटकात गायिका अभिनेत्री म्हणून मी नावारूपाला आले. त्यानंतर रंगभूमीवर आलेल्या 'कट्यार काळजात घुसली', 'संत गोरा कुंभार', 'होनाजी बाळा', 'वीज म्हणाली धरतीला' अशा संगीताची पार्श्वभूमी असलेल्या नाटकांनी माझी ही ओळख अधिकच ठळक केली. आजही गायिका अभिनेत्री म्हणून कलारसिक मला नावाजतात आणि ही ओळख मलाही मनोमन सुखावून जाते.

सुखाच्या या हिंदोळ्यावर असतानाच तो झोका पुन्हा सोलापुरात कधी जातो, तेच कळत नाही आणि मग अचानक बारा-तेरा वर्षांची मेळ्यात-कलापथकात काम करणारी मीच मला नव्याने गवसते. गाण्याची-नृत्याची आवड असलेली फैय्याज

माझी ही आवड लक्षात घेऊनच आजीने गाण्यासाठी राम जालिहाळ आणि पंचवाडकरबुवांची तालीम लावलेली; तर नृत्यासाठी मास्टर हसन(कथ्थक) आणि कट्टीबंधुंची(भरतनाट्यम). नृत्य-गायनाचे हे संस्कार होत असतानाच आकाशवाणीवरच्या संगीतसभासारख्या कार्यक्रमांतून बडे गुलामअली खाँ, बेगम अख्तर यांच्यासारख्या महान गायकांची गायकी कानावर पडलेली. मग दिवसच्या दिवस त्याच गायकीत रममाण झालेली फय्याज. कधी तरी या थोर गायकांच्या मैफलींचं सोलापुरात आयोजन झालेलं. पण भरमसाठ तिकिटामुळे बडे गुलामअली खाँच्या मैफलीला मुकलेली फय्याज. मात्र शाळेच्या मदतीसाठी सोलापूरच्या पानगळ हायस्कूल-मध्ये झालेली बेगम अख्तर यांची मैफील दुरून का होईना, ऐकायला मिळालेली आणि त्या जादुभऱ्या सुरांनी कायमची भारावून गेलेली फय्याज. किंबहुना बडे गुलामअली खाँ आणि बेगम अख्तर यांच्या गायकीमुळे उत्तर हिंदुस्थानी गायकीचा ध्यास घेतलेली फय्याज. परिणामी ही गायकी कधी तरी शिकता येईल का असा सवाल बारा-तेराच्या वयात स्वत:लाच करणारी फय्याज...

... आणि अचानक अशी संधी मला गवसली. पहिल्याच नाटकाने गायिका अभिनेत्री अशी माझी ओळख झाली. त्यामुळे नंतर तशाच भूमिका मिळत गेल्या. अर्थात यामुळे पं. वसंतराव देशपांडे, पं. जितेंद अभिषेकी यांच्याशी परिचय झाला आणि मला त्यांच्याकडून गायनाचे धडे मिळू लागले. परंतु या साऱ्यांनाच मला बेगम अख्तर यांच्या गाण्याचं असलेलं प्रेम ठाऊक होतं. त्यामुळेच एकदा अभिषेकीबुवा सत्येंदभाई त्रिवेदी या आपल्या संगीतातील ददीर् मित्राला म्हणाले-'कभी बेगमजी बम्बई में आयेगी, तो इस लडकीकी उनसे पहेचान करा देना.'

त्रिवेदीजी म्हणजे गायक-वादकांच्या घरी हक्काचा राबता असलेली अफलातून व्यक्ती. मग त्या निर्मलादेवी असोत किंवा मेनकाबाई शिरोडकर असोत. साऱ्यांशी त्यांची सलगीची जान-पहेचान. आणि एक दिवस त्रिवेदीजी खरोखरच आले आणि मला म्हणाले-'चलो अख्तरीबाईजी आयी है.'

त्यांच्या त्या बोलण्यानेच छातीत धडधडायला लागलं. ज्यांचं सतत ध्यान केलं, त्यांना भेटायचं म्हटल्यावर मात्र माझ्या अंगावर काटा आला. मी चुपचाप त्रिवेदींबरोबर चालायला सुरुवात केली. बेगम अख्तर मुंबईत आल्या की कायम मरिन लाईन्सवरच्या सी ग्रीन साऊथ हॉटेलात उतरत असत. आम्ही त्या हॉटेलवर गेलो. त्रिवेदीजींनी खालून फोन लावला आणि अख्तरीबाईंना म्हणाले-'मी फय्याजला घेऊन आलोय. तिला तुम्हाला भेटायचंय.'

' तिला तुम्हाला भेटायचंय' ऐकून बाई गडबडल्या. कारण आमच्यात फय्याज हे नाव मुलाचं असतं. म्हणून अख्तरीबाईंनी त्रिवेदीजींना विचारलं, 'तुम्ही कुणा मुलाला घेऊन आला आहात का?' पण मग त्रिवेदीजी म्हणाले,'नही, ये फय्याज लडकी ही है' आणि आम्ही वर सहाव्या मजल्यावर अख्तरीबाईंच्या रुमवर गेलो. बाईंनी मला वरून खालपर्र्यंत बारीक नजरेने न्याहाळलं. म्हणाल्या - 'कुछ सुनाओगी?' आणि साथीला स्वत:च पेटी घेऊन बसल्यादेखील!

माझ्या पोटात खड्डा पडला. मनात आलं, 'आजवर ज्यांच्या गझल-ठुमरीची पारायणं केली, त्यांना काय ऐकवायचं?' मग धीर करून त्यांचीच एक गझल म्हटली. गझल संपली. क्षण-दोन क्षण मधे गेले असतील नसतील, बाईंचे खणखणीत शब्द कानावर पडले- 'त्रिवेदीजी क्या गजब गाया लडकीने. खुदाने क्या नियामत दी है!'

त्यानंतर मग बेगम अख्तरांशी गुरू-शिष्याचं नातं जुळलं ते कायमचं. त्यावेळी 'कट्यार काळजात घुसली'चे प्रयोग जोरात सुरू होते. म्हणून मी बेगमजींना प्रयोग बघायला येण्याचं निमंत्रण दिलं. त्यांनीही ते मनापासून स्वीकारलं आणि एक दिवस आल्या 'कट्यार...' पाहायला. तिथे प्रयोगाआधीच त्यांची आणि पं. वसंतराव देशपांडेंशी भेट झाली. ते एकमेकांना आधीपासूनच चांगले ओळखत होते. वसंतरावांनी आवाज देऊन मला जवळ बोलावलं. माझ्याकडे बोट दाखवत बेगमजींना म्हणाले, 'ये तुम्हे और तुम्हारे गायकी को बहोत चाहती है. इसे कुछ सिखाओ.' यावर बेगमजींनी आनंदाने मान डोलावली आणि त्या 'कट्यार...'चा प्रयोग बघायला बसल्या.

' कट्यारचा...' पहिला अंक पावणेदोन तासाचा असायचा. बाईंना तर थोड्या थोड्या वेळाने सिगारेट ओढायची सवय. पण बाई निमूट पावणेदोन तास बसून होत्या. अंक संपल्यावर वसंतराव त्यांना भेटायला खाली गेले. तर म्हणाल्या, 'पहले दो कश मारके आती हू. बादमें बातें करते है.' आणि शिवाजी मंदिरच्या बाहेर जाऊन (तेव्हा शिवाजी मंदिर खुलं होतं) दोनच मिनिटात त्या परत आल्या. मग नाटकाबद्दल पंडितजींच्या-माझ्या गाण्याबद्दल भरभरून बोलल्या. माझ्या 'लागी करेजवाँ कट््यार' गाण्याने तर बेगमजींच्या डोळ्यात पाणी तरळलं. 'कट्यार' बेगजींना एवढं आवडलं की नंतर त्यांनी ते सात-आठ वेळा पाहिलं.

या भेटींमध्ये मी बेगमजींच्या खूप जवळ गेले. 'कट्यार...'नंतरची माझी 'वीज म्हणाली धरतीला', 'होनाजी बाळा' अशी बहुतेक संगीत नाटलं बेगमजींनी पाहिली. मुख्य म्हणजे नंतर जेव्हा जेव्हा त्या कार्यक्रमांसाठी किंवा आकाशवाणीवर रेकॉडिर्र्ंगसाठी मुंबईला येत, तेव्हा हक्काने मला बोलावून घेत. त्यांच्याबरोबर मागे तंबोरा घेऊन साथीला बसवत. एवढंंच नाही, तर अनेकदा एखादी सुरावट मुद्दाम मध्येच सोडून देत आणि ती मला उचलायला सांगत.

एकप्रकारे माझं हे त्यांच्याकडे चाललेलं संगीतशिक्षणच होतं. ऊर्दू शब्द नजाकतीने कसे उच्चारायचे, त्यांची फेक कशी करायची, आवाजाचा लगाव... असं बरंच काही त्यांच्या मागे बसूनच मी शिकले. अशा त्यांच्या अनेक जाहीर-खाजगी मैफलीत मी त्यांना साथ केलीय. त्यांच्या या मैफली ऐकायला तेव्हा संगीतकार जयदेव, मदनमोहन, नगिर्स अशी बडीबडी मंडळी यायची. त्यांच्यासमोर गाताना अख्तरीबाई देहभान हरपून गझल-ठुमरी गायच्या आणि ते माझ्या पथ्यावरच पडायचं. मी जेवढं आत्मसात करता येईल तेेवढं करायचे. अर्थात हे सारं एकलव्य वृत्तीने चाललेलं असायचं.

... त्यांच्याबरोबरच्या कार्यक्रमांचा असा सिलसिला सुरू असतानाच एक दिवस मी धीर करून त्यांना म्हणाले, 'बेगमजी मुझे आपके पास गाना सिखना है.'

क्षणाचाही विलंब न लावता त्या म्हणाल्या, 'जरूर, क्यों नही? मेरी बेटी बनो और गाना सिखने के लिये लखनौ आ जाओ.'

... पण मला त्यांची बेटी नाही बनता आलं, लखनौला नाही जाता आलं. माझ्या मागे तीन भावंडं होती. त्यांची जबाबदारी माझ्यावर होती. दोन बहिणींची लग्नं करायची होती, भावाचं शिक्षण करायचं होतं. तसंच नाही म्हटलं तरी गायिका-अभिनेत्री म्हणून काहीएक कारकीर्द मागीर् लागली होती. ते सारं इथे सोडून लखनौला जाणं परिस्थितीमुळे शक्य नव्हतं. वसंतराव, अभिषेकीबुवा सारेच जा-जा सांगत होते. पण नाही जाता आलं, एवढं खरं!

तेव्हा वय विशी-बाविशीचंच होतं. जाऊन पाच वर्षं शिकून आले असते, तरी आजच्या फय्याजची कारकीर्द काही वेगळीच घडली असती. कारकीर्दही एकवेळ बाजूला ठेवू. संधी असतानाही मला बेगम अख्तर यांच्याकडे रीतसर गाणं शिकता आलं नाही, याचीच खंत आहे आणि ती आजन्म राहील.

दूर देशी गेला बाबा

‘हॅलो सर, मी बर्लिनहून बोलतोय! सर मी २८ वर्षांचा आहे आणि माझे आई-वडील ठाण्यात असतात. बाबा म्हणतायेत तू शिक अजून. ते कर्ज काढतायेत, पण मला वाटतंय आता बस्स! मी पीएच.डी. झालोय..’ नावसुद्धा न सांगता हा मुलगा ऊर फोडून बोलत होता. माझ्या तोंडून फक्त.. हं.. हं..! ‘मी परत ठाण्याला चाललोय, बाबांना सांगणार आहे, तुम्ही रिटायर व्हा! माझे बाबा खरंच दमलेत हो.. गेले काही दिवस मी खूप दिवस अस्वस्थ होतो, पण काय करावं सुचत नव्हतं. इंटरनेटवर ‘दमलेला बाबा’ गाणं ऐकलं आणि परतीचं तिकीट काढलं.’ आता माझ्या तोंडून ‘हं.. हं’ सुद्धा जात नव्हतं, इतका सुन्न झालो मी. एक उच्चशिक्षित तरुण इतका हळवा होऊन छोटय़ा मुलासारखा रडत होता.. बाऽऽऽऽप रे! हे काय आहे? दाद ? चांगल्या गाण्याला प्रतिसाद़़? की रसिकता़़़, हळवेपणा, खरेपणा.. खूप विचार केला आणि उत्तर सापडलं ते एवढंच, की ‘याला म्हणतात नातं.

‘दूर देशी गेला बाबा, गेली कामावर आई..
नीज दाटली डोळ्यांत.. तरी घरी कुणी नाही..’

हे आमचं गाणं ऐकून एक भगिनी रंगात येऊन रसग्रहण करीत होत्या- ‘आजचे आई-बाबा स्वत:मध्येच इतके व्यस्त असतात की, मुलांसाठी वेळ आहे कोणाला? आजची मुलं फार एकटी झाली आहेत. त्यांची व्यथा.. वगैरे वगैरे.. त्या कौतुक करत होत्या. पण ते ऐकताना डोक्यात इतका कल्लोळ झाला की, वाटलं, आम्ही नाही हो इतके वाईट, नाही हो इतके स्वार्थी.. हतबल आहोत आम्ही! ..डोळ्यासमोरून एखादा चित्रपट जावा तसे मी पाहिलेले सगळे व्यग्र ‘बाबा’ सरकत होते..

खूप आधी ठरवूनसुद्धा आयत्या वेळेला बॉसनी महत्त्वाचं काम लावलं, म्हणून मुलाच्या गॅदरिंगला जाऊ न शकलेला ‘बाबा..’, त्याच गॅदरिंगमधलं मुलाचं गाणं फोनवरून ऐकून गाडीत एकटाच टाळ्या वाजविणारा ‘बाबा’, परदेशातून येताना मुलीने फर्माईश केलेली बार्बी डॉल घेऊन वाढदिवसाच्या दिवशी पोहोचण्याचा आटापिटा करताना विमान रद्द झाले, म्हणून रात्री उशिरा पोहोचल्यावर मुलीच्या उशाशी बाहुली ठेवून झोपलेल्या त्या मुलीकडे पाहत आपले अश्रू इतरांपासून लपवणारा ‘बाबा..’, नाटकाच्या दौऱ्यावर असताना दर चार तासांनी आपल्या बायकोला फोन करून सहा महिन्याच्या बाळाच्या कानाला फोन लावायला सांगून ‘हॅलो हॅलो. मी बाऽबा’ म्हणत आपला सहवास देऊ पाहणारा अस्वस्थ ‘बाबा’, घरापासून दूर सहा-सहा महिने बोटीवर, युद्धभूमीवर राहणारा आणि पत्रातून, फोनमधून ‘माझी आठवण काढतात ना मुलं? मी आठवतो ना त्यांना? अशा प्रश्नांना बायकोच्या ‘हो..’ या उत्तरासाठी आसुसलेला ‘बाबा’.. इथपासून ते मुलीचं लग्न ठरल्यापासून रोज ‘बोलता बोलता ठसका लागला म्हणून डोळ्यात पाणी आलं, बाकी काही नाही..’ असं म्हणणारा ‘बाबा’!
बाळाकडे पाहून वेडा होऊन नाचणारा ‘बाबा’, ऑफिसमध्ये अतिशय कडक असलेला, पण घरी शाळा-शाळा खेळताना मुलीच्या हातचा धपाटा आनंदाने खाणारा ‘बाबा’, रात्री उशिरा घरी आल्यावर मुलांच्या केसातून हात फिरवत एकटाच बोलणारा ‘बाबा’, मुलांबरोबर फटाके उडवताना पुन्हा एकदा लहान होणारा ‘बाबा’, कामानिमित्त घरापासून दूर राहूनही दर रविवारी काही तासांसाठी धडपडत घरी येऊन मुलांना डोळे भरून बघणारा बाबा, शिकायला परदेशात गेलेल्या मुलीशी वेब-कॅमवर गप्पा मारताना ‘तू बारीक का वाटतेस गं? तिकडे खूप त्रास होतोय का?’ म्हणत ‘नाही तर सरळ परत ये भारतात’ असं सुचवणारा बाबा..

या सगळ्या बाबांची ‘हाक’, त्यांची धडपड, करिअर, पैसा हे सारे सांभाळत मुलांबरोबर वेळ घालविण्यासाठी ते करीत असलेला आटापिटा- हे सगळं सांगावसं वाटलं!
अशा प्रत्येक पुरुषाला ही बोच असते. जेव्हा मित्र एकत्र जमतात, तेव्हा एकमेकांना खूप मनापासून सांगतात की, ‘थोडा आराम कर, मुलांबरोबर मजा कर’ कळतं, पण साधायचं कधी? कसं? ते कळत नाही. या गर्दीत धावताना आपलं जगणं कुठे आपल्या हातात राह्यलंय?

माझा मुलगा मला जसं म्हणाला की, खूप गमती आहेत माझ्याकडे, आता नको पैसे, तू घरी थांब.’ ..कुठे थांबायचं हे मुलं सुचवतात, पण आपल्यालाच समजत नाही. धावत राहतो आपण. आणि मनात ही भीतीही बाळगतो की, उद्या मुलं मोठी झाल्यावर गरज असेल त्यांना आपली?

अस्वस्थ मनानं हे सगळं संदीप खरेशी बोललो. त्याचं आणि माझं नातं म्हणजे -

न सांगता तू मला उमगते सारे
कळतात तुलाही मौनातील इशारे
दोघांत कशाला मग शब्दांचे बंध
कळ्यांचा चाले कळ्यांशी संवाद.

असं आहे. त्यालाही हे सारे असंच, इतकंच तीव्रतेने वाटत होतं आणि त्याच्यातला हळव्या मनापासून कविता लिहिली. माझ्या अस्वस्थ अवस्थेतच चाल तयार झाली होती. दु:खापेक्षाही उद्विग्नता, फ्रस्ट्रेशन मांडणारी ही चाल आणि ते शब्द यांतून हे गाणं रसिकांच्या मनात खूप खोलवर रूजलं.
प्रत्येक ठिकाणी वेगळे किस्से, वेगळ्या प्रतिक्रिया.. कार्यक्रमात छोटी-छोटी मुलं-मुली आपल्या बाबांना रडताना पाहून सुन्न झाली. कोणी ‘माझ्या बाबाला का रडवलंस’ म्हणून आमच्यावर चिडली. सासरी गेलेल्या मुलींनी ‘बाबा गाणं ऐकलंत?' म्हणत फोन केले. सगळ्यांच्या प्रतिक्रिया तुटक्या, हळव्या आणि दुखऱ्या..

हे गाणं मुलांनी बाबांसाठी ऐकलं आणि बाबांनी मुलांसाठी, आणि बाबांच्या बाबांसाठीही. हे गाणं जितकं बाबाचं, तितकंच ते आजच्या नोकरी-व्यवसाय करणाऱ्या आईचंसुद्धा..

प्रत्येक ठिकाणी गाण्यावर वेगळे किस्से, वेगळी प्रतिक्रिया.. सगळ्या तितक्याच हळव्या, दुखऱ्या.. (इथे वाढू शकतं!!)
आम्हीही घरापासून दूर-दूर पुन: पुन्हा हे गाणं गातो आणि जखम रोज भळभळते. रोज ठरवितो की, या महिन्यात थोडं नीट नियोजन करायचं. मुलांबरोबर करायच्या अनेक गोष्टी घोळतात, पण बघता बघता हा महिना सरकतो.. मग स्वत:लाच पुढच्या महिन्याचं वचन.. हे चुकतंय, ते समजतं, पटतं. जे ठरवतो, ते हातून घडत नाही, यासारखी दुसरी बोच नाही. थोडं थांबायला हवंय. वेग कमी करायला हवाय..

पण निदान हे जमेपर्यंत तरी स्वत:ला टोचून टोचून रोज गायलाच हवं..

‘असा गेलो आहे बाळा पुरा अडकून
हल्ली तुला झोपेतच पाहतो दुरून
असा कसा बाबा देव लेकराला देतो?
लवकर जातो आणि उशिरानं येतो..
सांगायची आहे माझ्या सानुल्या फुला
दमलेल्या बाबाची या कहाणी तुला..’
http://www.youtube.com/watch?v=8FqwOZ7_TOM



-डॉ. सलील कुलकर्णी

वगसम्राट चंद्रकांत ढवळपुरीकर

महाराष्ट्रातील नामवंत तमाशा कलावंत स्वत:ला 'मास्टर` म्हणून संबोधतात. याच परंपरेतले एक वगसम्राट चंद्रकांत ढवळपुरीकर. चंद्रकांत ढवळपुरीकर हे देखील स्वत:ला मास्टर म्हणवून घेत. त्यांना राज्य शासनाचा सांस्कृतिक पुरस्कार प्राप्त झाला होता. वगसम्राट आणि खलनायक म्हणून परिचित असलेले ढवळपुरीकर आज आपल्यात नाहीत, पण एक कर्तबगार तमाशा कलावंत म्हणून त्यांनी आपला स्वतंत्र ठसा तमाशा सृष्टीत निर्माण केला होता.

1932 साली ढवळपुरीकर ता. पारनेर जिल्हा अहमदनगर येथे जन्मलेले चंद्रकातजी केवळ तिसरी इयत्ता शिकले. पण अनेक वगातील भूमिका त्यांना तोंडपाठ असत. 1943 साली देवीदासबुवा राधेकर यांच्या तमाशात ते नाचकाम करीत. विष्णुबुवा बांगर बेव्हेकरसह देवीदासबुवा राधेकर अशा फडात ते काम करीत असत.

आचाऱ्याच्या हाताखाली राहून बिगारी काम करणाऱ्या चंद्रकांत ढवळपुरीकर यांनी पायात चाळ बांधून, केस वाढवून नाच्याचे काम सुरू केले. 1955 सालापासून ते सहनायकांच्या भूमिका करू लागले. पुढे चंद्रकांत ढवळपुरीकर आणि दत्ता महाडीक पुणेकर या जोडीने अनेक वर्षे महाराष्ट्राचे रंजन केले. भिल्लांची टोळी, महाराष्ट्र झुकत नाही, लग्ना आधी कुकू पुसले, असे पुढारी ठार करा, शत्रुशी झुंजला बांगला, ज्ञानेश्वर माझी माऊली, इंदिरामठाचे गुपीत, महाराष्ट्र तू जागा राहा अशा अनेक वगनाटयांमध्ये चंद्रकांत ढवळपुरीकर यांनी गायक, खलनायकाचे काम केले.


प्रा.डॉ.प्रकाश खांडगे