Saturday, September 10, 2011

काही नविन रचना

रुसलेले शब्द

माझेच शब्द आज मला वाटतात अनोळखी
भावनाही त्यांच्यातल्या ना दाखविती आपुलकी..

शब्दांनाही त्या मी जन्म दिला कवितेसाठी
प्रिय होते, जवळीक त्यांची माझ्यासाठी..

शब्दांची गुंफून फुले मी कितीकदा माळली
गंध घेतला ज्यांनी त्यांना ती आवडली..

भावना कोणतीही असो शब्द मला सापडले
कोणत्याही क्षणी मला ना ते परके वाटले...

आज भावना माझ्या मनात असती
शब्द का न येती भावनेत भिजुनी..

शब्द कधी ना रागावती प्रतिभेची साथ असता
कवितांनाही बहर येतो बाहेर वसंत नसता..

शब्दांवर प्रेम माझे, शब्द माझे सोबती
येतील पुन्हा जरी रुसले माझ्यावरती


श्रीकांत आफळे, पुणे

भेट विठ्ठलाची



विठ्ठलाच्या भेटीसाठी
जीव आसुसला
वारकरी टाळमृदंगाच्या
गजरात पायी हा चालला..
मनी एक आस
विठ्ठल भेटावा
डोळे भरूनी त्याला
एकदा पहावा...
तहानभुक हरते
पायी चालताना
जीवनाचे सार्थक होते
नाव घेताना..
ओठात अभंग
किर्तनी दंग
चालली वारी
कधी पावसाचा संग...
विठू माझा भक्तांसाठी
उभा विटेवरी
नाम गजरात
दुमदुमे ही पंढरी..
चंद्रभागेमध्ये
करुनिया स्नान
विठोबाचे दर्शन
देई समाधान..
भक्तांचा सोहळा
भक्तित न्हाहला
ह्दयाचा विठ्ठल
आनंदुनी गेला...


श्रीकांत आफळे, सी-१--९, गुरुराज सॉसा. पद्मावती, पुणे-४११०३७..फोन- (०२०) ४३६७५३२. मोबा.९८९०३४८८७७

shrikantmaitreya@gmail.com

Friday, September 9, 2011

पेशवाईत गणेश उत्सव


दररोज शिजणारा तीनशे किलो तांदूळ-गहू..., पाच दिवसांच्या उत्सवावर तब्बल ७० हजार रुपये खर्च... अन् मातीसह सोन्याच्या मूर्तीची गणेशस्थापना... अशा श्रीमंती थाटात पेशवाईत गणेश उत्सव साजरा होत असल्याचे पेशवे दफ्तरातील कागदपत्रांवरून सिद्ध झाले आहे. पुण्यातील इतिहास अभ्यासक-संशोधक पांडुरंग बलकवडे यांनी शोधलेल्या पेशवाईतील ५० वर्षांच्या जमा-खर्चातून पेशवे गणेशोत्सवातील भव्यता समोर आली आहे.

सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ लोकमान्य टिळकांनी रोवली असली, तरी पेशवाईत शनिवारवाड्यावर गणपती उत्सव मोठ्या थाटा-माटात साजरा केला जायचा. त्या संदर्भात मोडी लिपीत उपलब्ध असलेल्या कागदपत्रांचा अभ्यास बलकवडे यांनी केला आहे. त्यातून उत्सवावर होणारा खर्चच नाही, तर त्याची भव्यताही उजेडात आली आहे.

' शनिवारवाड्याच्या गणेश महालातील सोन्याच्या गणपतीपुढे मातीच्या उत्सवमूर्तीची स्थापना केली जायची. त्यासाठी भव्य मखराची निर्मिती होत असे. पूजा-अर्चा, व्रतवैकल्ये, मंत्रपठण यासारख्या धार्मिक विधींसाठी रात्रंदिवस २१ ब्राह्माणांची नेमणूक केली जात असे. त्याशिवाय, कीर्तनकार, प्रवचनकार, हरदास हेदेखील देवापुढे सेवा सादर करत,' असे बलकवडे यांनी सांगितले.

विविध जाती-धर्माचे देशभरातील नावाजलेले कलावंत सादरीकरणासाठी आवर्जून या उत्सवात सहभागी होत असल्याचेही या कागदांवरून निदर्शनास येते, असेही बलकवडे यांनी स्पष्ट केले.
................

खर्च ७० हजारांहून अधिक

' पाच दिवसांच्या या उत्सव काळात दररोज दोन्ही वेळेस हजारो लोकांना पंचपक्वांन्नांचे भोजन प्रसाद म्हणून दिले जात असे. त्यासाठी दिवसाला तीनशे किलो याप्रमाणे पाच दिवसांत १५ पोती गहू-तांदूळ शिजवला जात असे. १८ व्या शतकाच्या उत्तरार्धात या पाच दिवसांच्या उत्सवासाठी तब्बल ७० हजार रुपयांहून अधिक खर्च व्हायचा,' अशी त्याची भव्यताही बलकवडे यांनी कथन केली.

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/9901649.cms

Thursday, August 11, 2011

असंख्य भावा-बहिंणांच्या प्रेमाला ..


राखी बांधणा-या आणि ती निभावणा-या असंख्य भावा-बहिंणांच्या प्रेमाला सादर समर्पण




नाती असतात स्नेह वाढविणा-या असंख्यात रुजणारी

नाती असतात प्रेम करणा-या असंख्याच्या मनात साठणारी

नाती म्हणूनच असतात बळकट

नाती म्हणूनच केवळ नसतात रेशमाचे धागे

धाग्यातली धग असते ती दोन मनांच्या ओसंडून वाहणा-या रक्तामध्येच..

Tuesday, July 19, 2011

रूपांतरीत अनुवादाचा वेगळा प्रकार आवडला



-प्र. के घाणेकर
मला हे पुस्तक खरोखरीच आवडले. रुपांतरीत अनुवादाचा हा वेगळा साहित्य आविष्कार या निमित्ताने अनुभवता आला. त्यातल्या कथा केवळ `बीज` घेतात बाहेरचे पण त्यातला परिसस्पर्श मात्र अस्सल, या मातीतला आहे....
इतिहासाचे अभ्यासक आणि पर्यटन विषयावरचे लेखक प्रा. प्र.के घाणेकर यांचे हे मत आहे
`एका परिसाची कथा` या पुस्तकाविषयीचे....


पुस्तक प्रकाशनाचा अनौपचारिक कार्यक्रम पुण्यात मराठा चेंबरच्या एका सभागृहात झाला. मेहता पब्लिशींग हाऊसने
प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचा सोहळा लेखक मिलिंद जोशी यांनी स्नेहमिलनाचा आनंद म्हणून पुण्यात भरविला.
मिलींद जोशींचे घाणेकर सर हे महाविद्यालयात शिकवायला होते...गुरूने आपल्या एका शिष्याच्या साहित्य कर्तृत्वाचा सन्मानच या निमित्ताने केला. शिष्याने त्यांना पुस्तकाच्या प्रकाशनाला बोलावून गुरूदक्षिणाच दिली.

इतर भाषेतल्या चांगल्या लेखकांच्या चांगल्या गोष्टींचे असे रूपांतरीत साहित्य मराठी वाचकांना आवडेल. मेहता प्रकाशनाने असा साहित्याचा ठेवा या पुस्तकाच्या रूपाने दिला याबद्दल आणि रूपांतरीत साहित्याला तो अनुवाद न ठरवता मराठीतले समर्पक नाव द्यावे अशी अपेक्षा घाणेकरांनी व्यक्त केली.

सारे मोठे लोक बेशिस्त वागतात. चाकोरीतले जीवन सोडून मोकळे-ढाकळे वागायला लागलात तर तुम्हाला नवीन आनंद घेता येईल. साचेबंदपणा तुम्ही सोडत नाहीत तोपर्यत आयुष्याचा वेगळा अनुभव घेता येणार नाही..
मिलिंद जोशी यांनी यावेळी आपले मत व्यक्त करताना सांगितले. लेखकाने तर माणसे, निसर्ग आणि आजुबाजुचे निरिक्षण करणे ही तर अत्यावश्यक गरज आहे. मीही लहानपणी खूप भटकलो. हिंडलो. पश्चिम घाटात, कोकणात निसर्ग पाहिला. कोकणातल्या माणसात त्यांचा बनलो. मनुष्यस्वभावाच्या छटा पाहिल्या.

यातूनच इतर भाषेतल्या साहित्याचा आस्वाद घेतला. त्यांतल्या काही कथा भावल्या त्यातले बीज घेऊन तयार झालेल्या काही कथा अस्सल मराठी वातावरणात लिहल्या. त्यातल्याच २० कथांचे `एका परिसाची कथा` हे पुस्तक तयार झाले.
ते मेहतांनी प्रकाशित केले याचा आनंद मिलिंद जोशींनी व्यक्त केला.
चांगले लेखक आणि चांगले वाचक मिळावेत यासाठी प्रकाशक संस्था नेहमीच अशा लेखकांच्या शोधात असते. मिलिंद जोशी हे असेच लेखक. आम्हाला यापुढेही ते सहकार्य देतील आणि आणखी पुस्तके प्रकाशनासाठी मिळतील अशी आशा सुनिल मेहता यांनी व्यक्त केली.

समारंभात साधेपणा होता. बडेजाव वगळला होता. अनेक वर्षानंतरचे मित्र भेटले. सध्या ते मुंबईत असातात.
तसे जोशी पुण्यातले. नातेवाईक आणि मित्रपरिवाच्या या भेटीने भारावलेल्या मिलिंद जोशींच्या काकांनीही
यात सहभाग घेऊन मिलिंद जोशींच्या आई-वडीलांना साहित्याची आवड होती पण ती आज मुलाच्या पुस्तकाच्या रूपाने प्रत्यक्षात पूर्ण झाली याचा आनंद शब्दातून व्यक्त करून त्यांच्या पुढच्या लेखनासाठी आशिर्वाद दिला.


सुभाष इनामदार, पुणे
mob- 9552596276
subhashinamdar@gmail.com

Sunday, July 3, 2011

अस्सं सासर सुरेख बाई...

महिन्याभरात श्रावण येईल. मुली, महिला आणि नव्याने लग्न झालेल्या नवरीकडे मंगळागौर पूजली जाईल. आणि त्यातल्या भोंडल्यात हे नक्की म्हटले जाईल..
अस्सं माहेर सुरेख बाई खेळाया मिळतं
अस्सं सासर द्वाड बाई कोंडोंनी मारीतं....
ऐकायला या भोंडल्याच्या ओळी चांगल्या वाटतात. भोंडला म्हणणा-या मुली हासून वेळ मारून नेतात.. पण मला मात्र सासरचा अनुभव अतिशय चांगला मिळाला . म्हणूनच तो शब्दात मांडायचा हा प्रयत्न केला आहे.
मुलगी सासरी आली की, ती सतत ताणतणावाखाली. घरातल्या मोठ्या माणसांच्या दबावाखाली . मान खाली घालून वावरत असे..पण मला मात्र सासरी आल्यानंतर माहेरची आठवणही होऊ नये इतके प्रेमळ सासू-सास-यांकडून लाभले. आणि मी सतत अस्सं सासर सुरेख बाई ..म्हणत त्या घरात रममाण झाले. माहेरून व्हायोलिन वादनाच्या कलेचे रोप घेऊन आले आणि सासरी त्याचा वटवृक्षात रुपांतर झाले असे म्हटले तर ते वावगे ठरू नये..
मुलगी सासरी आली की, त्या घरातल्या रीतीभाती समजून घेऊन, घरातल्या माणसांचे स्वभाव ओळखून त्या घराला समजून घेत हळूहळू त्या घरात रुळते. मी माझी कला घेऊन त्या घरात आले. आणि सर्वांना कलाकार सून मिळाली म्हणून खूप आनंद झाला.
तुम्हाला सागते..माझ्या यजमानांनी तर मला दूरदर्शनवरील कार्यक्रम पाहूनच पसंत केले. मग काय कलाकार बायको मिळल्याच्या त्यांना केवढा अभिमान. तो आजही आहे. ते तर सतत माझ्या पाठीमागे खंबीर उभे असतात. माझे दीर, जाऊ, नणंदा या सर्वांनाही माझ्या कलेचे काय कौतूक केले . ते सारेच माझ्या कलेला नेहमीच देतात आजही...
आमचे एकत्र कुटुंब असल्यामुळे आम्ही सर्वजण एकमेकांना समजावून घेऊन, सर्वांच्या आवडी-निवडी जपून सगळे सण, समारंभ, वाढदिवस खूप छान त-हेने साजरे करतो. सासू-सासरे जुन्या वळणाचे असल्यामुळे सुरवातीला थोडे मतभेद झाले. वादही झडले. पण आम्ही आणि त्यांनी दोघांनीही काही गोष्टींशी तडजोड करून त्यातून सुवर्णमध्य काढून पुढे गेलो. कोणत्याही गोष्टी जास्त विकोपाला जाणार नाहीत याची खबरदादारी घेतली. माझी थोरली जाऊ आणि मी तशा एकाच कार्यालयात . म्हणून का म्हणाना आमचे नाते बहिणीसारखे बनले. टिकले. वाढले. कायम राहिले.
माझा कुठेही कार्यक्रम असला तर ही सारी सासरची माणसे कौतूकाने आवर्जून हजर राहतात. दाद देतात. सारी मदत करतात.
आम्हा दोघी सुनांना सासूबाईंनी मुलाप्रमाणेच वागवले. आमच्यावर त्यांचे खूप प्रेम होते. आमच्या मुलांनाही त्यांनी अतिशय प्रेमाने सांभाळले. त्यामुळेच तर आम्हाला नोकरीसाठी बाहेर पडताना कधीच मुलांची काळजी करावी लागली नाही. मुलांनाही आजी- आजोबांचे प्रेम भरपूर मिळाले. सहवास मिळाला. त्यांच्यावर चांगले संस्कार झाले.
आजकाल ब-याच मुलींना एकत्र कुटुंब नको असते पण एकत्र कुटुंबाचे अनेक फायदे मुलींनी नक्कीच पाहिले पाहेजेत.
अशा माझ्या प्रेमळ हौशी, संगीतप्रेमी सास-यांना नुकतीच ११ जूनला देवाज्ञा झाली..पण त्यांचे आशिर्वाद कायम आमच्या पाठीशी असतील याची खात्री आहे.
असचं सासर सगळ्या मुलींना मिळावे. त्यांनी ते जपावे. वाढवावे. संस्कार हेच धन पुढच्या पुढीपर्यंत द्यावे यासाठी कसोशिने प्रयत्न करावा...
अखेरीस मी म्हणेन...अस्सं सासर सुरेख बाई...सर्वांना मिळावे.....


सौ. चारूशिला गोसावी,
व्हायोलिनवादक, पुणे
मोबा..९४२१०१९२९९
ई.मेल-chrusheelagosavi@gmail.com

Thursday, June 30, 2011

नवा गडी नवे राज्य



काळाची पावले ओळखून अभिनयाने जिवंत केलेले नाटक

काळ बदलला. तरूण वर्ग स्वतंत्र झाला. मुली स्वतःच्या मताने निर्णय घेऊ लागल्या. घर आपले...राजा-राणीचे हवे. दोघेही नोकरी करणारे. पैसा बक्कळ.. कपड्यात बदल झाला. सारे कसे मोकळे-ढाकळे आले. जमाना इंटरनेट, लॅपटॉपचा आला. घरात स्वयंपाकापेक्षा बाहेरून पार्सल मागविले की झाले... घराची सजावट बदलली ..तरी घराला भिंती हव्यातच. प्रायव्हसी म्हणतात ती. लग्ना आधीचे सारे लग्नानंतर चालत नाही. पतीला मैत्रीण चालते ..पण पत्नीला मित्र असणे हे बरे नव्हे.... ते न शोभणारे....
सांगायचे तात्पर्य....हे गडी नवे पण राज्य तेच जुने... पण नव्या कोंदणात सजविलेले.... तसे सांगायचे म्हणजे संशयकल्लोळ हो...
नवा गडी नवे राज्य....ह्या नाटकाने आपला शतकमहोत्सवही साजरा केलाय. उमेश कामत आणि प्रिया बापट यांच्या भुमिकांनी नाटकाला जिवंतपणा येतो... खरं म्हटले तर हे आजच्या काळाचे नाटक आहे.. जुनी पल्लेदार वाक्य नाहीत. स्वगते नाहीत. एकाच वेळी बराच काळ चालणारे प्रसंग नाहीत. वाक्यांना मराठी भाषेची पारंपारिक चौकट नाही..नवे शब्द आहेत. वाक्यांची गरज फक्त सांगण्यापुरती त्याला भाषेची झालर हवी कशाला?
एकूणच मालिकांमध्ये जसे तुकड्यांनी घटना पुढे जाच रहातात तसेच काहीसे छोटे प्रसंग. कांही बेडरूम प्रसंग. तसे बोल्ड. पण नाटकाला आवश्यक. आणि स्पष्ट सांगायचे झाले तर या नाटकाने तरूणाईचा वर्ग रंगमंदिराकडे खेचला गेला आहे. नाटकाला बुकींग चांगले होते. आणि दुसरे म्हणजे उमेश कामत, प्रिया बापट यांचा इस्टंट अभिनय पहायला मिळतो. दोघांचेही चेहरे बोलतात. भावना दिसतात. त्याला प्रेमाचा स्पर्श होतो. नाते अधिक फुलून येते.
एकदंत क्रिएशन्सने रंगमंचावर आणलेले नाटक समीर विध्वंस यांनी ज्या नेमक्या रितीने ते दिग्दर्शित केले आहे. नाटकाला गती दिली. गेयता आणली. प्रसंगाला सतत हलते ठेवले. कलावंतांना पुरेसे मोकळे सोडले. आणि परिणामकारक प्रयोग सादर करण्यात ते यशस्वी झालेत.
क्षितीज पटवर्धन यांनी हृषीकेश (उमेश कामत) आणि अमृता( प्रिया बापट) ह्या नवीन लग्न झालेल्या तरूण जोडप्यात उद्भभवलेल्या संसारातली ही मित्र कहाणी लिहली आहे ती संवादात कागदावर उतरवली आहे..क्षितीज पटवर्धन यांनी. चटकदार संवाद. त्याक्षणी चपखल वाटतील अशी वाक्ये. अधुनिक जोडप्यांना काळजात नेमकी घुसतील अशी शब्दरचना...यामुळे नाटक तुमच्यासमोर खिदळत रहाते.
पुरूषवर्गाला प्राधान्यक्रम देणारी आणि शेवटी ही सारी संशयाची धार शुल्लक करणारी ही घटनाक्रमाने सांगणारी काहीशी नाटकी कृत्रिमता नाटकाला सिनंमातल्या पटकथेचे रूप देते. एकमेकांना लग्नापूर्वीपासून ओळखणारे हे आधिचे प्रेमिक जेव्हा पती-पत्नी बनतात..तेव्हा पहिले काही दिवस सोडले तर संशयवाढविणारे जातात. अमृताचा मित्र हिम्मतराव जेव्हापासून घरी येतो..तेव्हापासून त्या दोघांची मैत्री तशीच खुल्ली..तीच खटकचे...नाटकाला तीथेच सुरवात होते. संशयाने सारा खेळ..पालटतो. वातावरण गंङीर बनत जाते...आणि शेवटी हे सारे संशयाचे बळी ठरतात..हे सिध्द झाल्यावर सुखांताने शेवट होतो.
त्यातच पुरूषाची जुनी मेत्रीण घरी आल्यावर तिने केलेले दावे ऐकल्यावर संसारातील दोघांनीही संयम सोडल्याचे नाटकलेखक दाखवितो. पुरूषी अहंकाराला सांभाळताना स्त्रीच्या दुख-या मनालाही तो फुंकर घालतो. कहाणी रंगवताना त्याला भावनेचा तात्पुरता मुलामा दिल्यासारखे वाटते. इथे हे नाटक काही सांगते म्हणून पहायाला जावू नका... ते तुमची करमणूक फुल्ल टाईमपास करणारे आहे... जुनाच विशय नवीन बाटतील भरून पुन्हा ताज्या दमाच्या कलाकारांकडून तुमच्यापर्यत आणलाय एवढेच.
मोकळेपणानी वावरणारी ही पात्रे तुम्हाला खुशीत ठेवतात. भावनेला हात घालून प्रसंगी तुमच्या डोळ्यात पाणीही आणतील... पण हे कसब आहे ते कलावंताचे. उमेश कामत, प्रिया बापट यांची जोडी रंगभुमिवर नवे राज्य गाजविणार हे सांगण्यासारखी मस्त दिसतात.. छान दिसतात. मोकळी वावरतात. त्यांच्या अबिनयात सहजपणा आहे. संवादात विलक्षण साधेपणा आहे. सफाई आहे. चेह-यावर बोलके भाव आहेत. टटका लावणारी मुद्रभिनयाची ताकद दोघांकडेहगी आई. म्हणूनच तेच या नाटकाचे खरे आकर्षण आहे.
हेमंत ढोणेंचा हिम्मतराव विलक्षण वेगळा..ग्रामिण मातीचा गंध घेऊन आलेला. रसरशीत , तरतरीत आणि गंमत सहजपणे कशी करावी ते सांगणारा वठलाय.त्यामानाने प्राजक्ता दातार थोड्या डाव्या वाटतात. त्याकेवळ भूमिका करतात.. त्या अंगावर येत नाहीत.
प्रसाद वालावरकारांच्या नेपथ्यातून आजचे मुंबईतले श्रीमंती घर , त्यातले महागडे रुप..सारेच दिसते. भासते. रंगसंगती उत्तम आहे. जसे पडद्यावर साकारणे गीत कथेला पूरक असते तसे ऋषीकेश कामेरकरांचे संगीत आणि त्यांनी तयार केलेले गीत नाटकाला मोहकता देते.
शितल तळपदे यांची पूरक प्रकाश योजना प्रसंगाना अदिक उठाव देते.
चंद्रकांत लोहकरे यांनी निर्मित केलेल्या या नाटकाने अजच्या काळाला पटेल. रुचेल आणि आवडेल असे नाटक देऊन नाटक हलकेफुलके आणि योग्य विषयावरचे आणले तर ते पेक्षक नक्कीच आपले मानतात याचे दर्शन घडविले आहे...



सुभाष इनामदार, पुणे
Mob. 9552596276
subhashinamdar@gmail.com

Wednesday, June 15, 2011

विजय मागिकर साठीत



सांस्कृतिक क्षेत्राचा वाटाड्या
आमचा सांस्कृतिक क्षेत्रात वावरणारा...कलावंताचा चाहता असणारा..
स्वरानंदात कार्यकुशलतेने कार्यरत असलेला विजय मागिकर साठीचा झाला..
त्यानिमित्ताने त्याच्या खासगी आयुष्यासह
त्याच्या कलाजिवनाचा घेतलेला हा धावता आढावा...




प्रिय विजय,
परवा विनयाचा फोन आला तेव्हा जाणवले....तू साठीचा झालास.
आपण पीडीएत भेटलो. अभिनय येतो असा समज होता. पण भालबा केळकरांच्या दुस-या फळीत रमलो.
पडद्यामागचे कलावंत झालो. पडेल ते काम करून नाटक किंवा प्रसंग नाट्य दर्शनात
कधीतरी नगण्य भूमिकेत वावरलो. पण यामुळे व्याक्तिमत्व विकासाचा पाया घातला गेला.
नट म्हणून कधीतरी दिसू.. एखादी तरी छोटी भूमिका मिळेल अशी आशा बाळगून तीन-चार वर्ष पीडीएत रमलो.
चर्चा ऐकत गेलो. कानावर पडेल ते साठवत राहिलो. यातून एक नक्की झाले.
आपण नाटकाच्या पडद्याआडचे वारकरी. कधी ज्योती मेंहेंदळे..तर कधी राणी पारसनीस, तर कधी चंद्रकांत दिघे,
अजित सातभाई, दिलिप वेंगुर्लेकर यांच्या तालमी पहात गेलो. नट म्हणजे काय... त्या भूमिकेत वावरणे...
कसे ते पहात गेलो.. त्यातच रमत गेलो.
यातूनच निराशेचे..अपयशाचे ढग पदरी पडत गेले... सोबत राहिलो.
आज काहीतरी नवे शिकायला मिळेल या जिद्दीने डेक्कनवरच्या महिलाश्रमाच्या तळघरात त्यानाटकाच्या...
भालबांच्या सहवासात दिवस कसे गेले कळालेही नाही.
मात्र एक झाले. तुझी मैत्री मिळाली. एकटाच कॉट बेसिसवर रहात असल्याने तुझ्या रेव्हेन्यू कॉलिनतल्या घराने
आयुष्यातले आनंदाचे क्षण दिले. नाना आणि आईंचा प्रेमाचा सहवास मिळाला. पुण्यातला एकटेपणा नाहीसा झाला.
पुढे विनयासारखी सखी तुझ्या आयुष्याच्या संसारात दाखल झाली. आणि तुमचे घर अधिक परिचयाचे झाले.
अर्थात याला तुझी प्रेमळ विचारपूस... मैत्रीची घट्ट विण... आणि मोठ्या भावासारखा दिलासा...सारेच मिळाले....

तुझ्या संसारावर वरूणरुपी नवे पर्व दाखल झाले. घराला घरपण झाले. नानांचे आणि आईंच्या मायेची सोबत लाभली.
तुझ्या घरच्या मोकळ्या वातावरणातून मैत्रीचा धागा जुळत गेला...गुंफत गेला... मने मोकळी झाली.
विजय मागीकर हे नाव पुढे माझ्या आयुष्यात कायमचे जोडले गेले.

विजय,
शिक्षणाच्या फारशा फंदात न पडता तुझ्या तरतरीत स्वभावाने आणि हजरजबाबीपणाने गरवारे कंपनीत
आबासाहेब गरवारेंचा पी ए म्हणून तु नोकरी पटकावलीस.
चार-पाच वर्षे ती केल्यानंतर स्वतःचा व्यवसाय सुरू करायचे मनी घेतलेस.
लिक्विड साबणाचा पुरवठा करण्याचे नवे तंत्र आत्मसात केलेस. रेव्हेन्यू कॉलनीतल्या घरात मागच्या बाजूला
शेडमध्ये हा व्यवसाय दमदारपणे चालविलास. थोडिथोडकी नव्हे तर तीस-बत्तीस वर्षें.
मात्र तसे तुझे घर पाहिले की याला नोकरी-व्यवसाय करायची काय गरज असा प्रश्न मला नेहमीच पडे.
आजही घरात विद्यार्थ्य़ींसाठी खोल्या भाड्य़ाने देऊन तुझे छान चाललेय. मात्र स्वतःच्या जागेचा प्रश्न .
भाडकरूंच्या कटकटी . कोर्टाचे खेटे. यातून घर अगदी स्वतःचे बनविलेस.
आताही तुझ्या घराची ओढ लागावी अशी ती वास्तू आम्हा मित्रांना सारखी खुणावते आहे.

दिवसाचे काम संपले की तु कलेच्या प्रांतात रमलास . दिग्दनर्शनाच्या आवडीतून शापीत आणि
पुढचे पाऊल मध्ये तेही साध्य केलेस. शापितच्या वेळी तूझे असिस्टंट डायरेक्टरपद तुझी चित्रपटाबाबतची जाणीव
जागृत करून नवीन क्षेत्रात पुढचे पाऊल पडले. राजदत्तांच्या मार्गदर्शनाचा लाभ गोट्या या सिरियलमुळे तुला झाला.
पुढचे पाऊल मध्ये मानसीनेही (विनया) छान काम केले. यातून चित्रपट माध्यमात स्थायिक झाल्यसारखे वाटले.
हिंदीतही पद्मनाभ यांच्यासारख्या दिग्दर्शकाच्या हाताखाली शिकण्याचा योग तुला आला.
खरे तर तू त्यातच करियर करायचा..पण नाही. तुझी भूक कलेची आणि कलावंतांच्या सहवासाचा अधिक होती.

विजय, तुझ्यामुळे विनय नेवाळकर (शापित), राजदत्त (दत्ता मायाळू), संजय ऊपाध्ये, श्रीकांत पारगावकर,
विठ्ठल वाघ, हिमांशू कुलकर्णी, भास्कर कुलकर्णी, गोविंदराव बेडेकर, ...असे कितीतरी माझ्या परिचयाचे झाले.
राजन-साजन मिश्रांसारख्या बुजुर्ग गायकांनाही तुझा सहवास हवासा वाटतो.. ते मी पाहिले आहे..यापेक्षा काय हवे?
तुझ्या ओळखींतून पुण्याचे सांस्कृतिक क्षेत्र जवळून अनुभवता आले. जाणीव वाढली. संगीत, साहित्य, नृत्य,
आणि चित्रपट क्षेत्रात तुझा दबदबा हेवा वाटण्यासारखा वाढत राहिला.

मला आठवते पं. भिमसेन जोशींना भारतरत्न जाहिर झाला. तेव्हा तू मला त्यांच्या पहिल्या पत्नीची मुले राघवेंद्र
आणि आनंद ..जी दोघेही पुण्यात धायरीत रहातात..त्यांची संगीत क्षेत्राला माहिती व्हावी म्हणून
ई-सकाळच्या माझ्या कार्यालयात आलास. आपण राघवेंद्र आणि आनंदयांच्यावर व्हिडीओ स्टोरी केली..
पुढे स्वरानंदच्या कार्यकारीणीला तुझ्या सारखा नवा कार्यकर्ता मिळाला. आमच्या सारख्या परिचितांना तुझी हक्काची साथ मिळाली.

तुला साद घातली की सारी गोष्ट पूर्ण होणार याची खात्री कित्येक मित्रांना आजही आहे.
म्हणून तर तुला तर बरोबर घेऊन जातात.. आजही...
तुही तेवढाच दिलदार पैशाच्या विचार न करता मित्रत्वाचे सारे बंध एकवटून तू मदतीचा हात देतोस.
केव्हाही बोलवा..विजय येणार याची खात्री असते . अगदी पुलंच्या नारायणा सारखा.
आज पुण्याच्या कलाक्षेत्रात तुझा दबदबा आहे. कार्यक्रमाची व्यवस्थापनाची काटेकोर बांधणी करणारा सूत्रधार
तुझ्या रूपात मिळाला आहे. श्रीधर फडकेंपासून मंजूषा कुलकर्णींपर्यत सारेच कलावंत तुझे बनले.
नव्हे तुझ्या स्वभावाने ते आपलेसे बनविलेस. मायग्रेनचा त्रास सोसूनही तू बेंगलोर, हुबळी, धारवाड, कुठेही गेलास. अगदी प्रसंगी मारही खाल्लास...पण ते कुणाला कळूही न देता हे व्रत कायम ठेवलेस...
नेटाने सांस्कृतिक क्षेत्राचा वाटाड्या बनलास.. नवख्या कलावंतांचा मार्गदर्शक झालास......ध्यास एकच...
चांगली मंडळी उत्तम कार्यक्रम करणा-यांना आधार ,मदत करणे .
थोडक्यात म्हणजे....

तुझे मी पण हरविले गेले
नेमके करायचे ते राहूनच गेले
इतरांसाठी आयुष्य वेचताना
स्वतःसाठी जगणे राहूनच गेले

विजय, आता तु साठीत आलास. स्थिर राहून आनंद घे. तुझ्या मार्गदर्शनातून इतरांना उभारी दे. स्वतःसाठी..
कुंटुंबासाठी वेळ दे. वरूणला समजावून घे. मानसीच्या मनाचा तळ शोधण्याचा प्रयत्न कर.
निवारा मिळालाय. आता कालानंद घे.
आतातरी तुला हवे तसे...स्वानंदी वागत रहा... बंधनांची नको करू तमा..
आनंद तर देशीलच.. पण स्वतःतला कलावंत ...संघटक, कुशल मार्गदर्शक बाहेर येवू देत..
तुझ्यात बरेच कांही आहे. बोलण्याचे भान आहे. सांगण्याचे तंत्र आहे. व्यवस्थापनातला मंत्र तुझ्यात आहे.
कलावंतांची फळी तुझ्यामागे उभी आहे. तु नवनिर्मितीचा भार उचल. सांस्कृतिक क्षेत्राला स्वतःचे भान दे.

तुझ्या साठीच्या प्रवासाचा पस्तीस वर्षाचा साक्षीदार असलेला,
तुझाच,

सुभाष इनामदार, पुणे
Mob. 9552596276
Email- subhashinamdar@gmail.com

Wednesday, May 18, 2011

आठवणींची शिदोरी

शब्दातून व्यक्त होणारे हे आमचे मित्र श्रीकांत आफळे. तशी आधी नोकरी केली ...पण नंतर सणक आली नोकरीत निवृत्ती स्वीकारली आणि छंदबध्द जीवन जगण्याचा मार्ग निवडला. नोकरीत असतानाही पत्रिका करणे, भविष्य सांगण्याचा छंद होता. आता मात्र तोच छंद त्यांनी वाढविला. जोपासला.
आता इतरांच्या समस्यांना शब्दाचे माध्यमातून आत्मविश्वास देण्याचे काम करतात.
ते बोलतात जसे गोड तसे. कवीतेतून शब्दांशी खेळण्याची कलाही जाणतात. कविताही रचतात. कथाही रचतात.
तुम्हालाही काही प्रश्न असतील तर जरूर विचारू शकता.
त्यांच्या प्रेमळ वाणीचा स्पर्श तुम्हालाही घडेल..कळलं का?

श्रीकांत आफळे,
सी-१/६, गुरूराज सोसायटी, पद्मावती, पुणे- ४११०३७ मोबा. ९८९०३४८८७७




आठवणींची शिदोरी

आठवणींची शिदोरी
घेऊन तू जाशी
मनात ग तुझ्या
माहेर जागविशी...
आठवेल ग तुला
तुझे बालपण
कधी आईचे
दूधभात भरवण...
आठवतील तुला
राग रूसव्याचे सण
आठवतील तुला
दुःखाचेही व्रण...
आठवेल तुला
तुझी शाळा शिक्षण
मिळता सुयश
आमंदीत होणं...
कळणार नाही तुला
तुझे मोठं होणं
आपसुक कुटंबाची
काळजी घेणं...
आठवेल कधी गाणं
कधी सुरेल वादन
चिंब रांगोळीतून
कलेचं जोपासणं...
संपून हे सारे
माठं होत जाणं
आणि एक क्षणी
सासरी जाणं...
आठवणींची फुलं
जात नाही सुकूनी
काळ कितीही गेला
येता पुन्हा फुलूनी....

Thursday, May 5, 2011

मराठी लावणी पोरकी झाली ...




मराठीतील ज्येष्ठ गीतकार जगदीश खेबुडकर यांचे आज कोल्हापूरमध्ये निधन झाले. मुत्रपिंडाच्या विकारामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. खेबूडकरांच्या निधनाने संपूर्ण मराठी चित्रपट विश्वावार शोककळा पसरली आहे.

गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र काल रात्री त्यांची प्रकृती गंभीर झाली. आज सकाळी कोल्हापूरमधील आधार रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

खेबुडकरांचा जन्म १० मे १९३२ रोजी झाला होता. मराठी चित्रपट सृष्टीत त्याच्या गीतामुळे अनेक चित्रपट अजराअमर झाले आहेत. लावण्या हा जगदीश खेबुडकरांनी मराठी चित्रपटाला दिलेले एक मोठे योगदान म्हणावे लागेल. ज्या काळी मराठी चित्रपट केवळ अभिनेता किंवा अभिनेत्रीच्या अभिनयामुळे चित्रपट गाजत असे. त्या काळात खेबुडकर यांनी स्वतःच्या गीताने चित्रपट अजराअमर केले. खेबुडकर यांनी ३५० चित्रपटांमधून तब्बल पावनेतीन हजार गाणी लिहली आहेत.

पिंजरा,साधी माणसं आणि समाना अशा गाजलेल्या चित्रपटांना त्यांनी संगीत दिले होते.

तुम्हावर केली मी...,राजा ललकारी...,कुठं कुठं जायचं हनिमूनला..., देवा तुझ्या दारी आलो...,ऐरणीच्या देवा तुला..., मला हो म्हणतात लवगी मिरची..., आकाशी झेप घे रे..., कोण होतीस तू... काय झालीस तू...; अशी त्यांची असंख्य गाणी रसिकांच्या होठावर आजही कायम आहेत.

खेबुडकरांच्या निधनामुळे मराठी चित्रपटात एक मोठी दरी निर्माण झाली आहे.

जगदीश खेबुडकर यांच्यावर केलेली कविता ... जीवनगाणे

बहरुनी पुष्पात साऱ्या , गंध माझा वेगळा
लहरुनी छंदात साऱ्या, छंद माझा वेगळा
सूख म्हणती ज्यास ते
ते सर्व काही भोगले
दुःख आले जे समोरी
सोसुनी ना संपले
अंत नाही ज्यास, ऐसा खेळ आहे मांडला
वाट पुढची चालताना
सोबती सारे असे
उतरणीला वळण येता
संगती मम सखि नसे
क्लेष मनिचे लपवण्या, हा मुखवटा मी ओढला
दान द्यावे ज्ञान घ्यावे
जीवनाचे मर्म हे
काव्यरुपी दान देता
तृप्त झाले कर्म हे
दुखाविलेल्या लोचनांनी, पाहतो सुख सोहळा

- कविता खेबुडकर (अमृता पाड़ळीकर)

(ही कविता जगदीश खेबुडकर यांच्या कन्या कविता खेबुडकर यांनी केलेली आहे ).

'कथाकथनातून समाजसेवा'


केदार केसकर यांची आई याही वयात कथाकथनाचे कार्यक्रम करतात ..त्याच हर्षभरित रितीने . लेखक आणि त्यांचा शब्द त्या अचूक रसिकंपर्यंत पोचवीतात. मी तो अनुभव घेतला आहे . मात्र हे लिहलेले आहे केदार केसकर यानीच ....तेच त्यांच्या भाषेत ...


पुराणात सांगितलेल्या ६४ कलांमध्ये आजच्या काळानुसार अनेक नवीन कलांची भर पडत आहे. 'वक्तृत्व' ही त्यातलीच एक कला असे म्हणण्यास हरकत नाही. पण या आपल्यातील वक्तृत्वकौशल्याचा उपयोग समाजाचं देणं परत करण्यासाठी झटणारा माणूस विरळाच. पुण्याच्या सौ. शुभदा केसकर मात्र असेच एक विधायक कार्य अविरत करत आहेत. गेली अनेक वर्षे शुभदा केसकर 'कथाकथनातून समाजसेवा' हा अभिनव उपक्रम राबवितात. लहान मुलांपासून ते जेष्ठ नागारिकांपर्यंत सार्‍यांनाच आपल्या कथाकथनातून भुरळ घालणार्‍या शुभदाताई म्हणजे मूर्तीमंत आत्मविश्वास, कृतज्ञता, जिद्द आणि उत्साह!

गेली १३ वर्षे न थकता, न चुकता कार्यरत असलेल्या शुभदाताईंच्या कार्याची सुरूवात केवळ योगायोगाने झाली. त्या रहात असलेल्या कर्वेनगर येथील नटराज सोसायटीच्या क्रिडांगणावर लहान मुलांना गोष्टी सांगण्याचं आणि त्यांच्या संस्कारवर्गाचं काम त्यांच्या हाती आलं. वाचनाचा छंद लहानपणीच जोपासला गेल्याने हाती जे जे चांगले पडेल ते ते वाचण्याची सवय जडलेली. त्यातूनच काही निवडक कथा त्यांनी लहान मुलांना सांगण्यास सुरूवात केली. मुलांच्या तरल भावविश्वाचे सुप्त कंगोरे डोळसपणानी जपत त्याच बरोबरीने संस्कारक्षम व बोधप्रद कथा सांगत, त्यातील संस्कार मुलांच्या मनावर बिंबवणे आणि एका अर्थाने त्यांच्या निकोप भावी आयुष्याचा पाया घडविणे हे कार्य शुभदाताई आज अनेक वर्षे करीत आहेत.

कथाकथन हे एक कलेसोबतच एक शास्त्र आहे. या शास्त्राला स्वत:चे असे काही नियम आहेत. पुन्हा कथा कथन करायची म्हटली की त्यासाठी नाट्य, अभिनय, देहबोली हे सारं आलच. या सार्‍यांचा सखोल अभ्यास शुभदाताईंपाशी आहे. अभिनयाचं नैसर्गिक अंग असल्यामुळे पूर्वी त्यांनी राम गणेश गडकरी यांच्या नाटकातील प्रवेशांचे एकपात्री प्रयोग अनेक प्रथितयश संस्थातून केलेले आहेत.

पुण्यातील नामवंत शाळा, बालरंजन केंद्र, भारती निवास, पुणे अशा संस्थांतून मुलांसाठी गोष्टींतून संस्कार, युनिवर्सिटी वूमेन्स कौंन्सिल, गोखलेनगर, पुणे अशा समाजसेवी संस्थांसाठी कथाकथन कार्यक्रम त्यांनी केलेले आहेत. कर्वेनगर, पुणे येथील नटराज महिला कार्यकारिणीत नेहमीच त्यांचा उत्स्फूर्त सहभाग असतो. एकांकिका, पथनाट्य, नाट्यप्रवेश , वीरगीत गायन, अभिनय गीत यांचे मार्गदर्शन आणि सादरीकरण त्या उत्तम करतात.

साधारण ३ वर्षांपूर्वी माननीय सौ. सुधा मूर्ती यांच्या कथा त्यांच्या वाचनात आल्या आणि त्या भारावून गेल्या. कथा साध्याच असूनही शब्दांची नैसर्गिक गुंफण, गोष्टींमधील सहजता, प्रसंगातील सच्चेपणा, साधी पण प्रभावी लेखनशैली, त्यातून आपोआप साधला जाणारा स्वसंवाद आणि शेवटी हवा तो सकारात्मक परीणाम साधण्याची हातोटी ही सुधाताईंच्या लेखनातील वैशिष्ठ्ये त्यांना प्रकर्षानी जाणवली. या कथा अभिनयातून आणि कथाकथनातून मांडल्यास त्यांचा योग्य तो प्रभाव पडेल असंही वाटलं. समाजसेवेसाठी झटणार्‍या त्या स्त्रीच्या कथा वाचून त्यांना जाणवलं की लहान मुलांसोबतच महत्वाचे असे इतर असंख्य मुद्दे आहेत.

२०१० साली 'निवेदिता प्रतिष्ठान'तर्फे घेण्यात आलेल्या कथाकथन स्पर्धेत त्यांना श्री. द.मा. मिरासदार यांच्या हस्ते प्रथम पारितोषिक मिळाले. तेथून प्रेरणा घेऊन त्यांनी पुढे 'मातोश्री' व 'आपलं घर' वृद्धाश्रम येथे कथाकथनाचे व भारूडांचे कार्यक्रम, 'परांजपे विद्यालयात' 'जिजाऊ प्रतिष्ठान'तर्फे बालवाडी शिक्षीकांना कथाकथनाचे प्रात्यक्षिक व प्रायोगिक मार्गदर्शन, एस.एन.डी.टी. पुणे येथे 'शिक्षक-पालक संबंध व त्यांचा पाल्यावर होणारा परिणाम' यावरील मार्गदर्शनपर व्याख्यान केले. बालरंजन, पुणे येथील 'सुजाण पालकत्व' या उपक्रमात त्यांनी सुधाताईंच्या अशाच काही कथा सादर करून श्रोत्यांची वाहवा मिळविली आहे.

मुख्य म्हणजे या कथाकथनाला व्यावसायीक स्वरूप न देता, समाजाला काहीतरी चांगले द्यावे या इच्छेनी त्या हा उपक्रम राबवितात. त्यामुळेच यातून मिळणारे मानधन प्रवासखर्च वजा जाता समाजकार्यासाठी वापरण्यास त्या कटीबद्ध आहेत असे त्या आवर्जून सांगतात.

आज सर्वत्र अस्ताव्यस्त पसरलेली, विस्कटलेली समाजव्यवस्था, एका ठिकाणी मानसिक आणि भावनिक गुंता आणि घुसमट तर दुसर्‍या ठिकाणी विभक्त जीवनशैली, वाढत चाललेले ताणतणाव, त्यातून हरवत चाललेले नातेसंबंध, वृद्धांच्या समस्या, लहानांवरचे संस्कार या ज्वलंत प्रश्नांवर चपखल बसेल असा तोडगा कुणापासही नाही. पण एक गोष्ट त्यांना मनापासून जाणवते आणि ती म्हणजे, संवेदनशील आणि तितकचं कणखर मन घडवणे ही या काळाची सगळ्यात मोठी गरज आहे आणि या दृष्टीने होत असलेल्या असंख्य प्रयत्नांमध्ये त्यांनी हा खारीचा पण महत्वाचा वाटा उचललेला आहे.

Monday, April 11, 2011

वसंत नाट्यवैभव




टी.व्ही मालिका, सिनेमे, क्रिकेट आणि अधुनिक विचारांच्या हवेत जगणा-या नवीन पिढीची कानेटकरांच्या कलाकृतींशी क्वचितच भेट झाली असेल.. आणि टी व्ही संस्कृती रूजण्यापूर्वी ज्यांनी कानेटकरांची नाटके आवडीने बघीतली असतील,,अशा सा-यांना वसंत नाट्यवैभव.....ही दुर्मिळ पुर्नभेटच ..सुखद अनुभव देउन गेली.
सुप्रसिध्द लेखक. नाटककार. वसंत कानेटकर..त्यांच्या कारकीर्दीची मागोवा घेणारा कार्यक्रम पुणे, मुंबई आणि नाशिकात वसंत नाट्यवैभव.. स्वरानंद या पुण्याच्या संस्थेमार्फत नुकताच सादर झाला. कानेटकरांच्या काही नाटकातील प्रवेश, काही परिचित. स्वतः कानेटकर व काही मान्यवरांच्या मुलाखतींच्या ध्वनिचित्रफितीतून ..नाट्यगीतांचे सादरीकरण आणि हे सर्व जोडणारे निवेदन..अशा स्वरूपाचा हा प्रयोगच..सादर झाला. त्याला प्रतिसादही चांगला मिळाला.
प्रेमा तुझा रंग कसा, मत्स्यगंधा आणि अखेरचा सवाल या नाटकातील प्रवेश..दिलिप वेंगुर्लेकर, रविंद्र खरे, अमृता सातभाई, राधिका देशपांडे, नेहा परांजपे, लिना गोगटे या कलाकारांनी ताकदीने सादर केले आणि त्यातून रसिकांना कानेटकरांच्या लेखणीची ताकद पुरपुर अनुभवता आली. इथे ओशाळला मृत्यू, आणि अश्रुंची झाली फुले या नाटकातले प्रभाकर पणशीकरांनी रंगविलेला आविष्कार ध्वनिचित्रफितीतून पाहिला. कानेटकर..पणशीकर..आणि पं. जितेंद्र अभिषेकी यांचे ऋणानुबंध लक्षात घेता, रघुनंदन पणशीकर यांचे प्रत्यक्ष नाट्यगीत गायन आणि शौनक अभिषेकी यांचे ध्वनिचित्रफीतून सादर झालेले नाट्यगीत गायन..हा ही एक सुंदर सुरेल योग इथे जुळून आला.
कानेटकरांच्या एकाहून एक सरस नाट्यकलाकृती, टीव्ही मालिकेसाठी लेखन, संगीत नाटके या प्रचंड लेखनाची आढावा तीन तासात आणि एका कार्यक्रमातून घेणे हे अवघड काम स्वरानंदने कौशल्याने केले. उत्तम संकलन व सादरीकरण यातून कार्यक्रमाला नेटकेपणा प्राप्त झाला.
संजीव मेहेंदळे आणि समृध्दी पानसे यांनी नटी-सूत्रधाराच्या रूपातून सूत्रे सांभाळली. हा सारा नाट्य-संगीताचा प्रवास वाहता ठेवण्यात या दोघांचे मोलाचे सहकार्य लाभले. संहिता लेखन शैला मुंकुद यांचे तर दिग्दर्शन अजित सातभाई यांचे होते. सर्वांच्या प्रयत्नातून एक वेगळ्या पध्दतीचा कार्यक्रम धावता का होईना सादर झाला...यातून कानेटकरांच्या आचाट बुध्दीसामर्थ्याचे दर्शन घडले.. उद्याच्या पिढीला...वसंत कानेटकर..एक यशस्वी नाटककार आणि शब्दांचा खेळ करणारे अचाट व्यक्तिमत्वाचा प्रत्यय आला.. हे ही नसे थोडके.

कविता टिकेकर,पुणे
Kavitatikekar@yahoo.com

Tuesday, April 5, 2011

जरा याचाही विचार करा


भारतीय क्रिकेट मधील व्यक्तिपूजा अनेकांना क्रिकेट पासून दूर नेण्यास कारणीभूत ठरते आहे. नुकत्याच झालेल्या
विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सचिन तेंडूलकरच्या नगण्य १८ धावा होत्या अन इतरही बाबतीत तो काही
स्पृहणीय करू शकला नाही,पण माध्यमांनी जणू तेंडूलकरच्या मिडिया म्यानेजरची भूमिका घेऊन त्याला प्रसिद्धी देण्याचा
चंगच बांधला होता. सामना सम्पल्यावर कर्णधाराची विजयी मिरवणूक काढण्या ऐवजी तेंडुलकरची काढणे हेही निषेधार्ह होते.
का तर म्हणे तो एक दिवसीय सामन्यातून निवृत्त होणार म्हणून!

हे कौतुक सम्पल्यावर तो निवृत्ती नाकारणार हे गृहीतच होते.
कारण जाहिरातीच्या कोट्यवधी रुपयांच्या उलाढालीत तो फक्त संघात असे पर्यंतच राहू शकतो,हे त्याला चांगलंच माहिती आहे.
या पूर्वीही अनेकदा वाईट खेळल्या नंतर खोट्या दुखण्याचं नाटक करून तेंडूलकरने आपण मुत्सद्दी, व्यवहारचतुर आणि राजकारणी
असल्याचे दाखवले आहे. रसिकांच्या वेड्या प्रेमामुळे आज सचिनने चांगले खेळण्याची गरजच उरली नाहीये.
त्याने फक्त टीम मधली एक जागा शक्य तितकी वर्षे अडवून ठेवावी अशी योजना त्याने आपल्या मध्यस्थांमार्फत करूनच ठेवलेली आहे.
आपण चर्चेत नाही हे लक्ष्यात येताच अत्यंत मुत्सद्दीपणाने मद्याची जाहिरात नाकारल्याची बातमी माध्यमांना देऊन त्याने स्वत:ला प्रसिद्धीच्या झोतात ठेवले होते.
कोका कोलाची काही कोटीची जाहिरात करण्याचा अनुबंध मिळताच त्याची जाहिरात करायलाहि तो विसरला नाही.
क्रिकेट हा संघाचा खेळ आहे तो टेनिस प्रमाणे वैयक्तिक खेळ नाही. कारण असो नसो सतत फक्त एकाच खेळाडूची स्तुती होत राहिली तर संघ भावनेवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. किंबहुना त्या त्या वेळी कर्तृत्व गाजवणा-या खेळाडूंचे कौतुक होणे अत्यंत आवश्यक आहे. ओढून ताणून सचिनचे गुण गान करण्याची वृत्ती मिडीयाने बदलण्याची गरज आहे. आणि त्याच्या शतकांपेक्षा देशाची हारजीत महत्वाची आहे,
हे भारतीय क्रिकेट रसिकांना कळणेहि महत्वाचे आहे. विश्वचषक धोनीच्या टीमने जिंकला आहे, सचिनच्या नव्हे!
फायनल मध्ये शेवटी चार धावा आवश्यक असताना षटकार फक्त धोनीच मारू शकतो, ते सचिनच्या आवाक्यात कधीच नव्हते आणि या पुढेही शक्य नाही.
सचिन क्रिकेट खेळायला लागल्यापासून त्याच्या आज पर्यंतच्या एकत्रित धावा मोजायच्या, आणि इतरांच्या मात्र फक्त एकाच सामन्यातल्या!

ब्रॅडमन यांचा विक्रम सचिन मोडूच शकत नाही, कारण ब्रॅडमन यांनी तो अत्यंत कमी सामने खेळून केलेला आहे. पण व्यक्तीपूजकांनी त्यासाठी सोयीस्कर असे निकष तयार केले आहेत. अनेकदा वाईट खेळूनही त्याला टीम बाहेरचा रस्ता दाखवला नाही,मात्र दुसरा एखादा खेळाडू एकाच सामन्यात नीट खेळू शकला नाही तर त्याला लगेच काढून टाकण्याची तत्परता बीसीसीआय आणि निवड समितीने दाखवली आहे. थोडक्यात काय तर सचिन हा कृत्रिम विक्रमवीर आहे. झालेला नव्हे होऊ दिलेला!

मंगेश वाघमारे ,पुणे
email- mangeshwaghmare91@yahoo.in

Thursday, March 31, 2011

मराठी संस्कृती




शेवटी संस्कृती म्हणजे बाजरीची भाकरी...
वांग्याचे भरीत....
गणपती बाप्पा मोरयाची मुक्त आरोळी...
केळीच्या पानातली भातची मूद आणि त्यावरचे वरण..
उघड्या पायांनी तुडविलेला पंचगंगेचा काठ...
मारूतीच्या देवळात एका दमात फोडलेल्या नारळातले उडालेले पाणी...
दुस-याचा पाय चुकून लागल्यावरदेखील अपण प्रथम केलेला नमस्कार..
दिव्या दिव्या दिपत्कार..
आजीने सांगितलेल्या भूताच्या गोष्टी..
मारूतीची न जळणारी आणि वाटेल तेव्हा लहानमोठी होणारी शेपटी..
दस-याला वाटायची आपट्याची पाने..
पंढरपूरचे धूळ आणि अबूर यांच्या समप्रमाणात मिसळून खाल्लेले डाळे आणि साखरफुटाणे...
सिंहगडावर भरून आलेली छाती ...आणि....
दिवंगत आप्तांच्या मूठभर अस्थींचा गंगार्पणाच्या वेळी झालेला स्पर्श...
कुंभाराच्या चाकावर फिरणा-या गोळ्याला त्याचे पाण्याने भिजलेले नाजूक हात लागून घटदार मडके घडावे तसा अदृष्य पण भावनेने भिजलेल्या हातांनी पिंड घडत असतो. कुणाला देशी मडक्याचा आकार येतो. कुणाला विदेशी कपबशीचा.

इति...पु.ल.देशपांडे

Tuesday, March 29, 2011

तीन दशकांची समाधानपूर्ती--झलक..



महाविद्यालयामधून बाहेर पडल्यानंतर स्वतःला अभिव्यक्त करण्याच्या तीव्र उर्मीतून झलक,पुणे या संस्थेची स्थापना झाली..आता त्याला तीन दशके झाली आहेत.
रसिका तुझ्याचसाठी.. गंगाधर महांबरे यांच्या शिर्षक गीताच्या नावाने संस्थेने पहिला कार्यक्रम झाला..आणि झलकची झलक रसिकांच्या टाळीला पसंत पडली. मौखिक परंपरेतील पारंपारिक गीते आणि अघुनिक गीते सादर करणे हा उद्देश..
झलकला आपल्या मातीतला आणि मनातला हा बहुश्रृततेचा धागा. परंपरेतील समृध्द वारसा या कार्यक्रमातून जपणे हे जास्त मोलाचे वाटले. ते त्यांनी तीन दशके सुरू ठेवले.

इलेक्ट्रॉनिक वाद्ये आणि इंटरनेटच्या युगातही प्रेक्षागृहातले रसिक आणि कलाकार एकमेकांसमोर असताना तालवाद्ये जुळविली जातात. सूर-लय-तालाच्या लडी उलगडल्या जातात. आणि बघता बघता त्या सर्वांचे अद्वैत तयार होते. झलक त्या सांगेतिक अनुभूतीचा परिणाम देण्यासाठी आजही सज्ज असते...पुढेही राहणार आहे.
मागच्या तीन दशकांमध्ये अनेक ज्येष्ठ कलाकारांबरोबरच सुधीर फडके, राम कदम, शांताबाई शेळके, प्रभाकर जोग, मंगेश पाडगावकर, सुधीर मोघे, प्रशांत दामले, सुधीर गाडगीळ, आशा भोसले, किशोरी आमोणकर यांनी झलकच्या स्वरमंचावर येवून कलाकारांना प्रोत्साहन दिले आहे.
स्वा. सावरकरांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने त्यांच्या प्रचलित व अप्रचलित गीतांचा सागरा प्राण तळमळला हा कार्यक्रम राष्ट्रभक्तीच्या प्रेरणेतून रंगत गेला. आज झलकचे तोच चंद्रमा, सूर तेची छेडिता, मधुघट, इंद्रधनू, गा मेरे मन, सारखे वेगळे कार्यक्रम रसिकांच्या पसंतीला उतरले आहेत. तर पावसाची गाणी आणि मन उधाण वा-याचे सारखे वेगळे कार्यक्रम आजही स्मरतात. २५०० प्रयोगांची या सा-या प्रयोगांची संख्या होईल.

पुण्यात स्थापन झालेली कलाकारांची ही संस्था गेली तीन दशके एकविचाराने, अभंगपणे आमि आपल्या भूमिकेशी ठाम पाहून आजही काम करत आहे....याचे श्रेय झलक परवारात सामिल झालेल्या विविध कलावंतांना तर जातेच पण त्याही पेक्षा अधिक जाते ते... अविनाश वैजापूरकरांच्या संघटनाकौशल्याकडे. यासा-यांना म्हणजे कलाकार आणि रसिक यांना बांधणारा सेतू निवेदनातून साधला तो उपेंद्र खरे यांनी....
झलकची ही तीन दशकांची तपपूर्ती साजरी झाली तीही आगळ्या पध्दतीने...
आता ज्येष्ठ म्हटले पाहिजे.. ते सुधिर गाडगीळ यांच्या साठीच्या निमित्ताने त्यांना मानपत्र देउन...तर प्रमुख उपस्थितीत विक्रम गोखले झलकच्या कलावंतांना अधिक सुरात गा असा सुरात गा हा सल्ला द्यायला विरसले नाहीत.
तीन दिवसांच्या ह्या सोहळ्याला पुणेकरांची दाद ही उपस्थितीने तर मिळालीच. पण ती गीतांना टाळ्यांनी साद घालून.
कितीही जमाना बदलला तरी त्या दिवसांची आठवण देणारे असे कार्यक्रमच संस्कृती टिकवून ठेवते.. गेलेले दिवस परत स्मरणात रहातात... ते पुढच्या पिढीपर्यंत पोचविते हे निश्चित....

सुभाष इनामदार,पुणे
subhashinamdar@gmail.com
www.subhashinamdar.blogspot.com
www.culturalpune.blogspot.com
Mob- 9552596276


http://www.zalakpune.com/

http://www.metacafe.com/watch/4202757/zalak_promo/

Thursday, March 24, 2011

Saeed Mirza President of FTII

The Government has reconstituted Society of Film and Television
Institute of India (FTII), Pune for a period of three years with
effect from 4th March, 2011 of until further orders whichever is
earlier. According to an order issued by the Ministry of Information &
Broadcasting, Shri Saeed Mirza has been nominated as the President of
the FTII Society and Chairman of its Governing Council.

The Government of India has nominated the following ex-officio members
of the FTII Society. They shall remain members of the Society as long
as they retain the office or status by virtue of which they became
members of the Society:-

(1) Joint Secretary (Films)
Ministry of I&B or his/her
Nominee not below the rank
of Deputy Secretary
(2) Chief Executive Officer,
Prasar Bharati or his/her nominee
Not below the rank of
Deputy Director General
(3) Additional Secretary &
Financial Adviser, Ministry of I&B
or his/her nominee not below the rank
of Deputy Secretary
(4) Chairman, Central Board of Film Certification
(5) Managing Director, National Film Development Corporation
(6) Chief Producer, Films Division, Mumbai
(7) Director, National School of Drama
(8) Director, Indian Institute of Mass Communications
(9) Director, National Film Archive of India (NFAI), Pune
(10) Director, Film & Television Institute of India (FTII), Pune
(11) Director, Satyajit Ray Film & Television Institute (SRFTI), Kolkata

In the category of “experts representing the activities of the Central
Government” following persons have been nominated as Members of the
FTII Society:

(1) Joint Secretary, Ministry of Culture
(2) Chairperson, Sangeet Natak Academy (Mrs. Leela Samson)
(3) Director General, Doordarshan

In the category of “persons of eminence connected with Films and
Television Education, Journalism, Literature, Fine Arts, Dramatics,
Performing Arts, Etc.” the following persons have been nominated as
members of the FTII Society:

(1) Shri Shiv Kumar Sharma
(2) Shri Ratan Thiyyam
(3) Shri Shazi Zaman
(4) Shri Rajiv Mehrotra
(5) Ms. RamaVij
(6) Shri Benoy K. Behl
(7) Dr. Kiran Seth

In the category of “alumni of FTII”, the following persons have been
nominated as members of FTII Society:

(1) Ms. Zareena Wahab
(2) Shri Rajkumar Hirani
(3) Shri Raza Murad
(4) Shri Subhash Chandra Sahoo

Monday, March 7, 2011

कोकणावरचा समग्र संदर्भ ग्रंथ


`कोकण विविध दिशा आणि दर्शन` पुस्तकरूपी

सह्याद्रिच्या तळी शोभते हिरवे तळकोकण
राष्ट्रदेवीचे निसर्ग निर्मित केवळ नंदनवन!
झुळझुळ गाणे,मंजूळवाणे गात वहाती झरे
शिलोच्चयातून झुरूझुरू येथे गंगाजळ पाझरे!


अशा कोकणच्या सौंदर्य प्रदेशावरचे हे काव्य कुणाला मोहित करणार नाही ?
ती `कोकण विविध दिशा आणि दर्शन `या पुस्तकाच्या संपादिका डॉ. लिला दीक्षित यांनी आपल्या भाषणात गेली साडेतीन वर्ष ज्या गंथाचा खटोटोप चालू होता तो वाचकांसमोर सकार होतानाचा आनंद शब्दात असा वर्णन केला.

हा ग्रंथ म्हणजे सामूहिक असा एक अक्षराविष्कार आहे. सर्व अभ्यासकांनी मनापासून सहकार्य केले. भाग्य असे की त्या त्या विषयाला तज्ञ अभ्यासक मिळाले. आणि हे काम उभ राहिले.
चोवीस लेख, दहा परिषीष्ट आणि २४ ग्लॉसी पेपरवर नकाशे, चित्रे, जुन्या नियतकालिकांची मुखपृष्ठे, कोकणच्या विविध नररत्नांचे फोटो. उपलब्ध झोलेली तिकीचे, कोकणाती अप्रतिम मूर्ति वैभव, कोकणचा निसर्ग डोक्यात ठसेल असे नानाविध सुंदर फोटो असा १०८ रेगीत चित्रांचा खजाना यात आहे.
आज माझे मन अत्यंत शांत आणि तृप्त आहे. कोकण माझी मर्मबंधातली ठेव आहे. इथला निसर्ग, पशु पक्षी,झाडे झुडपे, निरव शांतता देणारा समुद्रकिनारा, नारळाच्या विस्तॉत बाला. इथली सुंदर मंदिरे, त्यांचे उत्सव या सा-यांवर माझे नितांत प्रेम आहे.
कोकणचा माणूस अपल्या परंपरेतील संस्कृतीमधील स्वत्व जपणारा आहे. माझे तेच खरे हा अभिनिवेश त्याच्यात असतो. पण याच त्याच्या जिद्दीने कोकणात कर्तृत्ववान पुरूषांची एक रांग उभी आहे. हा ग्रंथ कोकणविषयी गुंफलेला आहे. प्रादेशिक अस्मिता फुलविणारा किंचिंत स्पर्श असेलही. ` तरीही मळ्यास माझ्या कुंपण पडणे अगदी न मला साहे` ही केशवसुतांची मानसिकता इथे आहे. कोकणचा माणूस भारतीय आहे. अणि भारतीयाची अंतिम ओळख ` विश्वमानव` अशीच असावी. ..
असा भावूक श्बदात डॉ, दीक्षित यांनी पुस्तकाचे मर्म थोडक्यात वर्णन केले.


आता कार्यक्रमाकडे वळताना...

किनारपट्टीलगत महामार्गाची गरज

`ठाण्यापासून गोव्यापर्यंत विस्तरलेल्या किनारपट्टीलगत महामार्गाची गरज आहे. तो झाल्याने कोकणाचा आणखी विकास होणार आहे..कोकणाच्या बंदरांचा, जेटींचा विकास झाला पाहिजे. आज कोकण केवळ निसर्गसंपन्न आहे. मात्र राहण्याची चांगली सोय होणे गरजेचे आहे. कोकणाचे समग्र दर्शन घडविण्या-या पुस्तकाची गरज होती. ती `कोकण विविध दिशा आणि दर्शन `या पुस्तकामुळे कांही प्रमाणात पूर्ण झाली आहे. तरीही कोकणाचा खरा विकास ही काळाची गरज आहे. विकासाची गती मिळण्यासाठी आंदोलनाची आज गरज आहे. त्या आंदोलनाचे नेतृत्व करायला आपण तयार असल्याचे माजी केंद्रिय मंत्री मोहन धारिया यांनी पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाच्या अध्यक्षपदावरुन जाहिर केले. आपण स्वतः कोकणात जन्मलो. कोकणाचा सार्थ अभिमान आहे. कोकण कॅलिफोर्नियापेक्षाही सुंदर होउ शकतो पण त्या दृष्टीने विकास होण्याची गरज त्यांनी पुस्तक प्रकाशन समारंभाच्या अध्यक्षपदावरून व्यकत केली.

सोमवरी ७ मार्चला संध्याकाळ कोकणच्या माणसांना सुखावह वाटणारी घटना एस एम जोशी सभागृहात घडत होती. ती म्हणजे कोकणचा समग्र ग्रंथ इथे डॉ. लिला दीक्षित यांच्या संपादकत्वाखालील संदर्भ ग्रंथाचे महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अद्यक्ष आणि कोकण मराठी साहित्य परिषदेचे स्थापनाकार मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते २४ लेखकांनी कोकणच्या विविध बाजूवर लिहिलेल्या आणि प्रतिमा प्रकाशनाने तयार केलेल्या पुस्तकाचे प्रकाशन त्यांच्या हस्ते होत होते.

यानिमित्ताने पुस्तकाविषयी खास पुणेरी परखड मत डॉ. विजय देव यांनी मांडले. असाच पध्दतीवे मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र अशा भागांवरही संदर्भ ग्रंथ लिहिण्याची गरज असल्याचे मत त्यांनी मांडले. हा कार्यक्रम प्रतिमा प्रकाशन आणि कोमसाप या दोन संस्थांच्या वतीने साकार करण्यात आला. हा ग्रंथ प्रकाशित केल्याबद्दल प्रकाशक अरुण पारगावकर यांचे खास अबिनंदन सर्वांनीच कौतूक केले.
या निमित्ताने कोमसापचा परिचय करून देताना या संमेलनाचा अध्यक्ष निवडला जातो..त्यासाठी निवडणूक होत नाही. याचा संदर्भ देउन मोहन धारिया यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीचा प्रचार कोणत्या पध्दतीने होतो आहे..याकडे लक्ष वेधून.. साहित्यिक क्षेत्रात निवडणुकीची प्रथा केवढ्या मोठ्या प्रमाणावर सुरू आहे आणि यात साहित्यिकाला निवडून देण्याची केवढी स्पर्धा चालली आहे याबद्दल खंत व्यक्त केली.
दुसरी खंत मधु मंगेश कर्णिक यांनी व्यक्त केली. वास्तविक असे संदर्भमुल्य असणारे पुस्तक साहित्य संस्कृती मंडळाने काढायला हवे होते..पण ते होऊ शकले नाही...


सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276
www.subhashinamdar.blogspot.com
and
www.culturalpune.blogspot.com

Friday, February 25, 2011

थरारेल वीट



स्वरभास्करा
नादपुत्रा
तळपत्या भास्करासम
ताप सोसताहेत
लोक
तप्त मनास शीतल करणारा
तुझा स्वर
नि, पोळलेल्यांना
स्वरानंद देणारा !
धुवांधार मर्दानी मल्हार स्वरांनी
कोमेजलेली मने
प्रफुल्लीत करणारा !
तुझा एक सच्चा
स्वर
दुभंगलेल्यांचा
अभंग
विठ्ठल
आसवांचे सांत्वन करणारा
वैश्विक जाणीवांना जोडणारा
रात्रीच्या धुंद सवाई गंधर्व
मैफिलीत
तुझे स्वर चांदणे होऊन बरसत
-- कधी कोसळती धारा
कधी प्रसन्न शिडकावा
कधी कधी करुणाही झरे !
मैफिल तुझी : मंत्रमुग्ध तल्लीनता
ब्रह्मानंदी टाळी !
मानवी संवेदनांना टोकदार करणारा
शब्दांना रडवणारा
शब्दांना खेळवणारा
शब्दांची दमछाक करणारा
करुण - आर्त - स्वर - भास्कर
सुंदर ते वेचून
सुंदर ते करून
पिढ्यानपिढ्या गारूड करणारा
संतवाणीच्या भक्तीस्वरांनी
शास्त्रीय संगीत ज्ञान
घरा-दारात, तळागाळात नेणारा
ममताळू
सीमा तरी कुठे होत्या
तुझ्या स्वरांना ?
स्वरांच्या लहरी
विविध लहरी
विश्व लहरी
मानवी ऐक्य
वैश्विक ऐक्य
साधणारा
अजूनी आपल्यातच........
आनंदयात्रीची स्वरयात्रा.......
अखंडित.......
ज्ञानियांच्या राजानंतर
संगीताच्या राजाची
समाधी लागली आहे !
टिपेच्या दाणेदार तानांची
मैफिल सजवीत आहेत
शांतता राखा.....
हळू बोला......
---- थरारेल वीट !



Suresh Tilekar
Pune
Ph.: 020-26330615

Tuesday, February 22, 2011

नाटकातील प्रायोगिकता - महेश एलकुंचवार


आमची प्रायोगिकता अधिकधिक अनुदार व संकुचित तर होवू लागली नाही? प्रायोगिकतेचा एक आम्हाला पटणारा कोश आमच्या भोवती विणून त्यातच आम्ही मग्न राहीलो, असे तर झाली नाही? आम्ही करतो तेच खरे (व म्हणून दुसरे करतात ते रद्दबातल), असा गंड तर आम्हा प्रायोगिकांमध्ये निर्माण झाला नाही? परिणामी आमच्या प्रायोगिकतेलाच कोती व अल्पजीवी तर केले नाही?

मुळात प्रायोगिकता म्हणजे परंपरेविरुद्ध बंडखोरी असे समीकरण आहे. पण जिच्याविरुद्ध बंड करायचे ती परंपरा आधी समजून घ्यावी लागते. येथे मी परंपरा हा शब्द फक्त नाट्यपरंपरा एवढ्याच मर्यादित अर्थाने वापरत नसून जीवनाच्या सर्व अंगांमधली परंपरा, एका संपूर्ण जीवनशैलीची परंपरा एवढ्या व्यापक अर्थाने वापरत आहे. ते बंड अखेर जीवनामधल्या कुठल्य तरी अस्विकारणीय असलेल्या परंपरेविरुद्ध्च असते; कारण नाट्यपरंपरा ही अखेर त्या जीवनशैलीशी जुळलेली असते, किंबहुना तिच्यामधून उमलू आलेली असते. ही सर्व परंपरा समजून घ्यायची तर खूप अभ्यास हवा व पूर्वग्रहरहित, डोळस व्रुत्ती हवी. कुठल्याही देशातली नाट्यपरंपरा किंवा तीविरुद्धची बंडे ही काही निर्वात, निर्जन्तूक पोकळीत फुलत फळत नाहीत. त्या बंडखोरीमागे काही तात्विक विचार असावा लागतो व हा विचार नेहमीच जगण्याबद्दलच्या मूलभूत प्रश्नांमधून जन्मलेला असतो.

आपल्या नाटकामधली बंडखोरी जीवनविषयक तत्त्वचिंतनातून निर्माण झालेली आहे असे दिसत नाही. आपले बंड उपलब्ध शैलीविरुद्ध फक्त असते व ते एका निर्वात पोकळीत क्षण्काल घोंगावत राहाते. अश्या त-हेचे बंड वा प्रायोगिकता क्षणार्ध आपल्याला दिपवून टाकू शकते हे खरे, पण बहुदा ती काही काळ पेटल्यासारखी उजळते व स्वत:शीच जळून राख होते. परंपरा आपण सगळीच्या सगळी स्विकारत नसतो; कारण ती आपला चेहरा नित्य बदलते, बदलत्या काळाबरोबर नवे रूप घेते. हे असे होते कारण डोळस माणसे परंपरेतले कालबाह्य आहे ते वर्ज्य करून तिचे फक्त सत्त्व अंगी लावून घेतात. परंपरेचे सत्त्व व आधुनिकतेचा बळ ह्यांचा काही मेळ घालता आला, तर प्रायोगिकतेला एकाग्र व निश्चित दिशा मिळू शकते.

परंपरेचे भान असणे ह्याचा अर्थ एतद्देशीय असणे नव्हे. आपली परंपरा इतक्या संमिश्र विविध प्रभावाने घडत गेलीय की एतद्देशीय नकी काय ते ठरविता येणे कठीण आहे. आणि आता जागतिकीकरणाच्या रेट्यात, फक्त भारतीय परंपरांचा विचार करण्याऐवजी जागतिक परंपराअ समोरे जाण्याचा खुलेपणा व उमदेपणा दाखविता आला तर्च आपला सर्जनपिंड पुष्ट होत जाईल. जागतिक प्रभावांना व परंपराना आपण प्रतिरोध करतो, तो आपल्यात आत्मविश्वास कमी पडतो म्हणून तर नाही?



महेश एलकुंचवार

आख्यायिका बासरीच्या


बासरी तयार करण्यासाठी लागणारा बांबू हा तिथी पाहून तोडतात.
पंचमी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी या तिथींना बांबू तोडला तर त्याला हमखास कीड लागते, असं बासरी तयार करणारे सांगतात.
त्याचं कारण म्हणजे या तिथींमध्ये शेवटी 'मी' येतो.... याच 'मी'पणाच्या अहंकारातून कार्यनाश होतो आणि बासरी टिकत नाही, असा समज आहे.
कृष्णाचं आवडतं वाद्य बासरी. एकदा कृष्णाच्या सगळ्या सख्या, गोपी बासरीवर चिडल्या आणि म्हणाल्या, आम्ही त्या कृष्णाची एवढी स्तुती करतो, त्याच्या आजूबाजूला वावरतो, पण तो आम्हाला साधा भावही देत नाही.
तू तर एवढी साधी; ना रूप ना काही. पण तो तुला सतत ओठांशी धरून असतो.
तू अशी काय जादू केली आहेस त्याच्यावर? बासरी हसली आणि म्हणाली, 'तुम्ही माझ्यासारख्या व्हा, मग कृष्ण तुम्हालाही जवळ घेईल.'

अर्थ न कळून गोपींनी बासरीकडे पाहिलं. बासरी पुढे म्हणाली, 'मी अगदी सरळ आहे; ना एखादी गाठ, ना एखादं वळण. मी पोकळ आहे. त्या पोकळीतून माझ्यातला अहंकार गळून पडलाय.

माझ्या अंगावरच्या सहा भोकांतून काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे रिपू मी काढून टाकले आहेत.
मला स्वत:चा आवाजही नाही.. माझ्या सख्यानं फुंकर मारली तरच मी बोलते.
तो जशी फुंकर मारतो तशी मी बोलते.' गोपी निरुत्तर झाल्या.
तेव्हापासून त्या बासरीवर रुसून आहेत.

म्हणूनच असेल कदाचित, पण आज आपल्याकडे एकही स्त्री बासरीवादक नाही………..!

मयूर मुकुंद आपटे

Tuesday, February 15, 2011

आदरांजली स्वरभास्कराला





भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्या मैफलीच्या रणांगणावर तंबोरा घेउन कित्येक वर्ष साथ करणारे दोन स्वरसाधक माधव गुडी आणि राजेंद्र दिक्षित ( राठोड) यांनी आपल्या गुरूंना आदरांजली वाहण्यासाठी १० फेब्रुवारीला टिळक स्मारक मंदीरात स्वरांजली सभेत गाऊन त्या स्वरांचे स्मरण केले. एक वेगळा प्रत्यय त्यांनी रसिकांना दिलाच पण गुरून दिलेले स्वरांचे देणे आपण किती तंतोतंत साध्य केले आहे याचे दर्शन घडविले.

रथसप्तमीचा दिवस म्हणजे पंडीतचींचा वाढदिवस असायचा. आज ते आपल्यात नाहीत पण त्यांची अभंगवाणी आणि ते सूर आजही मनात साठले आहेत. या निमित्ताने त्या सुरांना या दोन शिष्यांनी मोकळी वाट करून दिली. अत्यंत सुरेल आणि सुंदर मैफलीला रसिकांना प्रतिसाद इतका मिळाला की टिळकची बाल्कनीही ब-याच दिवसांनी उघडली गेली. आणि टाळ्यांच्या गजरात रसिक दाद देत होता.

दोन्ही शिष्यांच्या अभंगवाणीच्या गायकीतून पंडीतजींचा सहीसही प्रत्यय उत्तरोत्तर रंगत गेला. इंद्रायणी काठी, मन राम रंगी रंगले, तिर्थ विठ्टल यासारखे अभंगवाणीने अजरामर केलेले अभंग राजेंद्र दिक्षित आणि माधव गुडी यांनी आळवून त्या दिव्य स्वरसमूहांचा आनंद वाढविला.

पंडितजींचे ज्येष्ठ पुत्र राघवेंद्र जोशी, आमदार गिरीश बापट, उल्हासदादा पवार, संदीप खर्डेकर यांनी कार्यक्रमासाठी हजेरी लावून कलावंतांच्या कलेला पर्यायाने पंडीतजींच्या गाण्यालाच आजरांजली वाहिली. प्रत्येक अभंगानंतर समर्पक अशी आठवण आणि पंडीतजींच्या मोठेपणाचा भाग रंगवत नेऊन मंगेश वाघमारे यांनी अभंगवाणी रसरशित होण्याला मदत केली.

आदरांजली स्वरभास्कराला या कार्यक्रमाला पुण्यातील नावाजलेल्या कलाकारांची साथसंगत लाभली. हार्मानियमवर संजय गोगटे तर व्हायोलिनवर सौ. चारुशीला गोसावी यांनी अभंगातील प्रत्येक जागा जशाच्या तशा लोकांपर्यंत पोहचविल्या. तबल्याची साथ वयाने सर्वात लहान असलेला विनित तिकोनकर यांनी फारच सुंदर केली. तसेच त्याचे वडील अविनाश तिकोनकर यांनी पखवाजवर समर्पक साथ करून मैफलीची रंगत वाढवित ठेवली. पंडीतजींबरोबर जवळपास प्रत्येक कार्यक्रमात टाळाची साथ करुन वाहवा मिळविणारे बुजुर्ग कलाकार माऊली टाकळकर यांचीही साथ या कर्यक्रमाला लाभली होती हे माठे भाग्यच म्हणायचे.

दोन-अडीच तास चाललेल्या कार्यक्रमाची सांगता पंडीतजींच्या जो भजे हरि को सदा या भजनाच्या ध्वनिमुद्रणाने झाली आणि पंडीतजींचा धीर गंभीर स्वर मनात साठवून रसिक तृप्त झाला.


Thursday, February 10, 2011

कलेची चव

ज्ञानी, महाज्ञानी,सर्वगुणसंपन्न असा समुदाय तुम्ही अनुभवलाय?

मी अनुभवलाय. एका शहरात.


खरे तर त्यांनीच मला त्यांची स्वत:ची ’ती अशी’ ओळख करवून दिलीय.जे लिहितोय ते स्वानुभवातुन लिहितोय.सांगोवांगी नाही.

या शहरातील लोकाना एक वेळ ’ढिल्ला’ महटले तर एवढा राग येणार नाही,पण जर कोणी ’अज्ञानी’ किंवा ’गावंढळ’ म्हटले तर त्यांच्या पचनीच पडत नाही. तिळपापड होतो.अंगाची अगदी लाही लाही होते.

इंटरनेट यायच्या आधी आणि आल्यानंतरही केवळ यांना आणि यांनाच सर्व जगाची माहिती असते वा असू शकते.भले यांच्या माहितीचा स्त्रोत केवळ दोनच वृत्तपत्रांशी निगडित असला तरी.

त्याचे कारणही आहे..’.गेला बाजार विद्यापीठातील ग्रंथालयात काम करणारा कोणीतरी सेवक त्यांचा दूरस्थ नातेवाईक असल्यामुळे जगातील सर्व ग्रंथ दोहो कर जोडून यांच्यापुढे सदैव उभे असतात,’असा भास वारंवार ते आपणा सर्वांना देत असतात.आणि हे अनुभवायला तुमच्या माझ्या सारखा नवखा त्यांच्यासमोर आला कि त्यांचा पतंग मस्त अवकाशात चंद्रापलिकडेही भरारी घ्यायला लागतो.

एखाद्या कवितेतील आशयाचा आनंद घेण्यापेक्षा त्यातील एका वेलांटीशी त्यांचा जीव खट्टू होवून अडकून राहतो.

मग ती कविता गेली उडत ,

जोपर्यंत ती वेलांटी यांच्या पठडीत बसत नाही तोपर्यंत यांचा जीव खालीवर होत राहतो.

यदाकदाचित यांच्या पोकळ ज्ञानघमेंडीचा तुम्हास कधी अनुभव आला तरी तुम्ही अजिबात वाईट वाटून घेऊ नका.

केवळ तुमच्याशी नाही, तर सगळ्या जगाशीच या अशा अनेक विषयावरून त्यांचे कायम वाजत असते.



आपल्या नाकाशी किलोभर स्त्राव लोंबत असला तरी अमका ढमका कसा ’त्याच्या स्वप्नात चुकला’ यावर मार्निंग वाकला तासभर गुंतवून ठेवण्याचा अधिकार यांना दैवदत्त आहे.
आणि कमालीच्या इंटरेस्ट्ने तो वाजवत असतात.



त्यांच्या परखडपणा, स्पष्टवक्तेपणाचे तर क्या कहने?
’मी टरफले उचलणार नाही , मी शेंगा खाल्या नाहीत’ हे यांनी इतक्या वेळा घोकलेले आणि ओकलेले वाक्य असते कि
टिळक जिवंत असते तर त्यांनाही त्याचा अगदी वीट आला असता.
बरे टरफले मटारची आहेत आणि यांच्या तोंडात त्यातलाच मटार असला तरी...टरफले शब्द ऐकला कि त्यांचा ’असा परखडपणा’ बाहेर येणारच.मक्याच्या कणसाची पाने कुणी उचलायला सांगितले तर अर्धवट खालेल्ला बुट्टा तुमच्यासमोर नाचवून आधी शेंगांचा परखडपणा मांडतील.बरे टिळक रत्नागिरीचे..बाहेर गावचे.... तरीही यांचेच.


खरे तर , हे जरा उशीरा जन्माला आले अन्यथा सर्व संत मंहंत यांनी यांच्याच घरीच पाणी भरले असते.अधे मधे संत महंताच्या विविध परिक्षाही हे किंवा याचे सगे सोयरे उत्तीर्ण होत असतात.पढत मूर्खाची लक्षणे तर अगदी झोपेत सुद्धा पाठ म्हणून दाखवतील .पण जागे जाले की त्यातसुद्धा समर्थांनी थोडा बदल कसा करायला हवा होता, यावर तुमचा तास घेतील.

भारत तसा उत्सवप्रिय देश आहे,पण या मडळींची खासियतच काही विलक्षण आहे.ही मंडळी नुसती उत्सवप्रिय नाहीत तर,

ही मंडळी ’महोत्सवप्रिय’ आहेत.अनेक महोत्सव या शहरात बारा महिने चालू असतात.

या शहरात शिबिरे होत नाहीत. होतात फक्त महोत्सव.

...आरोग्य महोत्सव, तांदूळ महोत्सव, कोंबडी महोत्सव, बचत महोत्सव, गायन महोत्सव, वादनमहोत्सव, पैठणी महोत्सव, ह्रुदय महोत्सव.

अन न चूकता ही मंडळी प्रत्येक महोत्सवास मोठ्या संख्येने हजेरी लावतात.

भले मग मागच्या स्टालवर शाबूदाणा वडा झोडण्यात ’ गिरिजादेवी’ ऐकणे सुटले तरी हे त्यांच्या गावीही नसते.
खरे तर ते त्याची तमाच करीत नाहीत.कारण ’यांची मैफिल’, ’ हे’ बसल्यावरच सुरु होते अन ”हे’ उठले की तत्क्षणी संपते.

अकबर बादशाहा किंवा विक्रमादित्य हे तर ते स्वत:स समजतातच.पण त्याचबरोबर, ’मागणी तसा पुरवठा’ या तत्वानुसार on demand दरबारातील नवरत्नांचा रोलही एकेक करून ते आरामात निभावतात.
खरे तर त्याच्या कडे ९०० रत्नांची क्षमता आहे पण पुरेशा रसिक गणसंख्ये अभावी ते आवरते घेतात.
अथवा त्यांना असेही वाटते कि आपले गुण समजणे हे इतरांच्या आवाक्याच्या पलिकडचे आहे त्यामुळे आपणच पामर जनतेस सांभाळून घेणे भाग आहे.

ही माणसे चरितार्थासाठी किरकोळ कामेही करतात.पण त्यांच्या आवडीचे काम विचाराल तर ’दुस-यास कमी लेखणे’.

त्याच्या दुर्दैवाने अशा पद्धतीची नोकरी कोठे उपलब्ध नसल्यामुळे त्याबाबतीत ते विनामोबदला स्वयंरोजगाराचे तत्व अवलंबतात.

इतरांना त्यांची किंमत नसली तरी त्याची त्यांना फिकिर नसते.


मुकेश अंबानी या महाशयांकडे येत नाहीत, कारण ’ हे’ मुकेशला आपल्या घरी आमंत्रण देऊन बोलावत नाहीत म्हणूनच.

”तो तर केव्हाचा तयार बसलाय स्टार्टर मारून ’ अशी यांची धारणा.आणि समजा मुकेशदादा चुकून माकून कोठे यांना सापडलेच तर तुम्हास पेस्केल ( पगार ) आणि इन्क्रीमेंट किती? असे विचारण्याचे धारिष्ट्य यांच्या ठाई ठाई भरलेले आहे. यांच्या परवानगीशिवाय चालू असलेल्या इतर जगातील कोणत्याच कामाची यांना किंमत/पत्रास नसते.

यांच्या प्रत्येक गल्लीत ’आखिल भारतीय अबक मंड्ले’ असतात, ज्याची इतरत्र कोठेच शाखा नसते.
हे सगळे वाचल्यावर ज्यांना राग येणार आहे ती ”ही’ genuine माणसे नव्हेतच.
कारण सरळ आहे.
अनुल्लेखाने मारणे हाच यांचा साधा बाण आणि ब्रह्मास्त्र देखील..त्यामुळे इतरांनी उगीच यांचा पुळका घेऊ नये.

या नोट्मध्ये ब-याच शुद्धलेखनाचाच्या चुका जाणून बुजून करून ठेवलेल्या आहेत.

बाकी याच शहरात तासन्तास अभ्यास करणारी, सगळ्यांशी आपुलकीने वागणारी, प्रचंड सामाजिक कार्य करणारी अशी असंख्य व्यक्तीमत्वे माझे मित्र आहेत आणि मला त्यांच्याबद्दल आदरच आहे.अन तेही माझे मत जाणतातच.


पण फुकट रूबाब मारणा-यांबद्दल बोलावे तेवढे थोडेच आहे.
मित्रांनो यांच्या वागण्याचा ’त्रास आहे’ असे समजू नका.एक ’वैशिष्ट्यपूर्ण करमणूक’ देण्याचा मक्ता यांच्याकडे आहे ,
त्याचा आदर करा.
मला त्यांच्या कलेची चव समजायला जरा वेळ लागला.

तसा वेळ आपणापैकी कोणास लागू नये म्हणून हा पत्रप्रपंच
( हाही त्यांचाच लाडका शब्द बरका )

by

Shriniwas Deshpande

Tuesday, February 8, 2011

कुसुमांजली महोत्सव पुण्याला




नाटकांमधील प्रसंग सादर करण्यासाठी

थर्ड बेल एंटरटेन्मेंट प्रस्तुत "रंगोत्सव" - कुसुमांजली या महोत्सवाचे आयोजन पुण्याला केले आहे..

दि. २६ व २७ फेब्रु. २०११, बालगंधर्व रंग मंदीर येथे हा महोत्सव पार पडेल्.
दि. २७ फेब्रु. २०११ रोजी कुसुमाग्रजांच्या नाटकांमधील प्रसंग सादर होणार आहेत्.
यामध्ये कुसुमाग्रजांच्या नाटकांमधील प्रसंग सादर करण्यासाठी आपल्यापैकी कुठला ग्रुप इछुक आहे का?
असल्यास लवकरात लवकर संपर्क करावा.

नाटकांमधील प्रसंग १५ ते २० मिनीटांचा असला तरी चालेल्. उत्तम दिग्दर्शकांद्वारे व अभिनेत्यांद्वारे त्याचे परिक्षण केले जाईल व त्यानुसार उत्तम अभिनेता, अभिनेत्री, दिग्दर्शक् व प्रसंग अशी बक्षीसे देण्यात येतील व त्याचबरोबर प्रत्येक ग्रुप ला सहभागास्तव सन्मानचिन्ह देण्यात येईल्.

Swapnil Raste
9822426254

संपादकांची जीभ कापली गेलीय...



‘अदृष्ट तरीही सत्य गोष्टींच्या भासाने कलावंत लौकिक चौकटीच्या पार जाण्याची धडपड करीत असतात
आणि इथेच त्यांच्या लौलिक अपयशाची आणि अध्यात्मिक आनंदाची सुरुवात होते.
यातून जाताना अवघे आयुष्य होरपळ होऊन जाते. जीवनसत्य प्रस्थापित करण्याऐवजी भाववून घेण्याची
ही धडपड कलावंताला दैवी असमाधान मिळवून देते. यातूनही ते जीवनसत्य शब्दांतून प्रकट करताना होणारा आटापिटा,
त्यात वारंवार येणारे अपयश यांतून कलावंतांची घडण होत जाते.
हे सगळे स्वीकारत गेले तरच कवी हा कवी होतो.
यापासून पळ काढणारा नुसताच पद्यकार म्हणून उरतो. हे इमान कसोशीने सांभाळता आले पाहिजे.
दिसामासाने ओटीपोटात वाढणारी आग आनंदाने जपली-जोपासली पाहिजे.
मला हे कितपत जमले आहे याचे उत्तर माझ्यापाशी नाही...

– गुरुनाथ धुरी
----------------------------------------------------------------


( विद्यमान पत्रकारितेवरचं एका कवीचं भाष्य आहे हे.वाचकांचं दुःख आणि खऱया पत्रकारांची खंत याहून वेगळी नसावी.)

1.

संपादकांची जीभ

कापली गेलीय

त्यांच्याच दाताखाली.

बोलता येत नाहीय बिचाऱयांना



...गाऱहाणी लिहिलेल्या जिभा

तळहातावर घेऊन लोक

रांगेत उभे

संपादकांचे क्षेम याचित



ः देश असा मुकाट नव्हता झाला कधी. बिच्चारा.



2.

किती उलथापालथी, विध्वंस

वृत्तपत्रभर

तरी दचकत नाही एकही शब्द.



3.

प्रत्येक अफवेची

होऊ शकत नाही

बातमी,



प्रत्येक बातमी मात्र

...असते स्वतःहून

उच्च दर्जाची अफवा.



4.

कवितेतील बातमी

मावत नाही कधीच

वृत्तपत्राच्या आख्ख्या पानात



(घटकापळाने-संतोष शेणई)



.


.

Monday, February 7, 2011

माझ्या स्मृति-सागरात


खरतरं नटसम्राट बालगंधर्व आपल्याला मायबाप म्हणत आणि आपण मायबाप आहात असंच आपल्याशी वागत. आपले लाड त्यांनी जेवढे पुरवले तेवढे अन्य कोणत्याही रंगकर्मीनं पुरवले नसतील. तत्कालीन नाट्यगृहामध्ये येणा-या प्रेक्षकांसाठी उच्च प्रतीचा महागडा उद आणि लोबाण वापरून सबंध वातावरण त्यांनी प्रसन्न केलं. आनंदराव आणि बावूराव पेंटरसारख्या विख्यात चित्रकारांकडून पडदे रंगवून घेऊन आपणासमोर श्रीमंतीची आरास मांडली. रंगमंचावरील हिरव्या चादरीवर, बादशाही इराणी गालिचे पसरून श्रीमंतीची आरास अधिक खुलवली. नाटकातील पात्रांच्या अंगावर झुळझुळीत आणि वस्त्र वापरून रजवाड्यांच्या शौक कसा असतो, याचं दर्शन घडवलं. मुकुटावर आणि आभूषणांवर ख-या सोन्याचा मुलामा चढवला. वर कळस म्हणून देवदुर्लभ गायनानं , ज्याने आपले कान तृप्त केले, त्यांचं स्मरण करून आम्ही रंगमंचावर वावरलो. आम्हीही आपल्याला मायबापच म्हणतो, पण आई वडिलांचं कोडकौतुक करण्याऎवजी आम्ही आपल्याकडून लाड करून घेतले . नटहट्ट पुरे करून घेतले. क्वचित तुमचा उपमर्दही केला. त्या सर्वांची स्मरणकहाणी म्हणजे हे माझे आठवणीतले मोती.

दर आठवड्याला मी माझ्या स्मृति-सागरात बुडी मारून, आपणासाठी एक मोती घेऊन येणार आहे. हा मोती बोरा एवढा टपोरा असेल, जोंधळ्याएवढा बारीकही असेल, गरगरीत गोल असेल, तर ओबड-धोबडही असेल. मोतियाच्या रंगाचा तेजस्वी असेल किंवा कळा गमवलेला तेजहीन असेल. पण असेल तो अस्सल मोतीच.

आयुष्याची उणी-पुरी साठ पासष्ट वर्ष मी रंगभुमीवरच वावरलो. अगदी प्रमुख भूमिकेपासून तो रंगमंचामागील कामगारापर्यंत सर्व भूमिका वठवल्या. क्वचित ठेचकाळलो, पडलो, रक्तबंबाळही झालो. पण, पुन्हा उठून चालू लागलो आणि रसिका, हे सारं आपल्या डोळ्यासमोरच घडलं, या सर्व प्रदीर्घ वाटचालीत अनेक मोठ्या माणसांचं बोट धरून मी चाललो. अनेक लहानांना बोटाला धरून चालविलं. ही सर्व लहान-थोर माणसं या लेखमालेच्या निमित्तानं मला खुणावताहेत, मला स्पर्श कर म्हणाताहेत. अनेक ब-या-वाईट घटना माझ्या भोवती फेर धरून नाचताहेत. या सगळ्याचं शब्दांकन करण्याचा माझा हा प्रामणिक प्रयत्न, गोड मानून घे एवढीच रसिका, तुझ्या चरणी प्रार्थना.

कोणाबद्दल कडू-वाईट मी लिहिणार नाही अशी माझी प्रतिज्ञा आहे. या सर्व गोष्टींच्या पल्याड मी गेलो आहे. आता ’पैल तीरी काऊ कोकताहे’ अशी माझी अवस्था आहे. पण तरीही मी माणूस आहे, स्खलनशील आहे. माझ्याकडून, प्रसंगी काही कोणाबद्दल कडू-गोड लिहिलं गेलं तर आपण मला क्षमा करालच. पण त्यांनीही मला क्षमा करावी अशी विनंती. एक मात्र नक्की, की आपल्या रंजनासाठी आम्ही ’लटके ना बोलू, सांगू वर्तमान खोटे’. जे असेल ते खरं असेल, तो योगायोग किंवा काल्पनिक आहे असं कोणी समजू नये!

आता पुढच्या आठवड्यात मी माझ्या आठवणीतील पहिला मोती आपणास अर्पण करण्यासाठी येणार आहे. असाच मी वर्षभर येणार आहे. आपणास ह्या मोत्याचा चारा भरवण्याचं श्रेय अर्थातच चाफ़ा.कॉमकडे आहे. मोत्याची झळाळी आणि चाफ़ाचा सुगंध लेवून आता ही मालिका अखंडित चालू रहावी अशी आपण माझ्यावतीनं त्या नियन्त्याकडे प्रार्थना कराल ना? करालच या विश्वासातला

आपला,
प्रभाकर पणशीकर

लेखनसहाय्य : अप्पा कुलकर्णी

http://chaphakar.blogspot.com/2010/05/blog-post_24.html

स्मरण गुरूंचे



गायन वादनाचार्य कै. पं. गजाननबुवा जोशी यांच्या जन्मशताब्दी वर्षांच्या निमित्ताने स्वरबहार या संस्थेने व्हायोलिन वादनाची मैफल पुण्याच्या स्नेहसदनच्या दालनात शनिवारी ५ फेब्रुवारी २०११ला आयोजित केली होती. दरवर्षी आपल्या गुरुंच्या स्मरणार्थ पुण्याचे ज्येष्ठ व्हायोलिनवादक पं. भालचंद्र देव हा कार्यक्रम आयोजित करीत असतात.



कार्यक्रमाच्या पूर्वाधात अनेक वर्ष बबनराव हळदणकरांना साथ करणारे पुणे आकाशवाणीचे निवृत्त व्हायोलिनवादक आणि पं. डी.के.दातार यांचे शिष्य रत्नाकर गोखले यांचे वादन रंगले. प्रारंभी भिमपलास रागात विलंबित एकताल आणि द्रुत तीन ताल सादर केला. पं. गजानबुवांनी बांधलेली जयताश्री रागातली एक रचनाही सादर केली. शेवटी पं. भीमसेन जोशी यांचा अधिक देखणे हा अभंग सादर करून आपल्या सुरेल आणि गायकी पध्दतीने वादनाची सांगता केली. त्यांना तबल्यावर पं. सुरेश तळवलकरांचे शिष्य मयंक बेडेकर यांनी अतीशय समर्पक साथ केली.

उत्तरार्धात भालचंद्र देव ( पं. गजाननबुवा जोशी यांचे शिष्य) आणि सौ. चारूशीला गोसावी (भालचंद्र देवांची कन्या व शिष्या) यांच्या व्हायोलिन वादनाची जुगलबंदी रंगदार झाली. जुगलबंदीतून सादर केलेली मधुवंती रागातली रचना सुरेल तर होतीच पण ती तेवढीच बहारदारपणे या दोन कलावंतानी सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. मधुवंतीनंतर सादर झालेला राग होता श्री. या श्री रागातली पं. गजाननबुवांची मध्यलय तीनतालातली रचना सादर करून भैरवीने मैफलीची सांगता झाली. त्यांना तबला साथ केली ती रविराज गोसावी (चारूशीला देव यांचे पुत्र) यांनी. त्यांच्या वादनकौशल्यावर खूष होऊन रसिकांनी टाळ्याची पावतीही दिली. उत्तरार्धानंतरच्या कार्यक्रमाचे आणि एकूणच मैफलीचे संचलन राजय गोसावी यांनी केले. या पितापुत्रींचे वारंवार कार्यक्रम होवोत हिच आमची इच्छा.

गुरूंचे स्मरण करताना आजोबा. भालचंद्र देव. कन्यका आणि शिष्या सौ. चारूशीला गोसावी. तबल्यावर नातू रविराज गोसावी आणि सूत्रे हाती होती ते जावई राजय गोसावी. असा हा नात्याचा सुरेख आणि सुरेल संगम स्नेहसदनाच्या मंचावर एकत्रित झाला.

Wednesday, February 2, 2011

हा गानप्रवास आता संपला


महाराष्ट्रात आणि देशभरात असं एखादंच शहर असेल की जिथं पंडित भीमसेन जोशी यांचे तानपुरे झंकारले नाहीत. ख्यालगायकीच्या या राजाने हिंदुस्तानी संगीत सर्वदूर पोहोचवलं. किराणा गायकीला लाभलेल्या या समाजमान्यतेचं आणि प्रतिष्ठेचं श्रेय निर्विवादपणे भीमसेन यांनाच द्यावं लागतं.

किराणा गायकीचा आपल्याला जवळून ज्ञात असलेला प्रवास खाँसाहेब, अब्दुल करीम खाँ, सवाई गंधर्व आणि पं. भीमसेन जोशी असा आहे. संगीतातील परंपरांचे प्रवासही पाहण्यासारखे असतात. खाँसाहेबांचा आवाज अप्रतिम सुरेल होता; पण त्यांच्या गाण्यात बोलतान नव्हती. त्यांच्या सुरेल आलापीला रसात्मकता होती. सवाई गंधर्व तर त्यांचेच शिष्य! त्यामुळे त्यांची छाप भीमसेनांच्या गाण्यावर पुरेपूर होती. विशेषत: स्वर लावण्याची भीमसेनांची पद्धत थेट गुरुजींसारखीच! अर्थात भीमसेनांचं गाणं खूप बदललं. किराणाची वैशिष्टय़ं तिच्यात होतीच शिवाय दीर्घकाळच्या अभ्यास- चिंतनातून आणखीही बरेच त्यांनी साध्य केलं. किराणाची गायकी मुख्यत: तंत अंगाची आहे. गायकी स्वरप्रधान असली तरी आवाज लावण्याची या घराण्याची पद्धत अन्य घराण्यांपेक्षा काहीशी वेगळी आहे. ती गळ्यावर ताण देणारी आणि थोडी कृत्रिम आहे असं टीकाकारांना वाटतं. हा उणेपणा, तंत्रदोष असला तरी तिचे नाते ‘गोबरहारी बाणी’शी आहे. कारण आर्तता आणि भक्तिभाव हे तर या वाणीचे विशेष. भीमसेनांच्या आलापीत हे भाव किती उत्कटतेनं प्रकट होतात! स्वरांची आस अखंड टिकणे आणि एका स्वरातून दुसरा स्वर निर्माण होणे हे तंत अंगाचे अविभाज्य विशेष मानले जातात. भीमसेनांच्या प्रत्येक मैफलीत या वैशिष्टय़ांचा प्रत्यय पुरेपूर येतो. आकारयुक्त आलापी ही किराणाची खासियत नव्हे. बंदिशीतील किंवा चिजेतील मुखडय़ाच्या अंगाने जाणारी आलापी किराणात केली जाते. भीमसेनांच्या आकारयुक्त आलापीत हे दोन्ही गुणविशेष आढळतात. त्याबाबतीत केसरबाईंचा प्रभाव ते स्वत: मान्य करत. एकेक स्वर वाढवून रागाचा विस्तार करण्याची पद्धत किराणा घराण्यात आहे. गंधारापर्यंत या पद्धतीने स्वरविस्तार करून एक भारदस्त परिणाम साधला जातो. वेगवेगळ्या स्वराकृतीतून रागाची प्रतिमा उभी राहाते. त्याचीच छाया मैफलीवर पसरते. आसदार स्वर आणि स्वरांवरील ठहराव यातून गाणं रंजक कसं करायचं याची हातोटी भीमसेनांना साधली. सवाई गंधर्वाकडे शिकत असताना यातले काही बारकावे समजले. त्यातूनच मैफल जिंकण्याचा मंत्रही त्यांना अवगत झाला.

हिंदुस्तानी संगीताच्या गेल्या शंभर- सव्वाशे वर्षाच्या इतिहासात अल्लादिया खाँ, भास्करबुवा बखले, वझेबुवा, अब्दुल करीम खाँ, फैयाज खाँ आणि मंजी खाँ यासारख्या मातब्बर गवयांनी आपले स्वतंत्र स्थान निर्माण केलं. प्रत्येकाच्या आवाजाची जात वेगळी. गाण्याचा ढंग वेगळा आणि ज्याचं त्याचं सामर्थ्यही भिन्न गुणावर आधारित होतं. या परंपरेतच भीमसेनांचं स्वत:चं स्थान होतं आणि आहे. ते त्यांनी त्यांच्या आवाजानेच निर्माण केलं. त्यांचा आवाज अस्सल पुरुषी- मर्दानी होता. आवाज आणि स्वर या दोन्ही भिन्न गोष्टी आहेत. आवाज हे साधन आणि स्वर हे माध्यम आहे याची जाणीव त्यांना होती. त्यांचा आवाज निसर्गदत्त गोड नव्हता. विशिष्ट त-हेच्या मेहनतीनं त्यांनी तो घडवला होता. त्या आवाजातून प्रकटणा-या स्वरांची किमया अद्भूत आहे. उत्तम जुळलेल्या तंबो-याच्या स्वरांच्या पार्श्वभूमीवर भीमसेनांनी पहिला आकारातला षड्ज लावला की सहजपणे श्रोते ‘व्वा!’ असा उद्गार काढत. आवाजाची झेप आणि स्वरांची फेक मोठी जबरदस्त होती. त्यांना दमसास स्तिमित करत असे. मर्दानी आवाजात मार्दवही होते. स्वराची आस आणि षड्जाशी असणारं नातं यामुळे ते श्रोत्यांना खिळवू ठेवत. आलापी केवळ आकाराची नाही. नुसत्या आकाराने रुक्षता येऊ शकते. स्वरात गोलाई आणि सच्चाई हवी. ती पुरेपूर होती. संथ, संयमित, भारदस्त आलापीतून रागविस्तार करत गाण्याचा उत्कर्ष कसा साधायचा याचं मर्म त्यांना हिराबागेतल्या पहिल्या मैफलीपासून साधलं होत. त्यांची मैफल रंगली नाही असं सहसा घडलं नाही.

केसरबाईंची आकारयुक्त आलापी आणि अमीरखाँची उत्तुंग तान भीमसेनांनी आपल्या गायकीशी एकरूप केली होती. चारी अंगांनी फुलत जाणारी आलापी आणि तानांचे अलंकरण यांचा आकृतीबंध त्यांच्या कोणत्याही मैफलीत प्रत्ययाला येई. प्रदीर्घ तानांच्या सरी म्हणजे स्वरवर्षावच! म्हणून भीमसेनांची अशी अनेक गुणांनी नटलेली मैफल हा श्रवणसुखाचा अत्युच्च आनंद देणारा अनुभव ठरायची.

मैफल कोणतीही असो, तंबो-यांच्या मध्यभागी भीमसेनांची सावळी मूर्ती गायला बसली की, पहिल्या षड्जातच मैफल काबीज व्हायची आक्रमक ढंगाची, काहीशी विरश्रीयुक्त गायकी म्हणता म्हणता रंग जमवू लागे.

भीमसेन मैफलीत काय गाणार अशी कुतूहलजन्य उत्सुकता त्यांच्या श्रोत्यांना सहसा नसे, कारण ते ठराविकच राग गात. अनवट राग गाण्याकडे त्यांचा कल नसे. याबद्दल त्यांच्यावर घेण्यात येणारे आक्षेप त्यांनी कधी नाकारले नाहीत. उलट ते याचे सार्थ स्पष्टीकरण देखील करत. प्रत्येक गायकीचे मैफलीचे, गळ्यावर चढलेले राग ठराविकच असतात. प्रचलित, आम रागांतील सौंदर्यच अधिक समर्थपणे दाखवता येतं असं त्यांना वाटे. भीमसेनांना सावनीपेक्षा बिहाग जवळचा वाटणं स्वाभाविक आहे. ‘कैसे सुख सोवे’ सारखी पारंपारिक बंदिश गाऊन भीमसेन सर्वागाने बिहाग राग साकारत.

तोडी, मियाँमल्हार, ललत, मुल्तानी, दरबारी, शुद्धकल्याण, अभोगी, मालकंस, मारुबिहाग, शुद्धसारंग, वृंदावनीसारंग हे पूर्वागप्रधान राग म्हणजे किराणा घराण्याचं राखीव क्षेत्र असं म्हटलं जायचं. त्यातही हे राग भीमसेनांकडूनच ऐकावेत असे वाटे. सकाळच्या मैफलीत तोडी, ललत, कोमल रिषभ आसावरी हेच राग ते सातत्याने गात पण त्याची गंमत वेगळीच असे. कोमल रिषभाची गडद छाया या गाण्यावर रेंगाळत राही. आजही तेच सूर कानात आहेत. सायंकाळच्या मैफलीतला पूरिया मारवा, मारवाश्री असो, किंवा रात्रीच्या मैफलीतला दरबारी, अभोगी, मियाँमल्हार, मालकंस, मारुबिहाग; ख्यालाच्या विस्तारानंतर तिन्ही सप्तकातील ताना सुरू झाल्या की सभागृह चैतन्यमय होऊन जात असे.

भीमसेनांनी ख्यालगायकी ख-या अर्थाने सर्वसामान्यांपर्यंत नेली. रागाचं शास्त्र कळलं नाही, बंदिश माहिती नसली तरी गाणं भावतं, भुलवतं! मैफलीत ज्या दर्जानं ते ख्याल पेश करायचे तेवढय़ाच ताकदीनं ठुमरी गायचे. ठुमरी गायनातील अभिजातता व सौंदर्य त्यांच्या गाण्यात होतं. जडणघडणीच्या काळात त्यांनी बुजुर्गाचं गाणं खूप ऐकलं होतं. त्यात बडे गुलामअली, सिद्धेश्वरीदेवी, बेगम अख्तर यांचाही समावेश होता. ठुमरीचे संस्कार त्यांच्यावर त्यातूनच झाले. कन्नड भाषक भीमसेन यांना ठुमरीचा अस्सल ढंग कसा उमगणार, याबद्दल काहींना शंका होती. ठुमरीचं लालित्य, नखरा आणि दर्द भीमसेनांची कोणतीही ठुमरी ऐकली तरी येईल.
स्वराकृतीबरोबर शब्दाकृतींनाही ठुमरीत स्थान असतं. शृंगाराबरोबर विरह, व्याकुळतेचं दर्शन भीमसेन कमालीच्या उत्कटतेनं घडवत. मिश्र काफीतली ‘पिया तो मानत नाही’ किंवा जोगियातील ‘पिया मीलन की आस’ ऐकताना भीमसेनांचं ठुमरीवरचं प्रभुत्वही प्रत्ययाला यायचं.

ख्यालगायकीच्या या राजाने भजनगायकीतही स्वतंत्र ठसा उमटवला. रागदारी मैफली एवढीच ‘संतवाणी’ची मैफल रंगे. आठ- दहा हजाराच्या समुदायाला खिळवून ठेवण्याचं सामर्थ्य त्यांच्या भजनात आहे. ख्यालाएवढीच तल्लीनता भजनातही. भजन गायकी हा त्यांचा स्थायीभाव नव्हता. पुरंदरदास, जगन्नाथदासांची कन्नड भजनं, ब्रह्मानंदाची हिंदी भजनं व रामभाऊंकडून घेतलेले मराठी अभंग ते पूर्वी गात होते. ‘श्रीनिकेतना पालयमा’, ‘भाग्यदा लक्ष्मीवारगा’, ‘कायो करुणानिधे’, यासारखी कन्नड भजनं मराठी भाविकांनासुद्धा ठाऊक आहेत. ख्याल आणि ठुमरीबरोबरच भजन गाण्याची परंपरा किराणात आहे. भीमसेनांनी मात्र सांप्रदायिकांशी नाते जोडण्याचा प्रयत्न केला. वारकरी संप्रदायाची पठडी आणि भीमसेनांची ‘संतवाणी’ यात साम्य आणि भेदस्थळे बरीच असली तरी मराठी भाषक जनसामान्यांना भीमसेनांनी गायिलेले अभंग आपलेसे वाटतात. अभंग गायनातील लडिवाळ भावामुळे ही जवळीक साधली जात असावी.

प्रकृति अस्वास्थ्यामुळे बालगंधर्व आणि सवाई गंधर्व अखेरच्या काळात खासगी वा जाहीर मैफलींतून भजनं गाऊ लागले होते. पलुस्करांनी तर भजन हे संगीत प्रसाराचं साधन मानलं होतं. नारायणराव व्यास, ओंकारनाथ, द. वि. पलुस्कर यांच्या भजनाच्या ध्वनिमुद्रिका एके काळी लोकप्रिय होत्या. या पार्श्वभूमीवर भीमसेनांच्या ‘संतवाणी’चे वेगळेपण लक्षात येते.‘संतवाणी’चा कार्यक्रम म्हणजे ‘भागवत धर्माचं स्वरचित्र’च ठरे. भीमसेन मैफलीत भैरवी म्हणून भजनं गात होते. ‘जो भजे हरिको सदा’ किंवा ‘कायो करुणानिधे’, ‘अगा वैकुंठीच्या राया’ ही उदाहरणं बोलकी आहेत. ‘गुळाचा गणपती’ या पु.लं.च्या चित्रपटातलं, गदिमांचं ‘इंद्रायणी काठी’ हे गीत भजनासारखंच लोकप्रिय झालं.

1968 ते 1972 या काळात भीमसेन पुणे आकाशवाणीवरच अभंग गात होते. राम फाटक यांनी चाली दिलेले अभंग म्हणजे भीमसेनांचे भजनगायकीचं एक नवं उत्कट रूप ठरलं. ‘अधिक देखणे तरी निरंजन पाहणे’ पुणे केंद्रावरून प्रसारित झालं आणि हळूहळू ज्ञानदेव, एकनाथ, तुकाराम यांसारख्या संताच्या रचना भीमसेनांच्या आर्त स्वरांमुळे श्रोत्यांच्या ओठी येऊ लागल्या. राम फाटकांचं आणि भीमसेनांचं छान जमलं. आकाशवाणीवरून प्रसारित झालेल्या अभंगांच्या एच. एम. व्ही.नं ध्वनिमुद्रिका आणि ध्वनिफिती काढल्या आणि त्यातूनच 1972 मध्ये ‘संतवाणी’चा कार्यक्रम आकाराला आला. पुण्या- मुंबईतल्या वातानुकूलित सभागृहापासून ते आळंदी- पंढरपूरच्या देवस्थानासमोरील उघडय़ा पटांगणापर्यंत ‘संतवाणी’चे कार्यक्रम रंगू लागले. भीमसेनांच्या अभंगगायनात ही तन्मयता आली कोठून? बहुधा आध्यात्मिकतेचा हा धागा त्यांच्या व्यक्तिमत्त्वातच असावा. अभंग गायनातील प्रासादिकता त्यांनी आपल्या गुरुजींकडून घेतली असावी. सवाई गंधर्व ‘रामरंगी रंगले मन’ किंवा ‘कान्होबा तुझी घोंगडी’ अप्रतिम म्हणत. तीच उत्कटता भीमसेनांच्या गाण्यात प्रकटत असे. भीमसेन‘नामा म्हणे मज विठ्ठल सापडला’ ही ओळ म्हणतात, तेव्हा श्रोत्यांनाच विठ्ठलभेटीचा प्रत्यय येतो. ‘अणुरणिया थोकडा,तुका आकाशाएवढा’ म्हणताना तुकारामाच्या काव्यातील व्यापकतेचा अनुभव येतो. ‘विठ्ठल गीती गावा’, ‘कसा मला टाकून गेला राम’, ‘राजस सुकुमार’ या रचना मुद्दाम ऐकायला हव्यात. त्यातील काही ओळींची पुन्हा येणारी आवर्तने श्रोत्यांना डोलायला लावतात.
ख्याल, ठुमरी नाटय़गीत आणि भजन गाणा-या भीमसेनांनी नवे राग बंदिशी रचल्या, चित्रपटातून पार्श्वगायन केले. गोपालकृष्ण भोबे यांच्या ‘धन्य ते गायनी कळा’ नाटकाला संगीत दिले. अर्थात नवे राग बांधणं व चिजा रचणे हा त्यांचा स्वभाव नव्हता, ती त्यांची वृत्ती नव्हती; पण ललतभटियार, हिंदोलललत, कलाश्री यासारखी रागरूपं ही भीमसेनांचीच निर्मिती आहे. या रागातल्या चिजा आता मैफलीतून परिचयाच्या झाल्या आहेत. ‘कलाश्री’ मधील सरगम अनोखी आहे.‘ख्यालगायकीच्या राजा’चा हा गानप्रवास आता संपला आहे.

प्रसन्नकुमार अकलूजकर



http://www.prahaar.in/collag/36329.html

Friday, January 28, 2011

देऊळ चित्रपटाची घोषणा झाली झोकात





नाना पाटेकर आणि दिलिप प्रभावळकर यांच्या अभिनयाची जुगलबंदी
नेहमीची पारंपारिकता झुगारून देविशा फिल्मसने आपल्या नव्या चित्रपटाच्या नावाची घोषणाच इतक्या झोकदार प्रमाणे ऐटित केली की......मराठी चित्रपट सृष्टीत एक निराळा तरीही मराठीची पताका उंचविणारा चित्रपट येणार याची खात्रीच देऊळच्या निमित्ताने झासी.


वेगळ्या धाटणीचा आणि आपल्या मनातला चित्रपट करण्याची ही संधी मिळाल्याचे कबूल करून देऊळच्या निमित्ताने धाडसाने विषयाशी भिडलो असे ते सांगत नाना-दिलिप यांच्या अभिनयातून दोन अभिनय संपन्न नट ज्यांना आपण लहानपणी पाहिले त्यांच्याकडून ही गोष्ट चित्रपटातून साकार होताना पाहणे हा आनंदही पटकथा-संवाद लेखक गिरीश कुलकर्णी यांनी आपल्या खास शैलीतव्यक्त केला ...त्यांच्या मनोगतातून देऊळ मधून एका समुहाची, गावाची, आजच्या काळची गोष्ट आशय गंभीर तरीही...तो विनोदी पध्दतीने चित्रपटातून सांगण्याचा प्रयत्न केल्याचे स्पषट झाले.
पुण्याच्या हॉटेल प्राईडमध्ये निर्माते अभिजित घोलप यांच्या या चित्रपटाची घोषणा २७ जानेवारीला झाली. तीही वेगळ्या थाटात, दिमाखात आणि संगीताच्या निनादात.. टाळ्य़ाच्या गजरात...ते ही उर्स्फूतपणे...
फेब्रुवारीच्या चार पासून वाईजवळच्या खेड्यात चित्रपटाचे चित्रिकरण सुरू होत आहे. तिथे साकारणारा हा दिग्दर्शक उमेश कुलकर्णी यांच्या नजरेतून उमटत जाणार आहे.
दिलिप प्रभावळकरांच्या भाषेत सांगाचये झाले तर उमेश कुलकर्णी हा सिनेमाच्या भाषेत काम करणारा दिग्दर्शक....
नानाचा आपण फॅन असल्याची कबुली देत त्याच्या अभिनयातून त्याचा आवाका थक्क करणारा आहे... त्याच्याबरोबर काम करणे हा योग या मिमित्ताने जुळून येतोय याचा आनंदही दिलिप प्रभावळकरांनी आपल्या सत्काराच्या भाषणात व्यक्त केला.
त्यांना नुकताच संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार जाहिर झाला म्हणून नाना पाटेकरांच्या हस्ते त्यांचा सत्कार इथे करण्यात आला...या वेळी दिलिप प्रभावळकरांनी पुरस्कार मिळाल्य़ाचा आनंद नक्कीच आहे.. अजून अनेकांचा पुरस्कार होणे गरजेचे आहे... हे ही स्पष्ट केले. लगे रहो मुन्नाभाई मधील गांधींच्या भूमिकेसाठी पुरस्कार मिळाला तेव्हा जसा आनंद झाला तसा आज होत असल्याचेही ते म्हणाले.
नाना पाटेकरांच्या शब्दातच सांगाचये म्हणजे त्याची ( दिलीप प्रभावळकरांची) पात्रता जेवढी आहे तेवढे त्याला नाव मिळाले नाही असे वाटते....दिलिपची हसवा फसवी मधली भूमिका मी कित्येक वेळा पाहिली आहे.. खरचं इतका छान....
पण त्यांने स्वतःला मराठी पुरते मर्यादित ठेवलेय....आम्हाला तो हिंदीत मिळाला नाही...
मला खूप दिवसांनी मराठीत सिनेमा करायला मिळतोय..याचा आनंद आहे...हा चित्रपट चालेल... तो तुम्हाला हसता हसता विदारक सत्य सांगेल...चित्रपट चांगला होईल याची खात्री आहे.. मला उत्तम भूमिका दिली आहे.. मी ती छान करेन असा विश्वास द्यायलाही नाना पाटेकर विसरले नाहीत. इतरवेळी ज्यांच्याशी बोलायला घाबरतो तो नाना पाटेकरांचा आविर्भाव इथे नव्हता..ते खुशीत आणि आपल्या माणसात मनसोक्त विहरत होते...

गेले दहा महिने चित्रपटाचा अभ्यास आपण करत आहोत.. आज रिजनल सिनेमाला जे चॅलेंज दिसते ते पाहून ते स्विकारून चित्रपट यशस्वी करण्यासाठी राईट टिम निवडल्याची खात्री तंत्रज्ञानाच्या क्षेत्राक़डून चित्रपट निर्मितीच्या क्षेत्राक़डे वळणा-या अभिजित घोलप या मराठी निर्मात्याने नेमक्या वेळी सांगून जिद्दीचा प्रत्यय दिला. या चित्रपटाद्वारे मार्कटिंग आणि चित्रपटाचे ब्रॅंडिंग उत्तम करण्यासाठी ते आता सज्ज झाले आहेत. आपली संस्था उत्तमोत्तम विषयावरचे चित्रपट बनवून मराठी प्रेक्षकाला आनंदी बनविण्याचा प्रयत्न करेल असा आशावाद दिला.
देऊळच्या निमित्ताने ग्रामीण पार्श्वभूमि लाभलेली मराठीतील एक ब्लॅक कॉमेडी पाहायला मिळेल याची खात्री वाटते.. वळू आणि विहिर नंतर उमेश कुलकर्णी यांच्या कडून नाना पाटेकर आणि दिलिप प्रभावळकरांमधला अभिनेता ताकदीने पडद्यावर दिसेल. या दोघांचा एकत्रीतपणे साकारलेला शोवटचा प्रसंग वनटेक मध्ये तर चित्रित होईलच..पण तो क्लायमॅक्स आत्तापर्यतच्या मराठी चित्रपटात मैलाचा दगड म्हणून साकारेल असा विश्वास उमेश कुलकर्णी यांना आहे....


मराठी चित्रपटाच्या भविष्याकडे पाहताना देऊळच्या कलावंतांनी रचलेली वीट न वीट प्रेक्षकांना सजवून अनुभवता येईल.
श्रेयनामावली

देऊळ
निर्माता- अभिजित घोलप
दिग्दर्शक- उमेश कुलकर्णी
पटकथा,संवाद- गिरीश कुलकर्णी
गीतकार- स्वानंद किरकिरे
संगीतकार- मंगेश धाकडे
प्रमूख भूमिका-
नाना पाटेकर, दिलीप प्रभावळकर, गिरीश कुलकर्णी, डॉ.मोहन आगाशे, उषा नाडकर्णी, अतिशा नाईक, किशोर कदम, विभावरी देशपांडे, ज्यांती सुभाष, मंजूषा गोडसे, हृषिकेश जोशी इत्यादी.....

सुभाष इनामदार,पुणे.

subhashinamdar@gmail.com
www.subhashinamdar.blogspot.com
www.culturalpune.blogspot.com
Mob. 9552596276

Monday, January 24, 2011

Vice President Condoles the of Death Pandit Bhimsen Joshi

The Vice President of India Shri M. Hamid Ansari has deeply condoled the sad demise of Pandit Bhimsen Joshi, Bharat Ratna awardee and one of the titans of Hindustani music of our times. In his condolence message, he has said that Pandit Bhimsen Joshi was unique in preserving tradition while incorporating new ideas in his music. He has thus become a living tradition in Hindustani music with tremendous influence on classical musicians, music lovers and the general public

Following is the text of the Vice President’s condolence message :

“I am deeply grieved to learn about the sad demise of Pandit Bhimsen Joshi, Bharat Ratna awardee and one of the titans of Hindustani music of our times.

Pandit Bhimsen Joshi was unique in preserving tradition while incorporating new ideas in his music. He has thus become a living tradition in Hindustani music with tremendous influence on classical musicians, music lovers and the general public. His rendering of devotional and patriotic songs are etched in public memory. By his personal example, he has demonstrated that a thirst for knowledge and music can propel individuals with limited means to seek such learning against all odds. His loss has created a huge void in the world of music. His services and contribution to music shall always be remembered.

My wife joins me in sending our heartfelt condolences to the members of the bereaved family and the wide circle of his admirers and friends and pray the Almighty to give them strength to withstand this loss.”

PM Condoles the Passing Away of Pt. Bhimsen Joshi

Prime Minister Dr. Manmohan Singh has condoled the sad demise of Pt. Bhimsen Joshi. In his message, Dr. Manmohan Singh said that the nation and the music world has lost a towering musical genius and the most famous and accomplished exponent of the Kirana gharana.

Following is the text of Prime Minister’s Message:

“I was deeply grieved to learn of the sad demise of Pandit Bhimsen Joshi. I join music lovers across the world in mourning the demise of this iconic vocalist. In his passing away, the nation and the music world has lost a towering musical genius and the most famous and accomplished exponent of the Kirana gharana.

For many decades, Pandit Joshi led the renaissance of Hindustani classical music with his unique style and mastery over ragas. He showed that music knows no linguistic or cultural barriers. He enriched the Kirana gharana through his distinctive individual style and adaptation of characteristics from other gharanas to create a unique vocal idiom. Generations of listeners were enthralled by his mellifluous voice, mastery of rhythm and magnificent renderings of bhajans and khayals. His rendering of the song "Mile Sur Mera Tumhara" on the theme of national integration is etched in the popular consciousness. To honour his exceptional musical talents and his success in reviving a sacred classical tradition among the people, the country bestowed its highest national honour, the Bharat Ratna on him in 2008.

I convey my heartfelt condolences to you and all the members of Pandit Bhimsen Joshi’s family, his disciples and admirers around the world”.

Kumari Selja Condoles the Death of Pt. Bhimsen Joshi

The Union Culture Minister Kumari Selja has condoled the death of legendary classical singer Pt. Bhimsen Joshi. In her condolence message here today, she said, Pt. Bhimsen Joshi was the leading exponent of the "khayal" form of singing and his renditions of devotional songs - bhajans and abhangs, mesmerised several generations of classical music lovers in India as well as abroad. She said that Pt. Joshi has enthralled a large number of audiences of all age and social strata through decades through live concerts, albums and films songs.

She said, for his dedication and devotion to Hindustani Classical Music and his role in its promotion, Pt. Joshi had been conferred the Sangeet Natak Akademi Award in 1976 and the highest civilian award Bharat Ratna in 2008.

President of India Condoles Passing Away of Pandit Bhimsen Joshi

The President of India, Smt. Pratibha Devisingh Patil has condoled the passing away of Pandit Bhimsen Joshi.

In her condolence message, she has said “Pandit Bhimsen Joshi was one of the most acclaimed exponents of Khayal Gayki of the Kirana Gharana and a doyen of Hindustani classical music. In his passing away the nation has lost one of the greatest and most popular classical vocalists.”

मोठ्या मनाचे स्वरभास्कर


बाजीराव रोड पुणे शाखेत असताना एक दिवस संगीतप्रेमी विजय दीक्षित यांचा फोन आला.

भीमसेन जोशींना वीस हजार रुपयाचं कर्ज बँकेकडून हवं आहे. अट एकच आहे. आत्ता त्वरित हवंय.

देतो. बँकेत या. तुम्ही या कर्जाला जामीनदार राहा.

ठीक आहे. अध्र्या तासात पोहोचतो.

अर्जदार नामवंत होते. त्यांना कर्ज देणं हे त्यांना सेवा देण्याची बँकेला मिळालेली संधीच होती. अशा वेळी मन दोन प्रकारे विचार करीत होतं.
एक म्हणजे कर्जाविषयी फारसं बोलणं हे या महान व्यक्तिमत्त्वाच्याबाबतीत बरं दिसणार नाही. तेव्हा आपण प्रत्यक्षात त्यांना कर्जाचे कारण, परतफेड कालावधी असले काहीही विचारायचे नाही. कर्ज हा विषयच काढायचा नाही. सन्मानाने पौसे सुपूर्त करायचे.
दुसरं व्यवहारी मन सांगत होतं. अर्जामध्ये कर्जाचे कारण काय लिहिणार?
मग वौयक्तिक कारण लिहायचं ठरवलं. कागदपत्रात फक्त प्रॉमिसरी नोट घ्यायची व कोणतेही तारण घ्यायचे नाही असा निर्णय घेतला. माझ्या मंजुरी अधिकारात एकाच्या सहीनं हे कर्ज देता येत नव्हतं. त्यासाठी दीक्षित यांना जामीनदार म्हणून घेतलं. सर्व कागदपत्रे तयार ठेवली. कॅशिअरना रु. 20,000च्या कोर्या नोटा घेऊन माझ्या केबिनमध्ये बोलवलं. एक गुलाब मागवून घेतला. स्वरभास्कर शाखेत येणार यामुळे आम्हा कर्मचार्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं.

स्वरभास्कर भीमसेन जोशी केबिनमध्ये आले. मी उभं राहून त्यांना अभिवादन केलं. त्यांना बसण्याची विनंती केली. ते बसताच मी व कॅशिअरने मिळून रु.20,000च्या कोर्या नोटा असलेले बंद पाकीट व गुलाब त्यांना दिले. त्यांनी ते स्वीकारले. मी चहा मागविला होताच. तो येईपय|त अगदी मोजक्या अशा कागदपत्रांवर सह्या घेऊन टाकल्या. बँकेच्या आठवणी, सवाई गंधर्व महोत्सव अशा विषयांवर बोलणं झालं. कोठेही कर्जाबद्दल विषयही काढला नाही.
चहापानानंतर स्वरभास्कर गेले.
एका महान व्यक्तिमत्त्वाला सेवा दिल्याचा आनंद मला मिळाला. थोड्याच वेळात आमच्या हेड आॅफिसमधून फोन आला. बँकेचे जनरल मॅनेजर ही. बी. गांधीसाहेब बोलणार होते. काही काम करायचे राहिले की साधारणत: त्यांचा फोन यायचा. थोड्याशा विवंचनेतच फोन घेतला. आश्चर्य म्हणजे त्यांनी माझं अभिनंदन करण्यासाठी फोन केला होता. माननीय भीमसेन जोशी यांनी गांधीसाहेबांना फोन करून बँकेत उत्कृष्ट सेवा मिळाल्याचं सांगितलं होतं.

भीमसेन जोशींकडून झालेलं कौतुक सदैव स्मरणात राहील.

वेळेपूर्वीच कर्जाची परतफेड झाली होती. बँकेने वौयक्तिक कर्ज देण्याचे अधिकार दिलेले असल्यामुळे अशी सेवा देता आली.
मी केवळ उत्सुकता म्हणून हे पैसे कशासाठी घेतले याची माहिती मिळविली.
भीमसेनजींना चांगल्या गाड्या वापरायला आवडत. ते स्वत: कौशल्यानं गाडी चालवत. ते विलंबित रागात गाणारे असले तरी गाडी मात्र द्रुतगतीनं चालवत. गाड्यांची देखभाल व्यवस्थित होते ना हे पाहण्यास स्वत: मोटर गॅरेजमध्ये जात. त्यामुळे गॅरेजमधील मेकॅनिक मंडळींमध्ये त्यांच्याबद्दल आदर होता. या मेकॅनिक लोकांना बक्षिसी म्हणून ती रक्कम त्यांनी दिली होती.

केवढ्या मोठ्या मनाचं हे व्यक्तिमत्त्व!

श्याम भुर्के, पुणे

(श्याम भुर्के यांच्या `आनंदाचे पासबुक` या मेहता पुब्लीशिंग हाउसने प्रकाशित कलेल्या पुस्तकातून साभार )