Tuesday, February 8, 2011

संपादकांची जीभ कापली गेलीय...



‘अदृष्ट तरीही सत्य गोष्टींच्या भासाने कलावंत लौकिक चौकटीच्या पार जाण्याची धडपड करीत असतात
आणि इथेच त्यांच्या लौलिक अपयशाची आणि अध्यात्मिक आनंदाची सुरुवात होते.
यातून जाताना अवघे आयुष्य होरपळ होऊन जाते. जीवनसत्य प्रस्थापित करण्याऐवजी भाववून घेण्याची
ही धडपड कलावंताला दैवी असमाधान मिळवून देते. यातूनही ते जीवनसत्य शब्दांतून प्रकट करताना होणारा आटापिटा,
त्यात वारंवार येणारे अपयश यांतून कलावंतांची घडण होत जाते.
हे सगळे स्वीकारत गेले तरच कवी हा कवी होतो.
यापासून पळ काढणारा नुसताच पद्यकार म्हणून उरतो. हे इमान कसोशीने सांभाळता आले पाहिजे.
दिसामासाने ओटीपोटात वाढणारी आग आनंदाने जपली-जोपासली पाहिजे.
मला हे कितपत जमले आहे याचे उत्तर माझ्यापाशी नाही...

– गुरुनाथ धुरी
----------------------------------------------------------------


( विद्यमान पत्रकारितेवरचं एका कवीचं भाष्य आहे हे.वाचकांचं दुःख आणि खऱया पत्रकारांची खंत याहून वेगळी नसावी.)

1.

संपादकांची जीभ

कापली गेलीय

त्यांच्याच दाताखाली.

बोलता येत नाहीय बिचाऱयांना



...गाऱहाणी लिहिलेल्या जिभा

तळहातावर घेऊन लोक

रांगेत उभे

संपादकांचे क्षेम याचित



ः देश असा मुकाट नव्हता झाला कधी. बिच्चारा.



2.

किती उलथापालथी, विध्वंस

वृत्तपत्रभर

तरी दचकत नाही एकही शब्द.



3.

प्रत्येक अफवेची

होऊ शकत नाही

बातमी,



प्रत्येक बातमी मात्र

...असते स्वतःहून

उच्च दर्जाची अफवा.



4.

कवितेतील बातमी

मावत नाही कधीच

वृत्तपत्राच्या आख्ख्या पानात



(घटकापळाने-संतोष शेणई)



.


.

No comments:

Post a Comment