Saturday, October 26, 2024

नृत्य निपुण प्राजक्ता माळी..ह्यांच्या 'फुलवंती'च्या उत्तम निर्मितीला दाद द्यायलाच हवी..!

 


शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या  "फुलवंती" या कादंबरीवर आधारित   हा चित्रपट हा पेशवेकाळात असलेले कलेचे महत्व आणि बुद्धिमान व्यक्तींचा असलेला मान  दाखविणारा एक उत्तम आविष्कार.... म्हणजे फुलवंती..! 


हा चित्रपट काढणे आणि तोही इतक्या देखण्या पद्धतीने सादर करणे हे खरोखरच शिवधनुष्य..ते पेलण्याचे  साहस या चित्रपटातून यशस्वी झाल्याची नक्कीच नोंद घ्यावीशी वाटली.


प्रत्येक घटना..त्यातल्या व्यक्तिरेखा तुम्हाला खिळवून ठेवतात.. नृत्याची भक्कम  बाजू तुमचे मन प्रसन्न तर करतेच पण त्यासाठी घेतलेले प्रयत्न बेफाट आहेत..






हा चित्रपट कलाप्रेम ..आणि दिलेल्या  शब्दांचे महत्व  पेशवे काळात किती असामान्य होते ..आणि न्याय देणारे पेशवे कलेचा आणि बुद्धिमत्तेचा किती आदर करीत होते..त्याचेच दर्शन फुलवंती मध्ये घडते..


चित्रपटात अनुभवताना व्यक्तिरेखांचे संवाद तुम्हाला त्यातून नेमका परिणाम देतात..प्रवीण विठ्ठल तरडे..यांनी ही बाजू समर्थपणे पेलली आहे.

कुठेही अवस्तवता नाही..नेमके काय साध्य करायचे आहे ते लेखक जाणून आहे..प्रसंगांचा परिणाम साधणारे आणि व्यक्तिरेखांचे महत्व ओळखून चित्रपट घडत राहतो..

नर्तकीचे आणि नृत्य कलेचे महत्व ओळखून फुलवंतील दिलेली  भरपूर स्पेस..यातून सौदर्य अधिकाधिक बाहेर येते..

पुण्यातील वातावरण दाखविताना थोडक्या व्यक्तिरेखांच्या रूपाने सहज उलगडत जाते..


पेशवाई..दरबार.. त्यांची पात्रनिवड..आजूबाजूचे वाडे..वाड्यांची सुंदरता..प्रसन्नता..दरबाराचे भव्यपण..

नृत्य कलेतील बारकावे.. घुंगरूचे महत्व..पखावाजातील नादमयता..त्यासाठी शास्त्रीबुवा  यांनी घेतलेले परिश्रम..आणि सर्वात महत्वाचे म्हणजे नृत्याला महत्व देऊन नटविलेली  अतिशय उत्तम गाणी..


नाजूक आणि कलानिपुण फुलवंती..प्राजक्ता माळी यांच्या उत्तम ..देखण्या सादरीकरणातून चित्रपटभर भारून  राहते..



देखणा..रुबाबदार..आणि बुद्धिमान असलेल्या 

व्यंकट शास्त्री यांना गाष्मिर महाजनी यांनी भारदस्त ..आणि नेमक्या भावनिक प्रसंग साकारून उभा केला आहे..

लक्ष्मी या व्यक्तिरेखेत सोज्वळ रुपात देखण्या दिसत होत्या स्नेहल तरडे.. पण भुमिकेपेक्षा दिग्दर्शक म्हणून त्या अधिक प्रभाव पाडतात..

प्रसाद ओक, वैभव मांगले, ऋषिकेश जोशी,  समीर चौघुले,  चिन्मयी सुमित,  मंगेश देसाई,  वनिता खरस्त, जयवंत वाडकर...साऱ्याच कलाकारांनी चित्रपट अधिक परिणामकारक केला आहे..


अविनाश - विश्वजित या संगीतकार जोडीने गाणी ऐकत..नव्हे तर पहात रहावीत अशी छान घडविली आहेत.

आर्या आंबेकर, वैशाली म्हाडे, राहुल देशपांडे,  बेला शेंडे यांनी गायलेली गाणी मनावर अधिराज्य गाजवतात.. यातली गीते स्नेहल तरडे , वैभव जोशी आणि विश्वजित जोशी  ,डॉ. प्रसाद बिवरे, मंदार चोळकर याची आहेत..त्यांना दिव्य मराठीचा गंध आहे.. आहेत..त्याला अर्थ आहे.



घुंगरू आणि पखवाज यांचे नाते उलगडत 

जाणारा हा चित्रपट..

चित्रपट पहातो त्या महेश लिमये यांच्या उत्कृष्ट सिनेफोटोग्रफीच्या माध्यमातून..

रंगसंगती आणि परिणामकारकता सारेच यात उठून दिसते..

खरे तर बरेच काही लिहिण्यासारखे आहे..पण शब्द संपतात..तिथे चित्रे दिसू लागतात..

तसा हा नेहमीच्या कौटुंबिक पठडीत नसलेला कलात्मक दर्शन घडविणारा इतिहास..सौदर्य आणि कला..शास्त्र याकडे लक्ष वेधणारा  चित्रपट बनविल्यांद्दल ..एक मराठी  प्रेमी म्हणून प्राजक्ता आणि स्नेहल आणि सर्व  त्यासाठी कलाकारांचे आभार मानले पाहिजेत. 

तुम्ही आम्हाला अधिक समृध्द केलेत..

चित्रपट गृहात जाऊनच या फुलवांती.. चा अनुभव घेणे अधिक उत्तम राहील..


प्राजक्ता माळी यांच्या उत्तम  आणि धाडसी निर्मितीमुळे  हा चित्रपट एक सुंदर कलाकृती पाहिल्याचे समाधान मिळते..


या गोष्टी खटकतात....

एक म्हणजे फुलवंती.. यांची भाषा..मध्येच त्या ग्रामीण बोलीत बोलतात..तर बरेच वेळा..शुद्ध मराठीत..आणि कशी दोन्हींची सरमिसळ होते..


दुसरे म्हणजे.. फुलवंती.. यांना पुण्यात नृत्य सादर करण्यासाठी बोलाविले जाते..तेंव्हा त्या तलावात नहात असतात.. ह्याची काय आवश्यकता होती.. 

यमुनाजळी..किंवा.. देरे कान्हा..डोक्यात होते की काय..नकळे..!


उच्च बुद्धिमत्ता असलेला माणूस..सहज बाहेरच्या न जाणाणाऱ्या स्त्रीला  चुकून वेश्या..म्हणणे..

आणि पखवाज वादक होण्यासाठी असा आटापिटा करणे..


एक नोंद..म्हणजे चित्रपट संपल्यावर जेंव्हा  सहभागी कलाकारांची नामावली दाखविली जाते ...त्यानंतरही प्रेक्षक चित्रपटगृह सोडत नाहीत..शेवटचे नृत्य अनुभवत असतात..हा परिणाम चित्रपटाचा..




- सुभाष इनामदार, पुणे

subhashinamdar@gmail.com 


#Prajakttamaali #snehaltarde 

 #फुलवंती #Fulwanti


Thursday, October 17, 2024

उत्तम अभिनयाने आणि संगीताने सादर झालेली खणखणीत कलाकृती.. गोष्ट संयुक्त मानापमानाची..!

 


मराठी रंगभूमीवर १९२१ साली संगीतसूर्य केशवराव भोसले आणि नटसम्राट बालगंधर्व यांच्या एकत्र प्रयत्नातून टिळक फंडासाठी झालेल्या संयुक्त मानापमान या नाटकाने जो इतिहास घडविला त्यावर आधारित हे नाट्य...

यातली नाट्यमयता आणि तो काळ..आणि प्रत्यक्ष कलावंतांनी संगीत भूमिकांनी रसिकांवर केलेला परिणाम..त्याचा समजावर झालेला परिणाम सारेच या नाटकातून परिणामकारक बाहेर आले आहे.
शंभर वर्षाहून अनुभवलेल्या अभूतपूर्व घटनेला आपल्या अभ्यासपूर्ण लेखनातून अभिराम भडकमकर यांनी साकारलेल्या कलाकृतीला आपल्या लेखनातून मोठ्या हुशारीने ..कुठेही त्याचा इतिहास जसाच्या तसा बाहेर आणला.
मानापमान नंतर सौभद्र..नाटक करून बालगंधर्व यांना द्रौपदी नाटकाच्या कर्जातून बाहेर काढण्याचं केशवराव यांनी ठरविले होते..मात्र विषमज्वराने त्यांचा अकस्मात मृत्यू झाल्याची..आलेली बातमी कळताच बालगंधर्व यांच्या मनाला धक्का बसला..आणि तोच या नाटकाचा शेवटचा प्रवेश ठरला.
हृशिकेष जोशी यांनी तेव्हढ्याच तयारीने रंगभूमीवर उभी करून..तरुण पिढीला प्रेरणादायी ठरतील अशी कलाकृती रसिकांच्या भेटीला आणली आहे..
तीच म्हणजे हे गोष्ट संयुक्त मानापमानाची.. हे नाटक.





संगीत नाटकाच्या आणि एकूणच नाटकावर प्रेम करणाऱ्या सर्व मंडळींना पाहताना यात विलक्षण अनुभव मिळेल.. आजची तरुण पिढी आपल्या परंपरेचे जतन किती उत्तम रित्या मांडण्याचे कौशल्य दाखवीत आहे ..हेच नाटक पाहून दाद द्यायला अभिमानाने तयार होईल..एव्हढी
ताकद या कलाकृतीत आहे हे नक्की.




अशी कलाकृती रसिकांच्या भेटीला आणल्याबद्दल आधी निर्माते नाट्यसंपदा कलामंचे अनंत वसंत पणशीकर आणि चंद्रमंगल आर्ट्स .. शौर्य प्रोडक्शनचे श्यामराज पाटील यांचे मनापासून अभिनंदन करायला हवे.
नांदी..ते भैरवी असा हा संगीत प्रवास कौशल इनामदार यांच्या मार्गदर्शनाने नाटकात सजला..बहरला..
याला प्रदीप मुळ्ये यांचे प्रकाश आणि रंगसजावट आणि मधुरा रानडे यांची वेशभूषा अधिक तेजोमय करते.
मी पुण्यात १३ ऑक्टोंबर २४ रोजी प्रयोग पाहिला त्यात





ओंकार प्रभुघाटे... धैर्यधर ..गाणारा केशवराव



अजिंक्य पोंक्षे..भामिनी..बालगंधर्व
( पायाला दुखापत झाली असताना.. बँडेज बांधून त्यानी ज्या पद्धतीने भामिनीची पदे ..आणि सूत्रधाराच्या भूमिका केल्या..त्याला दाद द्यायला हवी..)





आशिष नेवाळकर...बालगंधर्व,( गद्य)
ऋषिकेश वांबुरकर..केशवराव .( गद्य)






श्यामराज पाटील .. लक्ष्मीधर,

प्रद्युम्न गायकवाड, परमेश्वर गुट्टे, ऋत्विज कुलकर्णी, आशिष वझे, निरंजन जाविर, श्रीराम लोखंडे,अश्विनी जोशी..या कलाकारांनी आपल्या कलेतून आम्हाला हा विलक्षण देखण्या कलाकृतीचा आनंद दिला.
संगीत मार्गदर्शन आणि ऑर्गन - सुशील गद्रे
तबला - अथर्व आठल्ये..





* केशवराव यांचे तरतरीतपण..आणि कोल्हापुरी भाषेचा लहेजा..
* बालगंधर्व..यांच्यातला मृदू पण आयुष्यातील धक्के खाऊन आलेला सहजी स्वभाव..
* संगीत गाणाऱ्या बालगंधर्व यांच्या पुरुषाने स्त्री वेशात केलेल्या हळव्या आणि पद्यातून उमटणाऱ्या पदांच्या जागा..
* केशवराव आणि बालगंधर्व यांचे नट आणि नाटकासाठी..कलावंतांसाठी असलेले प्रेम..
आणि कलेविषशी निष्ठा..
*देशप्रेम..आणि टिळक यांचे प्रती असलेला भाव..
* त्या काळाचे दर्शन घविणारे प्रसंग..
* नाट्यप्रयोग सादर होण्यापूर्वी केशवराव..आणि बालगंधर्व यांच्यातले संबंध दाखविणारा दूध आणि पानाची देवाणघेवाण करणारा मेकअप करतानाचा प्रसंग..
* गद्य नट वेगळे..आणि संगीत भूमिका सादर करणारे पात्र वेगळे..
* नाटकाच्या लेव्हलच नाट्य हलते राहण्यासाठी केलेला उपयोग...
* मानापमान नाटकातील गाजलेल्या पदांची कलावंत म्हणून केलेले उत्तम सादरीकरण..
* एकाच नाटकात प्रयोगशील ..आणि तेव्हढेच उत्तम नेपथ्याचा केलेला उपयोग...
* इतिहास अभ्यासून लेखकाने तयार केलेली ही परिणामकारक नसऱ्य..
* नाटक सतत घडत रहाण्यासाठी हृषीकेश जोशी यांनी केलेला मंच वापर..
* तरुण कलावंत घेऊन सादर झालेला परिणामकारक संगीत नाटकांचा प्रयोग..
* नाट्यक्षेत्रात इतिहास घडविणाऱ्या ऐतिहासिक घटनेला पुन्हा नव्याने उजाळा देणारी रांगमंचावरील घटना..
* तरुण कलावंतांनी आपल्या परंपरेचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोचविण्याचा हा उत्तम प्रयत्न..
* कालानुरूप बदलूनही काळाची पावले ओळखून केलेला हा नाट्य निर्मिती करण्याचा निर्णय..


_ सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com