Sunday, August 18, 2024
जयवंत दळवी जन्मशताब्दी सोहळा उत्साहात साजरा..!
ज्येष्ठ साहित्यिक ..नाटककार जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने गुरुवार १५ ऑगस्ट रोजी पुण्यात एस एम जोशी सभगृहात बेलवलकर ग्रुप आयोजित आणि डॉ. मानसी मागीकर संकल्पित कार्यक्रम..
दळवी समजून घेताना
जयवंत दळवी. जन्मशताब्दी निमित्त पहिला कार्यक्रम पुण्यात झाला.
जयवंत दळवी यांच्यावर डॉक्टरेट केलेल्या डॉ. मानसी मागीकर दळवी यांच्याविषयी आपले विचार मांडले.
दळवी यांच्या साहित्यावर आणि त्यांच्याविषयी ज्येष्ठ संपादक पत्रकार विजय कुवळेकर यांनी आपल्या भाषणात दळवी यांच्या साहित्याचा आणि माणूसपणाचा वेध घेतला.
ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी..यांच्याशी संवाद साधला तो राजेश दामले यांनी..आणि दळवी यांच्या विषयी आणि त्यानी काम केलेल्या नाटकातील भूमिकांविषयी नीना कुलकर्णी भरभरून बोलल्या.
दळवी याना कोणताही विषय नाटकासाठी वर्ज्य नव्हत्या हे सांगून नाटककार प्रशांत दळवी यांनी त्यांच्या व्यक्तिरेखा हीच कथावस्तू असते हे शिकविले. त्यांनी व्यक्तिरेखा सजीव, बहुरंगी केल्या..मध्यमवर्गीयांच्या दबलेल्या भावनेला दळवी यांनी वाचा दिली असेही ते म्हणाले आणि दळवी यांची राष्ट्रीय पातळीवर त्यांची ओळख निर्माण व्हावी ही अपेक्षाही त्यानी व्यक्त केली.
नाटककार दळवी यांच्याविषयी सारेच मनापासून बोलले.या कार्यक्रमाला रसिकांनी दिलेली भरभरून दाद..
आणि नाटककार जयवंत दळवी यांच्या लग्न,
सावित्री,महासागर,पर्याय आणि पुरुष या नाटकातील अमित त्रिभुवन, विनिता पिंपळखरे आणि डॉ. मानसी मागीकर यांनी आपल्या वाचिक अभिनयातून साकार केलेले प्रसंग..याचे दर्शन घडले.
समीर बेलवलकर यांनी या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन केलेले आपले मनोगत आणि राजेश दामले यांनी कार्यक्रमाची आखणी करण्यात केलेले कौशल्य आणि नीना कुलकर्णी यांच्याशी साधलेला संवाद..यातून नाटककार दळवी पुन्हा एकदा रसिकांच्या मनात कायम लक्षात राहिले..
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment