यापुढील काळात सर्व संमेलने ही साहित्यिकांना ब्रॅण्ड ॲम्बेसिडर करणारी असतील. हेच अधोरिखित करण्यासाठी साहित्य महामंडळाच्या पुण्यातील कार्यालयाचे उद्घाटन माजी संमेलनाच्या अध्यक्षांनी करण्याचे ठरविले..संमेलनाची पूर्वीचं स्वरूप बदलण्याचे संकेत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कार्यालय पुण्यात सुरू झाले त्या प्रसंगी महामंडळाच्या नव्या अध्यक्षांनी दिले आहेत.
परिसंवादाचे स्वरूप बदलून त्याला चर्चा सत्राचे रूप देणे.. वक्त्यांची संख्या कमी करणे..साहित्य संमेलनाच्या साच्यात बदल करून वाचक केंद्रित संमेलने कशी होतील...याकडे अधिक लक्ष देऊन त्याची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन.. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे नवे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिले आहे.
मंगळवारी १५ एप्रिल २५ रोजी ज्येष्ठ साहित्यिक आणि साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष राजेंद्र बनहट्टी यांच्या हस्ते पुण्याचा मसापच्या सभागृहात साहित्य महामंडळाच्या नव्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले..त्यावेळी जोशी बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर बनहट्टी यांच्या बरोबर डॉ. अरुणा ढेरे, सदानंद मोरे, लक्ष्मीकांत देशमुख, भारत सासणे या माजी संमेलनाध्यक्षांची उपस्थिती महत्वाची होती.
ग्रंथ प्रदर्शनाकडे गांभीर्याने बघावे लागेल.. समाजातल्या विविध विषयात काम करणाऱ्यांची सहविचार सभा घेऊन त्यांच्या कल्पना कशा अमलात आणता येतील.. संमेलन वाचक केंद्रित होण्याच्या दृष्टीने प्रयत्न होतील.. साहित्यातल्या सर्व प्रवाहांना सामावून घेण्यासाठी पुढाकार घेतला जाईल..संमेलना शिवाय अनेक प्रकारच्या गोष्टी करण्याचा प्रयत्न महामंडळ नक्की करेल असेही प्रा. जोशी यांनी आपल्या भाषणात सांगून महामंडळ विविध व्यक्तींशी आणि संस्थांशी संवादाचे पुल उभारण्यात पुढाकार घेईल ..आणि सर्वसमावेशक कार्य करेल असे ते म्हणाले.
यावेळी सदानंद मोरे, बनहट्टी, लक्ष्मीकांत देशमुख, भारत सासणे यांनीही महामंडळाला आणि संमेलनाविषयी अनेक सूचना मांडल्या..
प्रास्ताविक महामंडळाच्या नव्या कार्यवाह सुनीताराजे पवार यांनी केले..तर महामंडळाचे नवे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी आभार प्रश्न केले.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन मृणालिनी कानेटकर यांनी केले होते..
No comments:
Post a Comment