Wednesday, April 16, 2025
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ पुण्यातील कार्यालयाचा उद्घाटन समारंभ
Saturday, February 8, 2025
आनंदवन..७५ पूर्ण... तिसरी पिढी नव्या दृष्टीने नवी स्वप्ने घेत बाबा आमटे यांचे कार्य पुढे नेत आहेत..!
शृंखला पायी असू दे, मी गतीचे गीत गाई
दुःख उधळायास आता आसवांना वेळ नाही....
ह्या काव्यपंक्ती ज्यांनी रचल्या व प्रत्यक्षात तसे जगून दाखविले ते बाबा आमटे आणि गृहिणी-सखी-सचिव या तिन्ही भूमिका व्रतस्थपणे जगत त्यांना तहहयात साथ देणाऱ्या साधनाताई आमटे, या उभयतांनी महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात महारोगी सेवा समिती, वरोरा या स्वयंसेवी संस्थेच्या रूपाने सुरू केलेल्या कार्ययज्ञास नुकतीच ७५ वर्षे पूर्ण झाली!
या साडेसात दशकांच्या या लोकविलक्षण सेवाकार्याचे सिंहावलोकन आणि पुढील २५ वर्षांत योजित कार्याच्या दिशेची सुहृदांपुढे मांडणी या उद्देशाने “आनंदवन” इथे ८ व ९ फेब्रुवारी २०२५ रोजी“योगदानाचा–कृतज्ञतेचा–सद्भावनेचा–मित्रमेळावा” आयोजित केला होता.
त्यानिमित्त आनंदवन विषयीचे हे टिपण..!
समाजातील कुष्ठरोगी, अंध, अपंग, कर्णबधिर, आदिवासी अशा विविध वंचित आणि दुर्लक्षित घटकांना माणूसपणाचं सन्मान्य जगणं जगता यावं यासाठी बाबा आमटे यांनी आपलं उभं आयुष्य झिजवलं. या घटकांना त्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं बळ दिलं, दृष्टी दिली आणि संधीही दिली. या अचाट आणि अभूतपूर्व प्रयोगाचं जिवंत आणि चैतन्यमय प्रतीक म्हणजे आनंदवन..!
आनंदवन हा बाबा आमटे यांनी महारोग्यांच्या सेवेसाठी महाराष्ट्र राज्याच्या चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा गावाजवळ १९४८ साली केवळ दोन झोपड्यांमधून सुरू केलेला प्रकल्प, आज सुमारे ५००० लोकांच्या एका स्वयंपूर्ण गावामध्ये रूपांतरीत झाला आहे. आज आनंदवन ही स्वतंत्र ग्रामपंचायत उभी आहे. या प्रकल्पाची सर्व व्यवस्था महारोगी सेवा समिती, वरोरा मार्फत बघितली जाते.
आज ही महारोगी यांची रचनात्मक घडण करणारी जगातील एकमेव संस्था.. ७५ वर्षे पूर्ण करून आपला आदर्श निर्माण करीत आहे.
शरीराचा कुष्ठरोग मी बरा केला..पण मनाचा कुष्ठरोग मी बरा करू शकलो नाही..
सुदृढ मनाला जडलेला कुष्ठरोग अजून बरा झालेला नाही.. ज्या दिवशी तो बरा होईल त्या दिवशी आनंदवन सारखी चालविण्याची गरज पडणार नाही..
बाबा आमटे..
इतर आजाराप्रमाणे तुम्ही कुष्ठरोगी बरा झालेला असेल तर तुम्ही त्याला सन्मानाने, वाजत गाजत घरी घेऊन जा.. आणि समाजाला सांगा हा बरा झाला..मी आणतो..तुमच्यात वाढवा..पण ते होत नाही.. ही स्थिती बदलण्याची गरज आहे..असे डॉ. विकास आमटे सांगतात.
आज येथे रूग्णालयाखेरीज अनाथालय, शाळा व महाविद्यालय, अंध व मूकबधिर मुलांची शाळा, हातमाग, यंत्रमाग, हस्तकला, शिवणकला, ग्रिटिंग कार्ड विभाग, प्रिंटीग प्रेस असे नानाविध उपक्रम राबवले जातात. सुमारे १५० शारीरिक विकलांग व्यक्तींचा स्वरानंदवन वाद्यवृंद.
आनंदवनाची निर्मिती आणि त्याचा इथपर्यंतचा प्रवास ‘माणूस’ घडविणाऱ्यांचा आहे.
हाथ लगे निर्माण मे
नहीं मारणे
नहीं मांगने..
बाबा आमटे यांच्या सांगण्यानुसार
त्याला असे उभे करा की तो मागू नाही शकला पाहिजे कुणाकडे..
असे आनंदवन कुष्ठरोग्यांनी उभे केले..
आनंदवन इथे कुष्ठरोगी यांच्या निरनिराळ्या सहा वसाहती आहेत..त्यांच्यासाठी या मेगा किचनमध्ये स्वयंपाक होतो..तोही हेच लोक..स्त्रिया करतात.
इथे महाविद्यालय..शाळा आहेत त्यानाही इथे भोजनासाठी व्यवस्था इथे करण्यात आली आहे..
त्यासाठी इंधन म्हणून पुण्याच्या किर्लोस्कर यांच्या तंत्रज्ञान घेऊन बायो गॅसची निर्मिती केली. सोलर पॅनल द्वारे वीज निर्मिती करून त्यातून इथे ऊर्जा आणली गेली.
प्रत्यक्ष कुष्ठरोग्यांची वसाहत स्नेहसावली अनुभवताना त्यांच्या चेहऱ्यावर हास्य पाहून आणि त्यानी नमस्कार..करून मलाही तुमचा माना..ही डोळ्यातून केलेली विनवणी मन गलबलून सोडते..जे एकदा आले ते शेवटच्या श्वासापर्यंत..आनंदवनाच्या प्रवासाला येतात..हेच घर..हेच आयुष्य..!
आज ५५ बेडचे हे हॉस्पिटल डॉ. पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली इथे काम करीत आहे.
डॉ. हृषीकेश गावंडे .. डॉ. कपिलदेव कदम हे इथे कसे काम चालते ते सांगतात..
आधुनिक उपचार पद्धती कुष्ठरोगी बांधवांसाठी इथे आहेत..
इथे केवळ कुष्ठरोगी नसून अपंग, मुक - बधीर मंडळींची संख्या असून कुष्ठरोगी बांधव कमी आहेत पण जे आहेत त्यांना त्यांचेकडे असलेले कौशल्य वाढवून त्या ज्या सेवा देतात त्याला मोबदला देऊन त्यास ताठपणे समाजात जगण्याचे बळ आनंदवन देत आहे..हे सर्वात महत्वाचे आहे..
डॉ. विकास तसेच डॉ. भारती..कौस्तुभ आमटे..डॉ. प्रकाश आणि डॉ . मंदाकिनी आमटे तसेच सारे आमटे कुटुंबीय..आपले विश्वस्त आणि निष्ठावान कार्यकर्ते यांच्या बळावर इथली विकास स्वप्ने डोळस पणे पहात आहेत..
आनंदवन .. कुष्ठरोगी बांधवांसाठी जागतिक पातळीवर काम करणारी सर्वात संस्था आहे..समाजातील दानशूर आणि सामान्य माणूस त्यांच्या परीने संस्थे सोबत जोडला गेला आहे..पण शासनाचे याकडे पुरेसे लक्ष नाही..यानिमित्ताने का होईना..आनंदवन अधिक नव्या दिशेने कार्य करीत असल्याचे शासन पाहिल आणि आपली नजर इकडे वळवून त्यांना मदतीचा हात पुढे करतील .
- सुभाष इनामदार
पुणे
Monday, January 27, 2025
भक्तीचा मळा आपल्या स्वर तालांनी फुलविणारा..पंढरीचा स्वामी..!
Wednesday, November 6, 2024
डॉ. वीणा देव अतिशय संवेदशील व्यक्तीमत्व...!
डॉ. वीणा देव यांनी गुणवत्तेशी आणि जीवनमूल्ये यांच्याशी कधीही तडजोड केली नाही.. प्रा. मिलिंद जोशी..
Saturday, October 26, 2024
नृत्य निपुण प्राजक्ता माळी..ह्यांच्या 'फुलवंती'च्या उत्तम निर्मितीला दाद द्यायलाच हवी..!
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या "फुलवंती" या कादंबरीवर आधारित हा चित्रपट हा पेशवेकाळात असलेले कलेचे महत्व आणि बुद्धिमान व्यक्तींचा असलेला मान दाखविणारा एक उत्तम आविष्कार.... म्हणजे फुलवंती..!
हा चित्रपट काढणे आणि तोही इतक्या देखण्या पद्धतीने सादर करणे हे खरोखरच शिवधनुष्य..ते पेलण्याचे साहस या चित्रपटातून यशस्वी झाल्याची नक्कीच नोंद घ्यावीशी वाटली.
प्रत्येक घटना..त्यातल्या व्यक्तिरेखा तुम्हाला खिळवून ठेवतात.. नृत्याची भक्कम बाजू तुमचे मन प्रसन्न तर करतेच पण त्यासाठी घेतलेले प्रयत्न बेफाट आहेत..
हा चित्रपट कलाप्रेम ..आणि दिलेल्या शब्दांचे महत्व पेशवे काळात किती असामान्य होते ..आणि न्याय देणारे पेशवे कलेचा आणि बुद्धिमत्तेचा किती आदर करीत होते..त्याचेच दर्शन फुलवंती मध्ये घडते..
चित्रपटात अनुभवताना व्यक्तिरेखांचे संवाद तुम्हाला त्यातून नेमका परिणाम देतात..प्रवीण विठ्ठल तरडे..यांनी ही बाजू समर्थपणे पेलली आहे.
कुठेही अवस्तवता नाही..नेमके काय साध्य करायचे आहे ते लेखक जाणून आहे..प्रसंगांचा परिणाम साधणारे आणि व्यक्तिरेखांचे महत्व ओळखून चित्रपट घडत राहतो..
नर्तकीचे आणि नृत्य कलेचे महत्व ओळखून फुलवंतील दिलेली भरपूर स्पेस..यातून सौदर्य अधिकाधिक बाहेर येते..
पुण्यातील वातावरण दाखविताना थोडक्या व्यक्तिरेखांच्या रूपाने सहज उलगडत जाते..
पेशवाई..दरबार.. त्यांची पात्रनिवड..आजूबाजूचे वाडे..वाड्यांची सुंदरता..प्रसन्नता..दरबाराचे भव्यपण..
नृत्य कलेतील बारकावे.. घुंगरूचे महत्व..पखावाजातील नादमयता..त्यासाठी शास्त्रीबुवा यांनी घेतलेले परिश्रम..आणि सर्वात महत्वाचे म्हणजे नृत्याला महत्व देऊन नटविलेली अतिशय उत्तम गाणी..
नाजूक आणि कलानिपुण फुलवंती..प्राजक्ता माळी यांच्या उत्तम ..देखण्या सादरीकरणातून चित्रपटभर भारून राहते..
देखणा..रुबाबदार..आणि बुद्धिमान असलेल्या
व्यंकट शास्त्री यांना गाष्मिर महाजनी यांनी भारदस्त ..आणि नेमक्या भावनिक प्रसंग साकारून उभा केला आहे..
लक्ष्मी या व्यक्तिरेखेत सोज्वळ रुपात देखण्या दिसत होत्या स्नेहल तरडे.. पण भुमिकेपेक्षा दिग्दर्शक म्हणून त्या अधिक प्रभाव पाडतात..
प्रसाद ओक, वैभव मांगले, ऋषिकेश जोशी, समीर चौघुले, चिन्मयी सुमित, मंगेश देसाई, वनिता खरस्त, जयवंत वाडकर...साऱ्याच कलाकारांनी चित्रपट अधिक परिणामकारक केला आहे..
अविनाश - विश्वजित या संगीतकार जोडीने गाणी ऐकत..नव्हे तर पहात रहावीत अशी छान घडविली आहेत.
आर्या आंबेकर, वैशाली म्हाडे, राहुल देशपांडे, बेला शेंडे यांनी गायलेली गाणी मनावर अधिराज्य गाजवतात.. यातली गीते स्नेहल तरडे , वैभव जोशी आणि विश्वजित जोशी ,डॉ. प्रसाद बिवरे, मंदार चोळकर याची आहेत..त्यांना दिव्य मराठीचा गंध आहे.. आहेत..त्याला अर्थ आहे.
घुंगरू आणि पखवाज यांचे नाते उलगडत
जाणारा हा चित्रपट..
चित्रपट पहातो त्या महेश लिमये यांच्या उत्कृष्ट सिनेफोटोग्रफीच्या माध्यमातून..
रंगसंगती आणि परिणामकारकता सारेच यात उठून दिसते..
खरे तर बरेच काही लिहिण्यासारखे आहे..पण शब्द संपतात..तिथे चित्रे दिसू लागतात..
तसा हा नेहमीच्या कौटुंबिक पठडीत नसलेला कलात्मक दर्शन घडविणारा इतिहास..सौदर्य आणि कला..शास्त्र याकडे लक्ष वेधणारा चित्रपट बनविल्यांद्दल ..एक मराठी प्रेमी म्हणून प्राजक्ता आणि स्नेहल आणि सर्व त्यासाठी कलाकारांचे आभार मानले पाहिजेत.
तुम्ही आम्हाला अधिक समृध्द केलेत..
चित्रपट गृहात जाऊनच या फुलवांती.. चा अनुभव घेणे अधिक उत्तम राहील..
प्राजक्ता माळी यांच्या उत्तम आणि धाडसी निर्मितीमुळे हा चित्रपट एक सुंदर कलाकृती पाहिल्याचे समाधान मिळते..
या गोष्टी खटकतात....
एक म्हणजे फुलवंती.. यांची भाषा..मध्येच त्या ग्रामीण बोलीत बोलतात..तर बरेच वेळा..शुद्ध मराठीत..आणि कशी दोन्हींची सरमिसळ होते..
दुसरे म्हणजे.. फुलवंती.. यांना पुण्यात नृत्य सादर करण्यासाठी बोलाविले जाते..तेंव्हा त्या तलावात नहात असतात.. ह्याची काय आवश्यकता होती..
यमुनाजळी..किंवा.. देरे कान्हा..डोक्यात होते की काय..नकळे..!
उच्च बुद्धिमत्ता असलेला माणूस..सहज बाहेरच्या न जाणाणाऱ्या स्त्रीला चुकून वेश्या..म्हणणे..
आणि पखवाज वादक होण्यासाठी असा आटापिटा करणे..
एक नोंद..म्हणजे चित्रपट संपल्यावर जेंव्हा सहभागी कलाकारांची नामावली दाखविली जाते ...त्यानंतरही प्रेक्षक चित्रपटगृह सोडत नाहीत..शेवटचे नृत्य अनुभवत असतात..हा परिणाम चित्रपटाचा..
- सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
#Prajakttamaali #snehaltarde
#फुलवंती #Fulwanti
Thursday, October 17, 2024
उत्तम अभिनयाने आणि संगीताने सादर झालेली खणखणीत कलाकृती.. गोष्ट संयुक्त मानापमानाची..!